शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र आता शेतकरी ‘सुसाईड हब’ झाला काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:01 IST

राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवारांचा सवाल : पाच वर्षांत १४ हजार ६७० आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हे आकडे पाहून महाराष्ट्र शेतकरी ‘सुसाईड हब’ झाले काय, असा थेट सवाल करून यावरून येत्या अधिवेशनात राज्य सरकारला घेरणार असल्याचा इशारा काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत गुरुवारी दिला.धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची शासकीय मदत दिली जाते. परंतु या १४ हजाह ६७० शेतकऱ्यांपैकी केवळ ९० टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या मदतीपासून वेगवेगळे निकष लावून डावलल्याचा आरोपही यावेळी आमदार वडेट्टीवार यांनी केला.जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. या प्रकल्पावर पाच वर्षांत सोळाशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा आता हवेत विरली आहे. यावर्षी महाराष्ट्रात सर्वत्र टँकर लावायची गरज पडली आहे. ११ हजार टँकरची महाराष्ट्रात गरज निर्माण झाली आहे. मग जलयुक्त शिवारवर खर्च झालेले पैसे कुठे गेले. याचे आॅडिट करणार काय, असा सवाल करून जलयुक्त शिवार म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण होती, असा गंभीर आरोपही यावेळी आ. वडेट्टीवार यांनी केला.राज्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर शासनाकडून काहीही उपाययोजना नाही. शेतमालाला भाव मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप भाव मिळाला नाही. शेतकरी सन्मान योजनेचा लाभही अनेक शेतकऱ्यांना एकच सातबारा असल्यामुळे मिळणार नाही. शेतकऱ्यांना आता सावध राहण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रायश्चित्त म्हणून माफी मागून सामाजिक औदार्य दाखवावे, या शब्दात आ. वडेट्टीवार यांनी यावेळी सरकारच्या धोरणावर सडकून टिकास्त्र सोडले. यावेळी विनोद दत्तात्रेय, सचिन कत्याल, राजेश अड्डूर उपस्थित होते.महात्मा गांधींचा अवमानप्रकरणी निधीचौधरींना निलंबित कराजगाने गांधीजींचे विचार व आचार स्वीकारला आहे. महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी करीत असताना टिष्ट्वट करून महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या मुंबई महानगर पालिका आणि आताच्या पाणी पुरवठा विभागाच्या उपसचिव निधी चौधरी यांचा निषेध नोंदवत त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी विधान सभेतील काँग्रेसचे उपनेता आ. वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार