शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; सीमावर्ती मतदारांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:17 IST

मागील अनेक वर्षे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा वाद अजूनही कायम आहे. या गावांतील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देवाद कायम : १४ गावांतील मतदार दोन्ही राज्यांचे रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : मागील अनेक वर्षे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा वाद अजूनही कायम आहे. या गावांतील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे.११ एप्रिलला देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील १४ गावे चंद्रपूर जिल्ह्यात येतात. पण न्यायालयाच्या आदेशानंतरी महाराष्ट्र सरकारने हा तिढा सोडविला नाही. चंद्रपूर- आर्णी व तेलंगणातील आदिलाबाद या दोन्ही लोकसभा क्षेत्रासाठी मतदान करणार काय, हा प्रश्न विचारला जात आहे.दोन्ही लोकसभा क्षेत्राचे मतदान हे पहिल्या टप्प्यातच आहे. सीमेवरील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. दोन्ही राज्यांच्या सोयीसुविधा लाभ घेतात. दोन्ही ग्रामपंचायतला मतदान करतात. दोन्ही राज्याचे सरपंच निवडतात. एकाच दिवशी मतदान असल्यामुळे या भागातील मतदार डबल मतदान करणार काय, हा चर्चेचा विषय ठरला आहे.‘एक व्यक्ती एक मतदान’ असे असताना दोन्हीकडे मतदान करणे नियमांच्या विरुद्ध आहे. २००९ रोजी लोकसभा निवडणूक एकत्र झाली होती. त्यावेळी काही मतदारांनी दोन्हीकडे मतदान केले. पती एका राज्यात तर पत्नी दुसऱ्या राज्यात मतदानाचा हक बजावला होता, हेदेखील दिसून येते.दोन्हीकडे पहिल्या टप्प्यात मतदानमहाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावे दोन्ही राज्यात येतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान कुठे करावे, हा प्रश्न चर्चेचा विषय झाला आहे.निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आव्हानमतदान केंद्रावर उपस्थित असणाºया अधिकाºयांची यावेळी कसोटी ठरणार आहे. बोठाच्या तर्जनीवर शाई लावली जाते. पण, दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत नाही असल्याने सत्यता तपासणे आव्हान ठरणार आहे. या गावांमध्ये दोन्ही राज्याच्या योजना कार्यान्वित आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक