शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Election 2019 ; विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:01 IST

कोठारी येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन कोटी ९८ लाख रू. किंमतीची पाणी पुरवठा योजना आपण पूर्ण केली. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी ७८ लाख रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार । विसापूर, कोठारी, बामणी, मानोरा येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : १९९५ मध्ये बल्लारपूर तालुका निर्मितीचे आश्वासन मी दिले होते. बल्लारपूर तालुक्याची निर्मिती झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोठारी तालुका निर्मितीबाबत मी नागरिकांना शब्द दिला होता. नवीन जिल्हे व तालुका निर्मितीबाबत शासनाचे धोरण नसल्यामुळे आम्ही कोठारी येथे अतिरिक्त तहसिलदार कार्यालयाला मंजुरी मिळवून दिली. ही तालुका निर्मितीच्या दृष्टीने खरी सुरूवात आहे. कोठारीला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्याचा शब्द मी नागरिकांना दिला तो पूर्ण करेनच, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.लोकशाहीत मतदान हा पवित्र हक्क समजला जातो. आपले मत हे केवळ विकासासाठी द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे, माजी सभापती राजू बुध्दलवार, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुध्दलवार, भाजपचे तालुका सरचिटणीस रमेश पिपरे, पंचायत समितीच्या उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पदमगिरीवार, सुनील फरकडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोठारी येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन कोटी ९८ लाख रू. किंमतीची पाणी पुरवठा योजना आपण पूर्ण केली. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी ७८ लाख रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण केले.मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र आपण मंजूर करविले. विकासकामांना सामाजिक उपक्रमांची जोड देत जनकल्याणाचा वसा आम्ही सातत्याने जोपासला आहे.आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर व त्या माध्यमातून मोफत चष्मे वितरण, अटल दिव्यांग स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून अपंगांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकलींचे वितरण, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिकांचे निर्माण, मिशन शक्तीच्या माध्यमातून येत्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडा संकुलांची निर्मिती असा विविधांगी विकास आपण करीत आहोत, असेही ते म्हणाले. कोठारी येथील सभेनंतर मानोरा, बामणी, विसापूर या ठिकाणीसुध्दा जाहीर सभांना त्यांना संबोधित केले. तत्पूर्वी गिलबिली, आसेगांव, मोहाडी तुकूम, इटोली, दहेली, कोर्टीमक्ता, कळमना, लावारी, पळसगाव, आमडी, काटवली, कवडजई, नांदगाव (पोडे), हडस्ती आदी गावांना त्यांनी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला.सिंचनासाठी भरीव कामपरिसरातील १० गावांसाठी सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारी पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना आपण पूर्ण करविली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचनाच्या दूष्टीने अतिशय महत्त्वाचा चिचडोह सिंचन प्रकल्प आपण पूर्ण केला आहे. माजी मालगुजारी तलावांच्या नुतनीकरणाचा व दुरूस्तीचा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे. विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार