शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

कृषी पंप वीज जोडणीअभावी अडीच लाख शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:10 IST

राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी मुदतीत न जोडून दिल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.

ठळक मुद्देवीज नियामक आयोगाकडे तक्रार महावितरणकडूनच कायद्याचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी मुदतीत न जोडून दिल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची चौकशी करुन वीज वितरण कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी भद्रावती तालुक्यातील वडेगाव येथील माधव जिवतोडे यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षाकडे तक्रारीद्वारे केली आहे.मार्च २०१८ अखेरपर्यंत राज्यात कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरुन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या दोन लाख ४९ हजार ३५८ शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने अद्याप वीज जोडणी दिली नाही. शेतकऱ्यांनी शेतात विहिर, हातपंप, नाले व शेत तलावावर कृषी पंप बसविले. शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी रक्कमही भरली. परंतु महावितरणकडून मुदतीत वीज पुरवठा देण्यात आला नाही. वीज अधिनियम २००३ अन्वये शेतकऱ्यांनी वीज पुरवठा मिळविण्यासाठी महावितरण कंपनीकडे अर्ज केल्यावर कलम ४३ (१) नुसार एक महिन्याचे आत वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे. पण महावितरणने वीज कायद्याचे उल्लंघन केले. वीज अधिनियम २००३ मधील कलम ५६ (१) अन्वये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता करून ग्राहकांचे संरक्षण करण्यास महावितरण कंपनी अपयशी ठरल्याने कलम ५६ (२) नुसार बाधीत शेतकरी नुकसान भरपाईकरिता पात्र आहेत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वीज जोडणी प्रलंबीत ठेवल्याने कायद्यातील ४३ (३) नुसार प्रती दिवसासाठी एक हजार रुपयाप्रमाणे राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना तब्बल ९१ अब्ज १ कोटी ५६ लाख ७० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागेल, असा दावा माधव जिवतोडे यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे तक्रारीद्वारे केला आहे.

टॅग्स :agricultureशेती