शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधीजींचे विचार संतश्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:18 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवी कल्याणाचा विचार मांडला. ते राजकारणी नव्हते तर उच्च कोटीचे चिंतक आणि संतांच्या प्रागतिक श्रेणीचे उत्तुुंग महामानव होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल काटकर यांनी केले. ‘म. गांधी यांचे साहित्य आणि विचार’ या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.

ठळक मुद्देअनिल काटकर : शासकीय जिल्हा ग्रंथालयाच्या ग्रंथोत्सवात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवी कल्याणाचा विचार मांडला. ते राजकारणी नव्हते तर उच्च कोटीचे चिंतक आणि संतांच्या प्रागतिक श्रेणीचे उत्तुुंग महामानव होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल काटकर यांनी केले. ‘म. गांधी यांचे साहित्य आणि विचार’ या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या निधीतून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालया संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात ग्रंथोत्सव घेण्यात आला होता. मुरलीमनोहर व्यास यांनी विचारपुष्प गुंफले. ते म्हणाले, गांधीजींच्या जीवनात शिस्तीचे अनन्यसाधरण महत्व होते. गांधीजी व्यक्ती नसून शाश्वत विचारधारा आहे. त्यांचा प्रत्येक विचार मननीय व चिंतनीय आहे. त्यांचे विचार राज्यकर्ते व समाजाने आत्मसात केले असते तर आज अनेक निर्माण झाल्या नसत्या. ग्रंथजत्रा कार्यक्रमात म. गांधी यांचे साहित्य व त्यांचे विचार या विषयावर व्यास बोलत होते. २६ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्रंथजत्रा कार्यक्रमाला जिल्ह्यातील वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे वाचन चळवळीला गती मिळाली. विद्यार्थी व विविध क्षेत्रातील ्रमान्यवरांनी ग्रंथजत्रेत सहभागी होऊन वैचारिक मेजवानीचा आनंद घेतला. प्रा. डॉ. काटकर यांनी अध्यक्षीय भाषणातून ग्रंथ चळवळीवरही भाष्य केले. जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे यांनी आभार मानले.ग्रंथ चळवळीला मिळाली ऊर्जाग्रंथोत्सवाच्या समारोपीय सत्रात सहायक धर्मादाय आयुक्त व्ही. डी. शेंडे यांचे व्याख्यान झाले. माणसाला शारीरिक व मानसिक भुक असते. ही भुक राबविण्यासाठी पुस्तके उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक राय, मुरलीमनोहर व्यास, प्रा. डॉ. अनिल काटकर उपस्थित होते. राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या संकल्पनेतून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने वाचन चळवळीवर आधारीत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. सर्वच उपक्रमांनी वाचकांना नवीन प्रेरणा दिली. वाचनालय चालविणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी व सदस्यांसाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त शेंडे यांचे व्याख्यान उपयुक्त ठरले. ग्रंथालय संस्थांची नोंदणी कशी करावी, कार्यकारी मंडळात परिवर्तन कसे करावे, हिशेब पत्रके तयार करताना कोणती काळजी घ्यावी, यावर त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.