शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१ लाखावर विद्यार्थ्यांची पुस्तके हरविली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत ...

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक दिली जातात. यावर्षी पहिले सत्र अर्धेअधिक संपले असतानाही अद्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकच आले नाही. त्यामुळे पुस्तके कुठे हरविली, असा प्रश्न सध्या १ लाख ५० हजारावंर विद्यार्थ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईनद्वारे शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पुस्तक नसल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे.

यावर्षी कोरोनामुळे प्राथमिकचे वर्ग सुरू झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईनच्या माध्यमातून कसेबसे शिकविले जात आहे. यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शासनाकडून मिळणारे मोफत पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही पोहचलेच नाही. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणांना विचारणा केली असता पुस्तके तालुकास्तरापर्यंत पोहचल्याची. माहिती आहे. मात्र तालुकापासून केंद्रापर्यंत आणि त्यानंतर शाळेपर्यंत पुस्तक पोहचलेच नसल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काची असलेली पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहचून शैक्षणिक नुकसान टाळणे सध्यातरी गरजेचे आहे.

बाॅक्स

एकूण शाळा -२५०४

शासकीय शाळा १६३७

खासगी अनुदानित ४८९

खासगी विनाअनुदानित ३७८

लाभार्थी विद्यार्थी १ लाख ५७५७८

यावर्षीची मागणी-१ लाख ५७५७८ (संच)

मागील वर्षातील मागणी -१लाख ६१ हजार संच

बाॅक्स

वाहतुकीचा असा आहे दर

बालभारती ते तालुकास्तरापर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी प्रति मेट्रिक टन प्रतिकिलोमीट ११.७५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तर तालुकास्तरापासून केंद्र शाळेपर्यंत प्रति किलोग्रॅम दर १.२० रुपये निश्चित करण्यात आला. १ जून रोजी हा करार झाला असून पुस्तके कधीपर्यंत पोहचतील याबाबत कुणीही बोलायला तयार नाही.

कोट

कोरोनामुळे प्राथमिकच्या शाळा अद्यापही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र यावर्षी पहिले सत्र अर्धेअधिक संपले असतानाही विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक पोहचलेच नाही. पुस्तक पोहचले असते तर किमान विद्यार्थी वाचून त्यातून काही बोध घेऊ शकले असते.

- प्रकाश चुनारकर

सहकार्यवाह

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक