शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सरत्या वर्षात ५२७ वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 01:08 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर

३८ लाखांच्या वीजचोऱ्या : ५३ जणांविरुध्द केला गुन्हा दाखल चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीजचोरांना महावितरणने यंदा जोरदार शॉक दिला. या वीज चोरांनी तब्बल ३७ लाख ९४ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ४१६ ग्राहकांकडून वीजचोरीपोटी असलेली ३० लाख २७ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय वीजचोरी करणाऱ्या ५३ जणांविरूध्द गुन्हाही नंोदविण्यात आला. चंद्रपूर मंडळाने १ एप्रिल २०१६ ते ३१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १६ लाख ०६ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या एकटया चंद्रपूर मंडळात उघडकीस आणल्या व एकूूण १५२ वीजचोरांवर कडक कारवाई करण्यात आली. गडचिरोली मंडळाने २१ लाख ८२ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या व एकूण ३७५ वीजचोर महावितरणने केलेल्या कारवाईत सापडले. यापैकी सर्वाधिक २०१ प्रकरणे ब्रम्हपुरी विभागातील असून, १०८ प्रकरणे गडचिरोली विभाग, ६६ आलापल्ली, २६ वरोरा विभागातील, ६६ बल्लारपूर विभाग तर ६० चंद्रपूर विभागातील आहेत. या सर्व वीजचोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली. आढळलेल्या वीजचोऱ्यात २५१ वीजचोरांनी आकडे टाकून तर २७६ वीजचोरांनी सरळ मीटरसोबत छेडछाड करीत वीजचोरी केल्याचे महावितरणच्या गस्ती पथकास आढळून आले. वीजचोरी करण्यासाठी वीजचोरांनी मीटरमधील कॉईलची लांबी कमी करणे, रिमोट कंट्रोलचा वापर, मीटर बायपास करणे किंवा विना मीटर वीजवापर करणे, मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे अशा विविध क्लुप्त्या वापरून वीजचोरी केल्याचे आढळले. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजग्राहकांना वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे व वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी) पावसाचा बसला होता फटका अवकाळी पाऊस तसेच वादळवाऱ्यामुळे सरत्या वर्षात महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयात ़एकूण ७१४ उच्चदाबाचे तर १९५२ लघुदाबाचे खांब तर १४६ रोहित्राचे नुकसान झाले आहे. यापैकी ६७२ उच्चदाबाचे तर १८७८ लघुदाबाचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले. तसेच १४४ रोहित्र दुरूस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, सरत्या वर्षात महावितरण कंपनीकडून तब्बल चार हजार ७८ कृषीपंपाच्या वीज जोडण्या करून देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.