शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

१ लाखावर विद्यार्थ्यांची पुस्तके हरविली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत ...

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक दिली जातात. यावर्षी पहिले सत्र अर्धेअधिक संपले असतानाही अद्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकच आले नाही. त्यामुळे पुस्तके कुठे हरविली, असा प्रश्न सध्या १ लाख ५० हजारावंर विद्यार्थ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईनद्वारे शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पुस्तक नसल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे.

यावर्षी कोरोनामुळे प्राथमिकचे वर्ग सुरू झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईनच्या माध्यमातून कसेबसे शिकविले जात आहे. यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शासनाकडून मिळणारे मोफत पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही पोहचलेच नाही. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणांना विचारणा केली असता पुस्तके तालुकास्तरापर्यंत पोहचल्याची. माहिती आहे. मात्र तालुकापासून केंद्रापर्यंत आणि त्यानंतर शाळेपर्यंत पुस्तक पोहचलेच नसल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काची असलेली पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहचून शैक्षणिक नुकसान टाळणे सध्यातरी गरजेचे आहे.

बाॅक्स

एकूण शाळा -२५०४

शासकीय शाळा १६३७

खासगी अनुदानित ४८९

खासगी विनाअनुदानित ३७८

लाभार्थी विद्यार्थी १ लाख ५७५७८

यावर्षीची मागणी-१ लाख ५७५७८ (संच)

मागील वर्षातील मागणी -१लाख ६१ हजार संच

बाॅक्स

वाहतुकीचा असा आहे दर

बालभारती ते तालुकास्तरापर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी प्रति मेट्रिक टन प्रतिकिलोमीट ११.७५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तर तालुकास्तरापासून केंद्र शाळेपर्यंत प्रति किलोग्रॅम दर १.२० रुपये निश्चित करण्यात आला. १ जून रोजी हा करार झाला असून पुस्तके कधीपर्यंत पोहचतील याबाबत कुणीही बोलायला तयार नाही.

कोट

कोरोनामुळे प्राथमिकच्या शाळा अद्यापही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र यावर्षी पहिले सत्र अर्धेअधिक संपले असतानाही विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक पोहचलेच नाही. पुस्तक पोहचले असते तर किमान विद्यार्थी वाचून त्यातून काही बोध घेऊ शकले असते.

- प्रकाश चुनारकर

सहकार्यवाह

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक