शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कृषी पंप वीज जोडणीअभावी अडीच लाख शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:10 IST

राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी मुदतीत न जोडून दिल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.

ठळक मुद्देवीज नियामक आयोगाकडे तक्रार महावितरणकडूनच कायद्याचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी मुदतीत न जोडून दिल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची चौकशी करुन वीज वितरण कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी भद्रावती तालुक्यातील वडेगाव येथील माधव जिवतोडे यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षाकडे तक्रारीद्वारे केली आहे.मार्च २०१८ अखेरपर्यंत राज्यात कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरुन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या दोन लाख ४९ हजार ३५८ शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने अद्याप वीज जोडणी दिली नाही. शेतकऱ्यांनी शेतात विहिर, हातपंप, नाले व शेत तलावावर कृषी पंप बसविले. शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी रक्कमही भरली. परंतु महावितरणकडून मुदतीत वीज पुरवठा देण्यात आला नाही. वीज अधिनियम २००३ अन्वये शेतकऱ्यांनी वीज पुरवठा मिळविण्यासाठी महावितरण कंपनीकडे अर्ज केल्यावर कलम ४३ (१) नुसार एक महिन्याचे आत वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे. पण महावितरणने वीज कायद्याचे उल्लंघन केले. वीज अधिनियम २००३ मधील कलम ५६ (१) अन्वये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता करून ग्राहकांचे संरक्षण करण्यास महावितरण कंपनी अपयशी ठरल्याने कलम ५६ (२) नुसार बाधीत शेतकरी नुकसान भरपाईकरिता पात्र आहेत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वीज जोडणी प्रलंबीत ठेवल्याने कायद्यातील ४३ (३) नुसार प्रती दिवसासाठी एक हजार रुपयाप्रमाणे राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना तब्बल ९१ अब्ज १ कोटी ५६ लाख ७० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागेल, असा दावा माधव जिवतोडे यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे तक्रारीद्वारे केला आहे.

टॅग्स :agricultureशेती