शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

Lok Sabha Election 2019; मतदारांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी २ हजार १९३ मतदार केंद्रात गुरुवारी मतदान पार पडले. लोकशाहीचा ...

ठळक मुद्देरांगोळी काढून मतदारांचे स्वागतआबालवृद्धांसह तरुणांनीही बजावला प्रथमच अधिकारमतदार करणाऱ्यांमध्ये उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी २ हजार १९३ मतदार केंद्रात गुरुवारी मतदान पार पडले. लोकशाहीचा उत्सव असलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये आबालवृद्धांसह मोठ्या प्रमाणात तरुणांनी आपला हक्क बजावला. विशेष म्हणजे, प्रथमत: मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता बघायला मिळाली. लोकशाही आणखी बळकट करण्यासाठी दिव्यांग, अंध मतदारांनीही आपला हक्क बजावला. मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्साहात काही त्रुट्याही होत्या. यावर काही मतदारांनी संतापही व्यक्त केला.२४ तासात मतदारांनी केले ९०६ कॉलचंदपूर : लोकसभा मतदानासाठी मतदारांची तारांबळ उडू नये यासाठी प्रशासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईनचा अनेक मतदारांनी आधार घेतला. विशेष म्हणजे, मागील २४ तासामध्ये तब्बल ९०६ जणांनी या हेल्पलाईवर फोन करून आपल्या नावाची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, गुुरुवारी मतदानाच्या दिवशी ३६३ कॉल १९५० या हेल्पलाईनवर आल्याची माहिती जिल्हा मदत केंद्राचे सहाय्यक संजय डांगे यांनी दिली.एक तास उशिराने सुरु झाले मतदान केंद्रचंद्रपूर येथील १६५ क्रमांकाचे माऊंट कॉन्व्हेंट मतदान केंद्र सुरु होताच इव्हीमशीमध्ये बिघाड आला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ती मशीन जिल्हा कार्यालयाला पाठवून दुसरी मशीन मागविली. त्यामुळे या केंद्रावरील मतदान तब्बल एक तास उशिराने सुरु करण्यात आले. तर रामनगर येथील मतदार केंद्रावरही मतदारांमध्ये गोंधळ झाल्याने काही वेळासाठी मतदान थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.मतदारही अपडेट नाहीमागील काही महिन्यांपूर्वीपासून जिल्हा प्रशासनाने मतदान यादीत नाव नोंदविण्याची मोहीम हाती घेतली होती. एवढेच नाही तर नाव, पत्ता, गाव आदींच्या दुरुस्तीसाठीही मतदारांना आवाहन केले. मात्र यावेळी बहुतांश मतदारांनी प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आहे त्याच स्थितीत मतदार याद्या पुन्हा प्रकाशित झाल्याने हा गोंधळ उडाला. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर मतदारांनी माहिती जाणून घेतली असती तर मनस्ताप झाला नसता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019