शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Lok Sabha Election 2019; सीमावर्ती मतदारांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:17 IST

मागील अनेक वर्षे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा वाद अजूनही कायम आहे. या गावांतील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देवाद कायम : १४ गावांतील मतदार दोन्ही राज्यांचे रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : मागील अनेक वर्षे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा वाद अजूनही कायम आहे. या गावांतील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे.११ एप्रिलला देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील १४ गावे चंद्रपूर जिल्ह्यात येतात. पण न्यायालयाच्या आदेशानंतरी महाराष्ट्र सरकारने हा तिढा सोडविला नाही. चंद्रपूर- आर्णी व तेलंगणातील आदिलाबाद या दोन्ही लोकसभा क्षेत्रासाठी मतदान करणार काय, हा प्रश्न विचारला जात आहे.दोन्ही लोकसभा क्षेत्राचे मतदान हे पहिल्या टप्प्यातच आहे. सीमेवरील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. दोन्ही राज्यांच्या सोयीसुविधा लाभ घेतात. दोन्ही ग्रामपंचायतला मतदान करतात. दोन्ही राज्याचे सरपंच निवडतात. एकाच दिवशी मतदान असल्यामुळे या भागातील मतदार डबल मतदान करणार काय, हा चर्चेचा विषय ठरला आहे.‘एक व्यक्ती एक मतदान’ असे असताना दोन्हीकडे मतदान करणे नियमांच्या विरुद्ध आहे. २००९ रोजी लोकसभा निवडणूक एकत्र झाली होती. त्यावेळी काही मतदारांनी दोन्हीकडे मतदान केले. पती एका राज्यात तर पत्नी दुसऱ्या राज्यात मतदानाचा हक बजावला होता, हेदेखील दिसून येते.दोन्हीकडे पहिल्या टप्प्यात मतदानमहाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावे दोन्ही राज्यात येतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान कुठे करावे, हा प्रश्न चर्चेचा विषय झाला आहे.निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आव्हानमतदान केंद्रावर उपस्थित असणाºया अधिकाºयांची यावेळी कसोटी ठरणार आहे. बोठाच्या तर्जनीवर शाई लावली जाते. पण, दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत नाही असल्याने सत्यता तपासणे आव्हान ठरणार आहे. या गावांमध्ये दोन्ही राज्याच्या योजना कार्यान्वित आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक