शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; प्रमुख उमेदवारांचे शाब्दिक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:25 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, ...

ठळक मुद्देलोकसभेचा आखाडा : पत्रकार परिषदेतून आरोपांच्या फैरी

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, तर भाजप उमेदवाराने विकासाची गाथा वाचून आरोपाचे खंडन करतानाच भाजपची उमेदवारी घरबसल्या येते, तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत जावून भीक मागावी लागते, अशा शब्दात आरोपांच्या फैरी झाडणे सुरू झाले आहे. या आरोपांमुळे निवडणुकीला वेगळे वळण येत असले तरी मतदार हे आरोप किती गांभिर्याने घेतात हे बघण्यासारखे आहे.न केलेल्या कामांचेही श्रेय लाटतात या क्षेत्राचे खासदार- सुरेश धानोरकरचंद्रपूर : काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार हंसराज अहीर यांच्यावर थेट आरोप केले. चंद्रपूर मतदार संघाचा २० वर्षांपासून विकास झाला नाही. ६० हजार लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री सांगत आहेत. खासदार या नात्याने एकही उल्लेखनीय काम केले नाही. या पूर्वीच्या निवडणुकीत तिरंगी लढती झाल्याने ते निवडणूक जिंकत आले आहे. ते युतीचे खासदार असताना त्यांच्याकडून नेहमीच सापत्न वागणूक मिळाली. परिणामी युतीचा आमदार असतानाही आंदोलने करावी लागली, अशी टीकाही धानोरकर यांनी यावेळी केली. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी केलेली युती पटली नाही. आधी आरोप करायचे आणि नंतर एकत्र यायचे हे पटले नाही. आपण अस्वस्थ झालो. लोकसेवा करायची म्हणून शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसने काही गटाचा विरोध असतानाही तिकीट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलून तिकीट मिळूवन दिली.भाजपमध्ये घरबसल्या तिकीट येते काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते - हंसराज अहीरचंद्रपूर : भाजपामध्ये विकासकामे व पक्षनिष्ठेच्या आधारावर निवडणुकीची उमेदवारी मिळते तर काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते, असा प्रहार भाजपा उमेदवार हंसराज अहीर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला. मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालीत. या जोरावरच उमेदवारी दिली. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे जावून भाजपाचा ए.बी. फॉर्म आणला आणि तो आपणाला घरी आणून दिला. काँग्रेसच्या तिकीटासाठी दिल्लीत भीक मागावी लागते. भाजपमध्ये तिकीट घरी येते, अशा शब्दात अहीर यांनी काँग्रेसवर पलटवार केला. याप्रसंगी ना. मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे १९५१-५२ कालखंडातील प्रश्न आजही पुढे करीत आहे. यात काँग्रेसचे यश की अपयश हे जनतेने ठरावे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जातीवर आधारित मतदान होत नाही. जनता विकासावर मतदान करते. भाजपाचे हेच धोरण आहे असून आम्ही देशासाठी मत मागतो, असा टोलाही ना. मुनंगटीवार यांनी यावेळी हाणला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक