शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरत्या वर्षात ५२७ वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 01:08 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर

३८ लाखांच्या वीजचोऱ्या : ५३ जणांविरुध्द केला गुन्हा दाखल चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीजचोरांना महावितरणने यंदा जोरदार शॉक दिला. या वीज चोरांनी तब्बल ३७ लाख ९४ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ४१६ ग्राहकांकडून वीजचोरीपोटी असलेली ३० लाख २७ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय वीजचोरी करणाऱ्या ५३ जणांविरूध्द गुन्हाही नंोदविण्यात आला. चंद्रपूर मंडळाने १ एप्रिल २०१६ ते ३१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १६ लाख ०६ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या एकटया चंद्रपूर मंडळात उघडकीस आणल्या व एकूूण १५२ वीजचोरांवर कडक कारवाई करण्यात आली. गडचिरोली मंडळाने २१ लाख ८२ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या व एकूण ३७५ वीजचोर महावितरणने केलेल्या कारवाईत सापडले. यापैकी सर्वाधिक २०१ प्रकरणे ब्रम्हपुरी विभागातील असून, १०८ प्रकरणे गडचिरोली विभाग, ६६ आलापल्ली, २६ वरोरा विभागातील, ६६ बल्लारपूर विभाग तर ६० चंद्रपूर विभागातील आहेत. या सर्व वीजचोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली. आढळलेल्या वीजचोऱ्यात २५१ वीजचोरांनी आकडे टाकून तर २७६ वीजचोरांनी सरळ मीटरसोबत छेडछाड करीत वीजचोरी केल्याचे महावितरणच्या गस्ती पथकास आढळून आले. वीजचोरी करण्यासाठी वीजचोरांनी मीटरमधील कॉईलची लांबी कमी करणे, रिमोट कंट्रोलचा वापर, मीटर बायपास करणे किंवा विना मीटर वीजवापर करणे, मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे अशा विविध क्लुप्त्या वापरून वीजचोरी केल्याचे आढळले. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजग्राहकांना वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे व वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी) पावसाचा बसला होता फटका अवकाळी पाऊस तसेच वादळवाऱ्यामुळे सरत्या वर्षात महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयात ़एकूण ७१४ उच्चदाबाचे तर १९५२ लघुदाबाचे खांब तर १४६ रोहित्राचे नुकसान झाले आहे. यापैकी ६७२ उच्चदाबाचे तर १८७८ लघुदाबाचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले. तसेच १४४ रोहित्र दुरूस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, सरत्या वर्षात महावितरण कंपनीकडून तब्बल चार हजार ७८ कृषीपंपाच्या वीज जोडण्या करून देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.