शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पत्रिका तर मिळाली; पण लग्नाला जायचे की नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

बल्लारपूर : कोरोना लोकांना स्वस्त बसू देत नाही. त्याच्या भयाने चिंतेत दिवस ढकलावे लागत आहेत. ज्यांच्या घरात लग्नादी कार्यक्रम ...

बल्लारपूर : कोरोना लोकांना स्वस्त बसू देत नाही. त्याच्या भयाने चिंतेत दिवस ढकलावे लागत आहेत. ज्यांच्या घरात लग्नादी कार्यक्रम ठरले आहे, त्यांच्यापुढे नाना अडचणी येत आहेत. सोबतच यजमानांनी आपल्या नातेवाईक, परिचित यांना निमंत्रित केले आहे; मात्र तेही लग्नाला यायचे की नाही, या प्रश्‍नाने ग्रासले आहेत. कारण ५० हून अधिक लोकांची उपस्थिती लग्नप्रसंगी नको, ही प्रशासकीय व्यवस्थेने घालून दिलेली अट आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दिवाळीपासून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले. सोबतच लग्न जोडणीला वेग आला. निमंत्रणाच्या चारशे-पाचशे पत्रिका बाहेरगावी पाठविल्या गेल्या. सोबतच गावातही वाटल्या. लग्न धुमधडाक्यात सतराशे- अठराशे लोकांच्या उपस्थितीत मस्तपैकी करू, याचा वर आणि वधू दोन्ही घरी आनंद ! त्यात कोरोनाचे परत विघ्न आले आणि सारेच गणित बिघडले. मंगल कार्यालय, कॅटरर्स यांना ॲडव्हान्स दिले. कपडे, सोने दागिन्यांची खरेदी झाली; पण जाचक नियमांनुसार ५० संख्येत लग्न कसे पार पाडायचे, ही चिंता साऱ्यांना सतावू लागली आहे. यजमानांसोबतच निमंत्रितही गोत्यात येत आहेत. आपण सहपरिवार लग्नात गेलो तर यजमान संकटात येणार, यामुळे निमंत्रितच फोनने यजमानांना 'आम्ही लग्नात यायचे काय?' अशी विचारणा करू लागले आहेत. त्यावर याचे उत्तर असते या ! पण एकटेच ! हे काल्पनिक नाही वास्तव आहे. अशी विचित्र स्थिती कोरोनाने आणली आहे.