शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

‘पद्मश्री’च्या घोषणेने महादवाडीवासी गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:25 IST

‘मरावे परी, कीर्तीरूपी उरावे’ याप्रमाणे काही व्यक्ती आपले आयुष्यच समाजकार्यात घालवतात. अशा व्यक्तींच्या कार्याची समाज आणि शासनही दखल घेतो.

ठळक मुद्देसिकलसेल अध्ययनाचा सन्मान : संपत रामटेके यांच्या कार्याची मरणोपरान्त दखल

राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : ‘मरावे परी, कीर्तीरूपी उरावे’ याप्रमाणे काही व्यक्ती आपले आयुष्यच समाजकार्यात घालवतात. अशा व्यक्तींच्या कार्याची समाज आणि शासनही दखल घेतो. असेच समाजकार्य महादवाडी येथील संपत रामटेके यांनी केले. त्यांनी सिकलसेल या दुर्धर आजारावर संशोधन करून चालविलेल्या चळवळीने हजारो रूग्णांना लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोपरान्त पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा शासनाने केली. पुरस्काराची घोषणा होताच चिमूर क्रांतीभूमी तालुक्यातील बाराशे लोकसंख्येच्या महादवाडीचे नागरिक गहिवरले आहेत.सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या जन्मगावाचे ऋण फेडण्यासाठी संपत रामटेके यांनी बाराशे लोकसंख्येच्या महादवाडी गावात अनेक उपक्रम राबविले. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकोप्याने राहण्याच्या दृष्टीने त्यांचे नेहमी प्रयत्न असायचे. मात्र हे सर्व करीत असतानाच मुलगा हर्षलला सिकलसेल नावाचा दुर्धर आजार जडला. मुलाला सिकलसेल आजार जडल्याने संपत रामटेके यांनी या आजारावर संशोधन करीत, हा आजार कशाने होतो यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.ही बाब शासनाच्या लक्षात आणून देत सिकलसेल आजाराला देशाच्या संसदेपर्यंत पोहचविले. त्यांनी सिकलसेल आजाराला एक चळवळ बनवून गावखेड्यात जागृती घडवून आणली. त्यामुळे शासनाने या रूग्णांना मोफत औषध, शासनाच्या सवलती, बस प्रवासात सवलत, अशा अनेक सवलती लागू केल्या आहेत. सिकलसेलच्या अध्ययनाला सन्मान देत संपत रामटेके यांच्या कार्याची दखल घेत त्यांची मरणोपरान्त पद्मश्री पुरस्कारासाठी शासनाने निवड केली. त्यामुळे महादवाडीचे नागरिक गहीवरले असून पद्मश्री पुरस्काराने महादवाडी गावाची ओळख आता जागतिक पटलावर झाली आहे.‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात दखलसंपत रामटेके यांचे वडील तुकाराम रामटेके व काका दादाजी रामटेके यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी धर्मातर चळवळीत संपर्क आल्याने या परिवारात शिक्षणाची जिज्ञाशा होती. संपत रामटेके यांचे प्राथमिक शिक्षण केवाडाच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण नवभारत विद्यालय नवरगाव , बारावी पर्यतचे शिक्षण न्यु इंग्लिश विद्यालय चंद्रपूर तर नागपूर येथे पॉलिटेक्नीक करून वेकोलिमध्ये अभियंता म्हणून ते रूजू झाले. अभियंता म्हणून नोकरी करीत असताना त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत गावात अनेक उपक्रम राबविले. गावात नाटक, दंडारी मध्ये सुद्धा ते अभिनय करायचे. गावातील महिलांची मॅराथॉन स्पर्धा देशाच्या पटलावर गाजली. याच स्पर्धेची दखल सिनेअभिनेता अमिर खान याच्या सत्यमेव जयते कार्यक्रमात घेण्यात आली.