शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

परसोडी धान्य दुकानदाराकडून नागरिकांची लूट

By admin | Updated: January 15, 2015 22:49 IST

येथून आठ किलोमिटर अंतरावर असलेल्या परसोडी येथील धान्य दुकानदार गावकऱ्यांना जादा पैसे वसुल करून त्रास देत असल्याची तक्रार गोंडपिपरी तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

कोठारी: येथून आठ किलोमिटर अंतरावर असलेल्या परसोडी येथील धान्य दुकानदार गावकऱ्यांना जादा पैसे वसुल करून त्रास देत असल्याची तक्रार गोंडपिपरी तहसिलदारांकडे करण्यात आली आहे. सदर धान्य दुकानदाराचे दुकान रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथे २०-२५ वर्षापासून सरकारी स्वस्त धान्य दुकान चालविण्यात आहे. त्यांच्याकडे केरोसीन वाटपाचा परवाना आहे. सदर दुकानदार गावकऱ्यांना सरकारी दरापेक्षा जादा दराने धान्याचे वितरण करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. गावकऱ्यांच्या राशन कार्डावर नमुद दर्शविल्या युनिटप्रमाणे कधीही धान्य देत नाही. दुकानासमोर भावफलक लावण्यात आलेला नाही. त्याप्रमाणे धान्य साठ्याचा फलकही लावण्यात आला नाही. ग्राहकांना सदर दुकानदार धान्य खरेदीची पावती देत नाही. पावतीची मागणी केल्यास ग्राहकांसोबत असभ्य शब्दात बोलून त्याची मानहाणी करतो, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत गावकऱ्यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली असता केवळ चौकशीचा फार्स करीत धान्य दुकानदारांला वाचविण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जातो. योग्य, निष्पक्ष चौकशी करण्यास टाळाटाळ करतो. याबाबत तक्रारीची दखल घेत तहसिलदार यांनी नुकतीच दुकानदारांची नायब तहसिलदार शेख अब्दुला यांचेमार्फत चौकशी केली. मात्र त्यात त्यांनी दुकानदारांस झुकते माप दिल्याचा संशय सुरेंद्र चोथले यांनी वर्तविला आहे. चौकशी अधिकाऱ्याने ग्रामपंचायतीमध्ये किंवा सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडे चौकशी करण्यापेक्षा दुकानदाराच्या घरी बसून गावकऱ्यांचे बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. धान्य दुकानदाराच्या जाचाला कंटाळलेले व दुकानदाराच्या भितीपोटी नागरिक मुक्तपणे दुकानदाराच्या घरी बयाण देण्यास कचरत होते.सदर दुकानदाराकडे केरोसीन वाटप करण्याचा परवाना आहे. गरीबांचे केरोसीन धनदांडग्यांना जादा दरात विकताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वत: गोरखधंदा करीत गावकऱ्यांची पिळवणूक करण्याचा सपाटा या दुकानदाराने धरल्याच्या अनेक तक्रारी शासनदरबारी आहेत. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखलच घेतली जात नाही. (वार्ताहर)