शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

पत्रिका तर मिळाली; पण लग्नाला जायचे की नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

बल्लारपूर : कोरोना लोकांना स्वस्त बसू देत नाही. त्याच्या भयाने चिंतेत दिवस ढकलावे लागत आहेत. ज्यांच्या घरात लग्नादी कार्यक्रम ...

बल्लारपूर : कोरोना लोकांना स्वस्त बसू देत नाही. त्याच्या भयाने चिंतेत दिवस ढकलावे लागत आहेत. ज्यांच्या घरात लग्नादी कार्यक्रम ठरले आहे, त्यांच्यापुढे नाना अडचणी येत आहेत. सोबतच यजमानांनी आपल्या नातेवाईक, परिचित यांना निमंत्रित केले आहे; मात्र तेही लग्नाला यायचे की नाही, या प्रश्‍नाने ग्रासले आहेत. कारण ५० हून अधिक लोकांची उपस्थिती लग्नप्रसंगी नको, ही प्रशासकीय व्यवस्थेने घालून दिलेली अट आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दिवाळीपासून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले. सोबतच लग्न जोडणीला वेग आला. निमंत्रणाच्या चारशे-पाचशे पत्रिका बाहेरगावी पाठविल्या गेल्या. सोबतच गावातही वाटल्या. लग्न धुमधडाक्यात सतराशे- अठराशे लोकांच्या उपस्थितीत मस्तपैकी करू, याचा वर आणि वधू दोन्ही घरी आनंद ! त्यात कोरोनाचे परत विघ्न आले आणि सारेच गणित बिघडले. मंगल कार्यालय, कॅटरर्स यांना ॲडव्हान्स दिले. कपडे, सोने दागिन्यांची खरेदी झाली; पण जाचक नियमांनुसार ५० संख्येत लग्न कसे पार पाडायचे, ही चिंता साऱ्यांना सतावू लागली आहे. यजमानांसोबतच निमंत्रितही गोत्यात येत आहेत. आपण सहपरिवार लग्नात गेलो तर यजमान संकटात येणार, यामुळे निमंत्रितच फोनने यजमानांना 'आम्ही लग्नात यायचे काय?' अशी विचारणा करू लागले आहेत. त्यावर याचे उत्तर असते या ! पण एकटेच ! हे काल्पनिक नाही वास्तव आहे. अशी विचित्र स्थिती कोरोनाने आणली आहे.