शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Maharashtra Election 2019 ; केवळ सहाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही.

ठळक मुद्देउपेक्षा सुरूच। चार राजकीय पक्षांनी दिली संधी

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, आप, एपीआय, अखिल भारतीय मानवता पक्षाचा अपवाद वगळल्यास अन्य राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारीच दिली नाही. महिलांना संधी मिळाली तर त्या कर्तृत्व सिद्ध करू शकतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांना डावलल्याचे स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ७१ पैकी केवळ सहा महिला उमेदवारांना संबंधीत पक्षांनी उमेदवारी दिली आहे. यातील दोन महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून तारा काळे (अपक्ष), ब्रह्मपुरी मतदार संघातून पारोमिता गोस्वामी (आप), वरोरा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), चिमूर मतदार संघातून वनिता राऊत (अभामाप), चंद्रपूर मतदार संघातून अमरिता गोगूलवार (एपीआय) व राजुरा मतदार संघातून रेश्मा चव्हाण (अपक्ष) या सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. देशाचे राष्टÑपतीपद व पंतप्रधानपद महिलांनी यशस्वीरित्या भूषविले. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्टÑमंत्री यासारख्या महत्त्वाच्या पदांवर कार्य करून गुणवत्तेचा ठसा उमटविला. राजकीय क्षेत्रासोबतच विज्ञान, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातही महिलांचे पाऊल पुढे आहे. संधी मिळाल्यानेच हे शक्य होऊ शकले. जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाच्या चळवळींनी आता वेग धरला. शिक्षणाचे प्रमाणही वाढले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची टक्के वाढताना दिसत आहे. परंतु, आरक्षणाच्या पलिकडे जाऊन कर्तृत्ववान महिलांना मुख्य राजकीय पक्षांनी उमेदवारी देण्याची मानसिकता अजुनही तयार केली नाही.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही. त्यामुळे महिला स्वत:हून राजकारणात येत नाहीत की प्रमुख राजकीय पक्ष त्यांना हेतुपूर्वक वंचित ठेवतात, असा प्रश्न सामाजिक चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर