शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; केवळ सहाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही.

ठळक मुद्देउपेक्षा सुरूच। चार राजकीय पक्षांनी दिली संधी

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, आप, एपीआय, अखिल भारतीय मानवता पक्षाचा अपवाद वगळल्यास अन्य राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारीच दिली नाही. महिलांना संधी मिळाली तर त्या कर्तृत्व सिद्ध करू शकतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांना डावलल्याचे स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ७१ पैकी केवळ सहा महिला उमेदवारांना संबंधीत पक्षांनी उमेदवारी दिली आहे. यातील दोन महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून तारा काळे (अपक्ष), ब्रह्मपुरी मतदार संघातून पारोमिता गोस्वामी (आप), वरोरा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), चिमूर मतदार संघातून वनिता राऊत (अभामाप), चंद्रपूर मतदार संघातून अमरिता गोगूलवार (एपीआय) व राजुरा मतदार संघातून रेश्मा चव्हाण (अपक्ष) या सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. देशाचे राष्टÑपतीपद व पंतप्रधानपद महिलांनी यशस्वीरित्या भूषविले. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्टÑमंत्री यासारख्या महत्त्वाच्या पदांवर कार्य करून गुणवत्तेचा ठसा उमटविला. राजकीय क्षेत्रासोबतच विज्ञान, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातही महिलांचे पाऊल पुढे आहे. संधी मिळाल्यानेच हे शक्य होऊ शकले. जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाच्या चळवळींनी आता वेग धरला. शिक्षणाचे प्रमाणही वाढले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची टक्के वाढताना दिसत आहे. परंतु, आरक्षणाच्या पलिकडे जाऊन कर्तृत्ववान महिलांना मुख्य राजकीय पक्षांनी उमेदवारी देण्याची मानसिकता अजुनही तयार केली नाही.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही. त्यामुळे महिला स्वत:हून राजकारणात येत नाहीत की प्रमुख राजकीय पक्ष त्यांना हेतुपूर्वक वंचित ठेवतात, असा प्रश्न सामाजिक चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर