शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

९३ हजार बहीण-भावाच्या प्रेमाला डाक विभागाने बांधले रेशीम बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST

चंद्रपूर : बहीण भावाच्या नात्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पोस्ट कार्यालय नेहमीच महत्त्वाचा धागा ठरले आहे. यावर्षीही सुटीच्या दिवशीही अविरत ...

चंद्रपूर : बहीण भावाच्या नात्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पोस्ट कार्यालय नेहमीच महत्त्वाचा धागा ठरले आहे. यावर्षीही सुटीच्या दिवशीही अविरत सेवा देत पोस्टमनने भाऊ-बहीणींमध्ये आत्मिक प्रेमाचे नाते जपले आहे. यावर्षी तब्बल ९३ हजार हजार राखी जिल्हा, देश तसेच देशसेवा करणाऱ्या सैनिक भावांना पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्ट विभागाने केले आहे.

प्रत्येक वर्षी बहिणीला भावाकडे आणि भावाला बहिणीकडे जाणे शक्य होत नाही. कोरोना संकट तसेच येणे अशक्य असल्यामुळे असंख्य बहिणींनी यावर्षीही डाकेने राख्या पाठविणे पसंत केले आहे. पोस्ट विभागाने तब्बल ६० हजार राख्या चंद्रपूर येथून देशातील विविध भागात पाठविल्या आहे. तर शनिवार तसेच रविवारी १८ हजार राख्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात वितरण केले आहे. विशेष म्हणजे, देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या भावांनाही त्यांच्या बहिणीची राखी पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्टमनने केले आहे. यावर्षी तब्बल १५ हजार राख्या चंद्रपूर जिल्ह्यातून बाॅर्डरवर पोहचविण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे निर्बंध आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पोस्टाने राख्या पाठविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोस्ट विभागानेही तत्परतेने भावांपर्यंत राख्या पोहचवित भाऊ-बहीणींच्या प्रेमात आणखीच आत्मियता निर्माण केली आहे. यासाठी सिनिअर पोस्टमास्टर कोमकोमवार, असिस्टंट पोस्टमास्टर (मेल) प्रशांत कन्नमवार, मेल शार्टर राजू मत्ते यांच्यासह जिल्ह्यातील विविभ गावातील पोस्टमनने आपले काम चोखपणे बजावले आहे.

बाॅक्स

चंद्रपूरात १८ हजार राख्यांचे वितरण

चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १८ हजार राख्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, शनिवारपर्यंत १० हजार तसेच रविवारी दुपारपर्यंत ८ हजार राख्या पोहचविण्यात पोस्टमनने दिवसरात्र एक करीत बहीण- भावाच्या नात्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

बाॅक्स

बाहेरगावी पाठविल्या ६० हजार राख्या

भारतीय डाक विभागाने ६० हजार राख्या बाहेर जिल्ह्यासह इतर राज्यात पाठविल्या आहेत. बहिणी भागाचे हे नाते जोपासण्यासाठी डाक विभागाकडून आधार दिला जात आहे. कोरोना संकटामुळे यावर्षीही अनेक बहिणी भावाच्या भेटीला जाऊ शकल्या नाही. त्यांच्यासाठी पोस्टमनने भावाची भूमिका बजावली आहे.

बाॅक्स

पोस्ट कार्यालय -४९३

एकूण पोस्टमॅन ३५०

कोट

रक्षाबंधणाचा सण महत्त्वाचा असतो. त्यामुळे पोस्ट कार्यालयाने यावर्षीही सुटीच्या दिवसी राख्या घरपोच वितरणाचे काम केले आहे. जिल्ह्यात ३५० पोस्टमनने हे कर्तव्य बजावले आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोना संकटामुळे अनेकांनी गावी जाणे टाळले. त्यामुळे पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात राख्या वितरणाचे काम होते. ते सक्षमपणे सर्वांनी बजावले.

-प्रशांत कन्नमवार

असिस्टंट पोस्टमास्टर मेल, चंद्रपूर