शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मश्री’च्या घोषणेने महादवाडीवासी गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:25 IST

‘मरावे परी, कीर्तीरूपी उरावे’ याप्रमाणे काही व्यक्ती आपले आयुष्यच समाजकार्यात घालवतात. अशा व्यक्तींच्या कार्याची समाज आणि शासनही दखल घेतो.

ठळक मुद्देसिकलसेल अध्ययनाचा सन्मान : संपत रामटेके यांच्या कार्याची मरणोपरान्त दखल

राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : ‘मरावे परी, कीर्तीरूपी उरावे’ याप्रमाणे काही व्यक्ती आपले आयुष्यच समाजकार्यात घालवतात. अशा व्यक्तींच्या कार्याची समाज आणि शासनही दखल घेतो. असेच समाजकार्य महादवाडी येथील संपत रामटेके यांनी केले. त्यांनी सिकलसेल या दुर्धर आजारावर संशोधन करून चालविलेल्या चळवळीने हजारो रूग्णांना लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोपरान्त पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा शासनाने केली. पुरस्काराची घोषणा होताच चिमूर क्रांतीभूमी तालुक्यातील बाराशे लोकसंख्येच्या महादवाडीचे नागरिक गहिवरले आहेत.सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या जन्मगावाचे ऋण फेडण्यासाठी संपत रामटेके यांनी बाराशे लोकसंख्येच्या महादवाडी गावात अनेक उपक्रम राबविले. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकोप्याने राहण्याच्या दृष्टीने त्यांचे नेहमी प्रयत्न असायचे. मात्र हे सर्व करीत असतानाच मुलगा हर्षलला सिकलसेल नावाचा दुर्धर आजार जडला. मुलाला सिकलसेल आजार जडल्याने संपत रामटेके यांनी या आजारावर संशोधन करीत, हा आजार कशाने होतो यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.ही बाब शासनाच्या लक्षात आणून देत सिकलसेल आजाराला देशाच्या संसदेपर्यंत पोहचविले. त्यांनी सिकलसेल आजाराला एक चळवळ बनवून गावखेड्यात जागृती घडवून आणली. त्यामुळे शासनाने या रूग्णांना मोफत औषध, शासनाच्या सवलती, बस प्रवासात सवलत, अशा अनेक सवलती लागू केल्या आहेत. सिकलसेलच्या अध्ययनाला सन्मान देत संपत रामटेके यांच्या कार्याची दखल घेत त्यांची मरणोपरान्त पद्मश्री पुरस्कारासाठी शासनाने निवड केली. त्यामुळे महादवाडीचे नागरिक गहीवरले असून पद्मश्री पुरस्काराने महादवाडी गावाची ओळख आता जागतिक पटलावर झाली आहे.‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात दखलसंपत रामटेके यांचे वडील तुकाराम रामटेके व काका दादाजी रामटेके यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी धर्मातर चळवळीत संपर्क आल्याने या परिवारात शिक्षणाची जिज्ञाशा होती. संपत रामटेके यांचे प्राथमिक शिक्षण केवाडाच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण नवभारत विद्यालय नवरगाव , बारावी पर्यतचे शिक्षण न्यु इंग्लिश विद्यालय चंद्रपूर तर नागपूर येथे पॉलिटेक्नीक करून वेकोलिमध्ये अभियंता म्हणून ते रूजू झाले. अभियंता म्हणून नोकरी करीत असताना त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत गावात अनेक उपक्रम राबविले. गावात नाटक, दंडारी मध्ये सुद्धा ते अभिनय करायचे. गावातील महिलांची मॅराथॉन स्पर्धा देशाच्या पटलावर गाजली. याच स्पर्धेची दखल सिनेअभिनेता अमिर खान याच्या सत्यमेव जयते कार्यक्रमात घेण्यात आली.