शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Election 2019 : बल्लारपूर विधानसभा क्षेत्र शंभर टक्के आरोयुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:01 IST

मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बल्लारपूरात डायमंड कटींग व प्रशिक्षण केंद्र, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, अगरबत्ती उत्पादन प्रकल्प, पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी असे विविध उपक्रम आपण कार्यान्वीत केले आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : भटाळी येथील जाहीर सभेत केला संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येत्या काळात बल्लारपूर विधानसभा क्षेत्र शंभर टक्के आरोयुक्त करण्याचा आपला संकल्प असून नागरिकांच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या बळावर हा संकल्प आपण निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बल्लारपूरात डायमंड कटींग व प्रशिक्षण केंद्र, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, अगरबत्ती उत्पादन प्रकल्प, पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी असे विविध उपक्रम आपण कार्यान्वीत केले आहे.चंद्रपूर तालुक्यातील भटाळी येथे आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, श्रीनिवास जनगम, सुभाष गौरकार आदींची उपस्थिती होती.ग्रामीण भागातील सिंचन व्यवस्थेला आपण नेहमीच अग्रक्रम दिला असून आसोलामेंढा सिंचन प्रकल्पाला गोसेखुर्दचे पाणी यामुळे जिल्ह्याला मिळाले आहे. जिल्ह्यात एक लाख ४५ हेक्टर सिंचन होत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून मिळणाऱ्या उजव्या कालव्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, चिमूर, मूल, पोंभुर्णा या तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे, जिल्ह्यातील मामा तलावांना पुनरूज्जीवीत करण्यासाठी आपण पुढाकार घेतला. चिचडोह बॅरेज अंतर्गत चंद्र्रपूर जिल्ह्यातील २८ व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ अशा एकूण ७१ गावांना पिण्याचे पाणी व ११ हजार ५१० हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. पळसगाव-आमडी उपसा जलसिंचन योजनेतंर्गत पळसगाव, आमडी, आष्टी, कळमना, कोर्टीमक्ता, कोर्टी तुकूम, जोगापूर, लावारी, दुधोली, बामणी, केम या दहा गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या दहा गावातील एकूण दोन हजार ४६२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.बल्लारपूर तालुक्यातील शिवणी चोर सिंचन प्रकल्पाचे पुनरूज्जीवन, बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड नाल्याच्या पुनरूज्जीवनाचे काम प्रगतीपथावर, मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना सिंचन सुविधा पुरविण्यासाठी २३ कोटी ४७ लक्ष ५४ हजार रू. निधी मंजूर केला. येत्या काळात हा जिल्हा पाणीदार करण्याचा आपला संकल्प असून तो नागरिकांच्या आशिर्वादाच्या बळावर निश्चितपण पूर्ण होईल, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी भटाळी येथील पहिल्या दहा मतदारांचा सत्कार करण्यात आला. जाहीर सभेला भटाळी येथील व परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर