शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्रात नागरिकांची लूट

By admin | Updated: July 14, 2014 23:52 IST

शासनातर्फे मोठ्या गावात सेतू केंद्र स्थापन करून ग्रामीण नागरिकांना गावातच शासकीय कागदपत्र मिळण्यासाठी सोय केली आहे. मात्र येथे नागरिकांची लुट सुरु असून वाट्टेल तसे दर नागरिकांकडून वसुल केले जात आहे.

तळोधी (बा.) : शासनातर्फे मोठ्या गावात सेतू केंद्र स्थापन करून ग्रामीण नागरिकांना गावातच शासकीय कागदपत्र मिळण्यासाठी सोय केली आहे. मात्र येथे नागरिकांची लुट सुरु असून वाट्टेल तसे दर नागरिकांकडून वसुल केले जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.पूर्वी तहसील कार्यालयातून नागरिकांना प्रमाणपत्र मिळत होते. मात्र यात नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच कागदपत्र वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या होत्या. यापासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये सेतू केंद्र स्थापन करण्यात आले. मात्र आता काही केंद्रातून नागरिकांची लूट सुरु आहे. त्यामुळे या केंद्राकडे शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.गावातील अनेक सेतू केंद्रामध्ये दरपत्रक नसल्याने नागरिकांकडून वाट्टेल तेवढे दर आकारल्या जात आहे. या सेतू केंद्रातून उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, वय अधिवास, जात, राष्ट्रीयत्त्व, जन्म, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महसूल प्रमाणपत्र. आठ (अ), सात-बारा अशा अनेक प्रकारचे प्रमाणपत्र कमी वेळात, मिळून नागरिकांच्या वेळेची व आर्थिक बचत होते. परंतु ग्रामीण भागातील काही सेतू केंद्रात प्रमाणपत्राच्या शासकीय दराचे दर पत्रक न लावता ग्राहकांकडून लुट सुरू आहे. सध्या विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी या केंद्रावर गर्दी करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून सुद्धा काही केंद्र चालक आर्थिक लुट करीत आहेत. ग्रामीण भागातील मान्यताप्राप्त सेतूकेंद्रात नागरिकांची आर्थिक लूट होवू नये, यासाठी शासकीय दर पत्रकानुसार नागरिकांनी प्रमाणपत्र हस्तगत करावे. यानुसारच नागरिकांनी सेतू केंद्रात पैसे देऊन रितसर पावती घ्यावी. ज्या सेतू केंद्रात पावती दिली जात नाही त्या सेतू केंद्राची जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी, अशी विनंती वामनराव बारसागडे यांनी केली आहे. (वार्ताहर)