शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

१ लाखावर विद्यार्थ्यांची पुस्तके हरविली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत ...

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक दिली जातात. यावर्षी पहिले सत्र अर्धेअधिक संपले असतानाही अद्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकच आले नाही. त्यामुळे पुस्तके कुठे हरविली, असा प्रश्न सध्या १ लाख ५० हजारावंर विद्यार्थ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईनद्वारे शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पुस्तक नसल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे.

यावर्षी कोरोनामुळे प्राथमिकचे वर्ग सुरू झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईनच्या माध्यमातून कसेबसे शिकविले जात आहे. यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शासनाकडून मिळणारे मोफत पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही पोहचलेच नाही. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणांना विचारणा केली असता पुस्तके तालुकास्तरापर्यंत पोहचल्याची. माहिती आहे. मात्र तालुकापासून केंद्रापर्यंत आणि त्यानंतर शाळेपर्यंत पुस्तक पोहचलेच नसल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काची असलेली पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहचून शैक्षणिक नुकसान टाळणे सध्यातरी गरजेचे आहे.

बाॅक्स

एकूण शाळा -२५०४

शासकीय शाळा १६३७

खासगी अनुदानित ४८९

खासगी विनाअनुदानित ३७८

लाभार्थी विद्यार्थी १ लाख ५७५७८

यावर्षीची मागणी-१ लाख ५७५७८ (संच)

मागील वर्षातील मागणी -१लाख ६१ हजार संच

बाॅक्स

वाहतुकीचा असा आहे दर

बालभारती ते तालुकास्तरापर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी प्रति मेट्रिक टन प्रतिकिलोमीट ११.७५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तर तालुकास्तरापासून केंद्र शाळेपर्यंत प्रति किलोग्रॅम दर १.२० रुपये निश्चित करण्यात आला. १ जून रोजी हा करार झाला असून पुस्तके कधीपर्यंत पोहचतील याबाबत कुणीही बोलायला तयार नाही.

कोट

कोरोनामुळे प्राथमिकच्या शाळा अद्यापही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र यावर्षी पहिले सत्र अर्धेअधिक संपले असतानाही विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक पोहचलेच नाही. पुस्तक पोहचले असते तर किमान विद्यार्थी वाचून त्यातून काही बोध घेऊ शकले असते.

- प्रकाश चुनारकर

सहकार्यवाह

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक