शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा निम्न पैनगंगा प्रकल्प दिवास्वप्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

कोरपना : विदर्भातील सिंचनाच्या क्षेत्रात द्वितीय क्रमांकावर असलेला निम पैनगंगा प्रकल्प अद्यापही रखडला आहे. त्यामुळे कोरपना, राजुरा या दुर्गम ...

कोरपना : विदर्भातील सिंचनाच्या क्षेत्रात द्वितीय क्रमांकावर असलेला निम पैनगंगा प्रकल्प अद्यापही रखडला आहे. त्यामुळे कोरपना, राजुरा या दुर्गम तालुक्यासह चंद्रपूर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेतजमीन सिंचनाखाली येणार होती. मात्र या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प दिवास्वप्नच ठरला आहे. यासाठी शासन व प्रशासनाची उदासीनता कारणीभूत ठरली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे होत असलेला निम्न पैनगंगा हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे २ लाख २७ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीला फायदा होणार आहे. यात यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यासह तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील शेतीलाही याचा लाभ होणार आहे. मात्र प्रकल्पाचे काम रखडण्यामागे केवळ शासनाची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. या प्रकल्पाचा खर्च १,४०० कोटीवरून ३० हजार कोटींवर गेला आहे. परंतु प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू करण्यात कुठल्याही हालचाली नाही.

३५० कोटी रुपये खर्च

या प्रकल्पावर आजवर ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. १,८०० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. जून २०११ मध्ये धरणाचे सुरू झालेले काम ७ मे २०१२ पासून बुडीत क्षेत्रातील धरण विरोधी समितीच्या विरोधानंतर बंद पडले. ते आज सात ते आठ वर्ष उलटूनही सुरू झाले नाही. त्यामुळे या ठिकाणी केवळ पिल्लरचे खांब उभे दिसतात. शासनाच्या पैशाचा ही चुराडा झालेला दिसतो. ब्रिटिश काळात नियोजनात असलेला प्रकल्प आहे. यानंतरच्या अनेक धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र हा प्रकल्प राजकीय इच्छाशक्तीअभावी अडकलेला आहे. राजकीय हेवेदावे सोडून प्रकल्प पूर्ण

होणे भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रकल्पाचे फायदे

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील ताडसावली गावाजवळ हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जलविद्युत निर्मिती करता येईल. तसेच नदी पट्ट्यातील भागातील शेती सिंचन, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, उद्योगधंदे यांना याचा फायदा होईल. पाण्याचे नियोजन योग्यरीत्या होऊन पिण्याच्या पाण्याची चांगली सोय निर्माण होईल.