शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
4
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
5
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
6
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
7
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
8
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
9
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
10
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
11
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
12
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
13
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
14
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
15
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
16
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
18
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
19
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
20
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

Lok Sabha Election 2019; प्रमुख उमेदवारांचे शाब्दिक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:25 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, ...

ठळक मुद्देलोकसभेचा आखाडा : पत्रकार परिषदेतून आरोपांच्या फैरी

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, तर भाजप उमेदवाराने विकासाची गाथा वाचून आरोपाचे खंडन करतानाच भाजपची उमेदवारी घरबसल्या येते, तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत जावून भीक मागावी लागते, अशा शब्दात आरोपांच्या फैरी झाडणे सुरू झाले आहे. या आरोपांमुळे निवडणुकीला वेगळे वळण येत असले तरी मतदार हे आरोप किती गांभिर्याने घेतात हे बघण्यासारखे आहे.न केलेल्या कामांचेही श्रेय लाटतात या क्षेत्राचे खासदार- सुरेश धानोरकरचंद्रपूर : काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार हंसराज अहीर यांच्यावर थेट आरोप केले. चंद्रपूर मतदार संघाचा २० वर्षांपासून विकास झाला नाही. ६० हजार लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री सांगत आहेत. खासदार या नात्याने एकही उल्लेखनीय काम केले नाही. या पूर्वीच्या निवडणुकीत तिरंगी लढती झाल्याने ते निवडणूक जिंकत आले आहे. ते युतीचे खासदार असताना त्यांच्याकडून नेहमीच सापत्न वागणूक मिळाली. परिणामी युतीचा आमदार असतानाही आंदोलने करावी लागली, अशी टीकाही धानोरकर यांनी यावेळी केली. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी केलेली युती पटली नाही. आधी आरोप करायचे आणि नंतर एकत्र यायचे हे पटले नाही. आपण अस्वस्थ झालो. लोकसेवा करायची म्हणून शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसने काही गटाचा विरोध असतानाही तिकीट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलून तिकीट मिळूवन दिली.भाजपमध्ये घरबसल्या तिकीट येते काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते - हंसराज अहीरचंद्रपूर : भाजपामध्ये विकासकामे व पक्षनिष्ठेच्या आधारावर निवडणुकीची उमेदवारी मिळते तर काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते, असा प्रहार भाजपा उमेदवार हंसराज अहीर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला. मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालीत. या जोरावरच उमेदवारी दिली. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे जावून भाजपाचा ए.बी. फॉर्म आणला आणि तो आपणाला घरी आणून दिला. काँग्रेसच्या तिकीटासाठी दिल्लीत भीक मागावी लागते. भाजपमध्ये तिकीट घरी येते, अशा शब्दात अहीर यांनी काँग्रेसवर पलटवार केला. याप्रसंगी ना. मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे १९५१-५२ कालखंडातील प्रश्न आजही पुढे करीत आहे. यात काँग्रेसचे यश की अपयश हे जनतेने ठरावे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जातीवर आधारित मतदान होत नाही. जनता विकासावर मतदान करते. भाजपाचे हेच धोरण आहे असून आम्ही देशासाठी मत मागतो, असा टोलाही ना. मुनंगटीवार यांनी यावेळी हाणला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक