शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

Lok Sabha Election 2019; प्रमुख उमेदवारांचे शाब्दिक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:25 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, ...

ठळक मुद्देलोकसभेचा आखाडा : पत्रकार परिषदेतून आरोपांच्या फैरी

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, तर भाजप उमेदवाराने विकासाची गाथा वाचून आरोपाचे खंडन करतानाच भाजपची उमेदवारी घरबसल्या येते, तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत जावून भीक मागावी लागते, अशा शब्दात आरोपांच्या फैरी झाडणे सुरू झाले आहे. या आरोपांमुळे निवडणुकीला वेगळे वळण येत असले तरी मतदार हे आरोप किती गांभिर्याने घेतात हे बघण्यासारखे आहे.न केलेल्या कामांचेही श्रेय लाटतात या क्षेत्राचे खासदार- सुरेश धानोरकरचंद्रपूर : काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार हंसराज अहीर यांच्यावर थेट आरोप केले. चंद्रपूर मतदार संघाचा २० वर्षांपासून विकास झाला नाही. ६० हजार लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री सांगत आहेत. खासदार या नात्याने एकही उल्लेखनीय काम केले नाही. या पूर्वीच्या निवडणुकीत तिरंगी लढती झाल्याने ते निवडणूक जिंकत आले आहे. ते युतीचे खासदार असताना त्यांच्याकडून नेहमीच सापत्न वागणूक मिळाली. परिणामी युतीचा आमदार असतानाही आंदोलने करावी लागली, अशी टीकाही धानोरकर यांनी यावेळी केली. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी केलेली युती पटली नाही. आधी आरोप करायचे आणि नंतर एकत्र यायचे हे पटले नाही. आपण अस्वस्थ झालो. लोकसेवा करायची म्हणून शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसने काही गटाचा विरोध असतानाही तिकीट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलून तिकीट मिळूवन दिली.भाजपमध्ये घरबसल्या तिकीट येते काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते - हंसराज अहीरचंद्रपूर : भाजपामध्ये विकासकामे व पक्षनिष्ठेच्या आधारावर निवडणुकीची उमेदवारी मिळते तर काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते, असा प्रहार भाजपा उमेदवार हंसराज अहीर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला. मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालीत. या जोरावरच उमेदवारी दिली. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे जावून भाजपाचा ए.बी. फॉर्म आणला आणि तो आपणाला घरी आणून दिला. काँग्रेसच्या तिकीटासाठी दिल्लीत भीक मागावी लागते. भाजपमध्ये तिकीट घरी येते, अशा शब्दात अहीर यांनी काँग्रेसवर पलटवार केला. याप्रसंगी ना. मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे १९५१-५२ कालखंडातील प्रश्न आजही पुढे करीत आहे. यात काँग्रेसचे यश की अपयश हे जनतेने ठरावे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जातीवर आधारित मतदान होत नाही. जनता विकासावर मतदान करते. भाजपाचे हेच धोरण आहे असून आम्ही देशासाठी मत मागतो, असा टोलाही ना. मुनंगटीवार यांनी यावेळी हाणला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक