शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

महाराष्ट्र आता शेतकरी ‘सुसाईड हब’ झाला काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:01 IST

राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवारांचा सवाल : पाच वर्षांत १४ हजार ६७० आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हे आकडे पाहून महाराष्ट्र शेतकरी ‘सुसाईड हब’ झाले काय, असा थेट सवाल करून यावरून येत्या अधिवेशनात राज्य सरकारला घेरणार असल्याचा इशारा काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत गुरुवारी दिला.धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची शासकीय मदत दिली जाते. परंतु या १४ हजाह ६७० शेतकऱ्यांपैकी केवळ ९० टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या मदतीपासून वेगवेगळे निकष लावून डावलल्याचा आरोपही यावेळी आमदार वडेट्टीवार यांनी केला.जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. या प्रकल्पावर पाच वर्षांत सोळाशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा आता हवेत विरली आहे. यावर्षी महाराष्ट्रात सर्वत्र टँकर लावायची गरज पडली आहे. ११ हजार टँकरची महाराष्ट्रात गरज निर्माण झाली आहे. मग जलयुक्त शिवारवर खर्च झालेले पैसे कुठे गेले. याचे आॅडिट करणार काय, असा सवाल करून जलयुक्त शिवार म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण होती, असा गंभीर आरोपही यावेळी आ. वडेट्टीवार यांनी केला.राज्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर शासनाकडून काहीही उपाययोजना नाही. शेतमालाला भाव मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप भाव मिळाला नाही. शेतकरी सन्मान योजनेचा लाभही अनेक शेतकऱ्यांना एकच सातबारा असल्यामुळे मिळणार नाही. शेतकऱ्यांना आता सावध राहण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रायश्चित्त म्हणून माफी मागून सामाजिक औदार्य दाखवावे, या शब्दात आ. वडेट्टीवार यांनी यावेळी सरकारच्या धोरणावर सडकून टिकास्त्र सोडले. यावेळी विनोद दत्तात्रेय, सचिन कत्याल, राजेश अड्डूर उपस्थित होते.महात्मा गांधींचा अवमानप्रकरणी निधीचौधरींना निलंबित कराजगाने गांधीजींचे विचार व आचार स्वीकारला आहे. महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी करीत असताना टिष्ट्वट करून महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या मुंबई महानगर पालिका आणि आताच्या पाणी पुरवठा विभागाच्या उपसचिव निधी चौधरी यांचा निषेध नोंदवत त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी विधान सभेतील काँग्रेसचे उपनेता आ. वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार