शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

शासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: January 3, 2015 22:59 IST

बल्लारपूर तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसून ते जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणाहून

कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसून ते जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करीत आहेत. परिणामी जनतेची कामे खोळंबत आहेत. जनतेला कामासाठी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. एवढेच नव्हे तर त्यांच्या शोधासाठी आर्थिक खर्च व पायपीट करावी लागत आहे. शासनाच्या अटी व शर्थींचा भंग करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याची मागणी जनतेकडून होत असतानाही वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत.राज्यात भाजपाचे सरकार असून बेशिस्त कर्मचाऱ्यांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी केली जात आहे. आपल्या सोयीनुसार कार्य करणाऱ्या बेताल कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा घोषणा करणाऱ्या जनप्रतिनिधींकडूनच त्यांची पाठराखण केल्या जात असल्याचा समज जनतेत पसरला आहे. शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहून जनतेची कामे अग्रक्रमाने पार पाडतील, असा समज आता फोल ठरत आहे.ग्रामीण भागातील शाळेतील सर्व शिक्षक जिल्हा व तालुक्यातून ये-जा करीत आहेत. शाळेत १० वाजता येणे व पाच वाजता परत जाण्यासाठी त्यांची घाई असते. केवळ घराची प्रतिक्षा करणाऱ्या शिक्षकांकडून उत्कृष्ट ज्ञानार्जनाच्या कार्याची अपेक्षा पालक कसे करतील. मुख्यालयी राहात असल्याचे खोटे दाखले, ग्रा.पं. व शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून त्यांना चिरीमिरी देऊन मिळवितात. घरभाडे भत्ता व नक्षलभत्ता मिळवून शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचे काम शिक्षकांकडून होत आहे. हा सर्व प्रकार संवर्ग विकास अधिकाऱ्यांना माहित असून देखील त्यांचा घरभाडे भत्ता व नक्षलभत्ता कपात करण्याची हिंमत ते करीत नाहीत. शासनाच्या सेवेत रूजु होताना कर्मचारी मुख्यालयी राहून काम करण्याची अट असते. त्यानुसार त्यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अनागोंदी कारभार सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये जनतेचा व शासनाचा दूवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवकांनी तर कहर केला आहे. दुपारी १२ वाजता येतो व तीन वाजता स्वगावी परत जातो. तीन तासात गावाचा विकास आम्हीच करतो, अशी शेखी मिरविण्यातही ते कमी करीत नाही. कोणताही ग्रामसेवक मुख्यालयी राहात नाही. एवढेच नव्हे तर तो ग्रामसभेसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमातही ते अनुपस्थित असल्याचे अनेक दाखले आहेत. त्यांना गाव, गाव विकास, गावाची कामे, जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. मात्र ग्रा.पं.चा आर्थिक व्यवहार स्वत:कडे ठेवून झोळी भरण्यात ते कमी करीत नाही. गाव विकासाची धूरा ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच मुख्यालयी न राहता जिल्हास्थळावरून ये-जा करतात. आठवड्यातून एक ते दोन दिवस ग्रा.पं. मध्ये दिसतात. इतर दिवशी कार्यालयीन कामासाठी वरिष्ठांच्या आदेशाने बाहेर असल्याची बतावणी करतात. गावातील विकासात्मक कामात ठेकेदारासोबत संगनमत करून कमिशन कमविण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाहीत. या कमिशनमध्ये वरिष्ठांचा वाटा असल्याची उघड भाषा करण्यात कमी करत नाहीत. ग्रामसेवक बाहेरून ये-जा करीत असल्याच्या अनेक तक्रारी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केल्या असताना त्यांचेवर कारवाई का करीत नाहीत. असा संतप्त सवाल जनता करीत आहे. (वार्ताहर)