शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Maharashtra Election 2019 ; केवळ सहाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही.

ठळक मुद्देउपेक्षा सुरूच। चार राजकीय पक्षांनी दिली संधी

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, आप, एपीआय, अखिल भारतीय मानवता पक्षाचा अपवाद वगळल्यास अन्य राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारीच दिली नाही. महिलांना संधी मिळाली तर त्या कर्तृत्व सिद्ध करू शकतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांना डावलल्याचे स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ७१ पैकी केवळ सहा महिला उमेदवारांना संबंधीत पक्षांनी उमेदवारी दिली आहे. यातील दोन महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून तारा काळे (अपक्ष), ब्रह्मपुरी मतदार संघातून पारोमिता गोस्वामी (आप), वरोरा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), चिमूर मतदार संघातून वनिता राऊत (अभामाप), चंद्रपूर मतदार संघातून अमरिता गोगूलवार (एपीआय) व राजुरा मतदार संघातून रेश्मा चव्हाण (अपक्ष) या सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. देशाचे राष्टÑपतीपद व पंतप्रधानपद महिलांनी यशस्वीरित्या भूषविले. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्टÑमंत्री यासारख्या महत्त्वाच्या पदांवर कार्य करून गुणवत्तेचा ठसा उमटविला. राजकीय क्षेत्रासोबतच विज्ञान, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातही महिलांचे पाऊल पुढे आहे. संधी मिळाल्यानेच हे शक्य होऊ शकले. जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाच्या चळवळींनी आता वेग धरला. शिक्षणाचे प्रमाणही वाढले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची टक्के वाढताना दिसत आहे. परंतु, आरक्षणाच्या पलिकडे जाऊन कर्तृत्ववान महिलांना मुख्य राजकीय पक्षांनी उमेदवारी देण्याची मानसिकता अजुनही तयार केली नाही.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही. त्यामुळे महिला स्वत:हून राजकारणात येत नाहीत की प्रमुख राजकीय पक्ष त्यांना हेतुपूर्वक वंचित ठेवतात, असा प्रश्न सामाजिक चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर