घुग्घुस : दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. प्रेमातून विवाहाचे स्वप्न रंगविले. मात्र घरच्या मंडळीचा विरोध असल्याने स्वप्न भंगणार असे वाटले. त्यामुळे दोघांनीही समाज व लोकप्रतिनिधीकडे धाव घेतली आणि त्यांच्या सहकार्याने दोघेही विवाहबध्द झाले.घुग्घुसजवळच्या नकोडा गावातील कमल येलय्या कनकम या युवकाचे घराशेजारी राहणाऱ्या पूजा नरसिंग तांद्रा हिच्याशी गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी आयुष्यभर एकत्रित राहण्याचे स्वप्न रंगविले. मात्र त्यात घरच्या मंडळीकडून विरोध होत असल्यामुळे आपले स्वप्न भंगणार या भीतीने त्या दोघानीही जि.प. सदस्य ब्रिजभुषण पाझारे, समाज कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्या ममता उरकुडे यांच्या भेटी घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी गावातील नागरिकांची बैठक घेतली आणि त्या दोघांच्याही आई-वडिलांना बोलवून लग्न लावण्याची समजूत घातल. मात्र त्यांनी विरोध दर्शविल्यामुळे प्रकरण घुग्घुस पोलीस ठाण्यापर्यंत नेले. ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी मध्यस्थी केली आणि दोघांनीही लग्नास संमती दिली असता नकोडा येथील जानकीराम मंदिरात विवाह सोहळा पार पडला.यावेळी सरपंच तनुश्रई बांदुरकर, पोलीस पाटील सुमन ठमके, माजी सरपंच ऋषी कोवे, माजी उपसरपंच किरण बांदुरकर, ग्रा.पं. सदस्य अंजया गोनपेलीवार, नरेश एलक्कापेली, आनंद झाडे, कामगार नेता चंदू ताला, रमेश रास्पेली, विकास पाटील, आसम्पेल्ली राजू, कंपा राजया आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रेमीयुगुलाचा विवाह
By admin | Updated: November 16, 2015 00:54 IST