शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; ब्रह्मपुरीत काँग्रेस-शिवसेनेत थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. ही मते टिकविण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे. आपच्या अ‍ॅड. गोस्वामी यांचाही भाजपच्या नाराज मतांवर डोळा आहे. हा चमत्कार घडल्यास निवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. विद्यमान स्थिती बघता काँग्रेस आणि शिवसेनेत दुरंगी लढतीची शक्यता आहे.

ठळक मुद्देवडेट्टीवारांमुळे राज्याचे लक्ष : आपचा भाजपच्या नाराज मतदारांवर डोळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात खरी लढत काँग्रेस आणि शिवसेनेतच असली तरी वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीमुळे चुरस कायम आहे.या मतदार संघात एकूण ११ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येथे काँग्रेसकडून दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात संदीप गड्डमवार यांनी शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम, आम आदमी पार्टीकडून अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, बसपाकडून मुकुंदा मेश्राम, भाकपकडून विनोद झोडगे, संभाजी ब्रिगेडकडून जगदीश पिल्लारे या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह प्रणव सोमनकर, विश्वनाथ श्रीरामे, अजय पांडव व विनय बांबोळे हे अपक्ष उमेदवारही दंड थोपटून आहेत. गेल्या १३ दिवसांच्या काळात सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असला तरी यामध्ये काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व आपच्या उमेदवारांचा प्रचार आघाडीवर आहे. काँग्रेसचे उमेदवार वडेट्टीवार यांची मतदार संघावर मजबूत पकड असून ते गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षात असतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला हे मतदारांना पटवून देत आहेत. या भागात शेतकऱ्यांना सिंचनासाठी गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध करून दिले ही बाब त्यांची बाजू भक्कम करणारी ठरत आहे. शिवसेनेचे उमेदवार गड्डमवार यांच्याकडे विकासाचा कोणताही महत्त्वपूर्ण मुद्दा नाही. सहानुभुतीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांचा अधिकतम प्रभाव सावली तालुक्यात आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दल भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. भाजपची नाराज मते आपल्या पारड्यात टाकण्यात त्यांना कितपत यश येते यावरही बरेच काही अवलंबून आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. ही मते टिकविण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे. आपच्या अ‍ॅड. गोस्वामी यांचाही भाजपच्या नाराज मतांवर डोळा आहे. हा चमत्कार घडल्यास निवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. विद्यमान स्थिती बघता काँग्रेस आणि शिवसेनेत दुरंगी लढतीची शक्यता आहे. आप आणि वंचित बहुजन आघाडीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

टॅग्स :bramhapuri-acब्रह्मपुरी