शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होऊच शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:11 IST

भाजपा सरकार हे गरीबांचे सरकार असून विरोधी असणारे ५६ पक्ष एकत्र येवून भाजपाला माघारी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होवून शकत नाही. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांसाठी येणारी मदत त्यांना मिळत नव्हती. ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नव्हती, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे जिवती तालुक्यातील शेणगाव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : भाजपच्या प्रचारार्थ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती(चंद्रपूर) : भाजपा सरकार हे गरीबांचे सरकार असून विरोधी असणारे ५६ पक्ष एकत्र येवून भाजपाला माघारी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होवून शकत नाही. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांसाठी येणारी मदत त्यांना मिळत नव्हती. ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नव्हती, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे जिवती तालुक्यातील शेणगाव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली.भाजपा राजवटीत शेवटच्या घटकापर्यंत पूर्णत: मदत पोहचत आहे. जिवती मधील वनजमिनीच्या पट्ट्याच्या विषयावर हे सरकार सकारात्मक आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिवती येथे बैठक लावून प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही दानवे यांनी यावेळी नागरिकांना आश्वस्त केले. मंचावर युतीचे उमेदवार हंसराज अहीर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, शिवसेना उपपमुख पंढरी मस्कले, जि.प. सभापती गोदावरी केंद्रे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघूजी गेडाम, तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, पं.स. सभापती सुनील मडावी, उपसभापती महेश देवकते, नगराध्यक्षा पुष्पा नैताम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, शिवाजी सेलोकर, जि.प. सदस्य कमला राठोड, सतीश धोटे, अरुण मडावी, माणिक उपलेंचवार, दत्ता राठोड उपस्थिते होते.शेतकºयांच्या प्रकल्पबाधित होणाऱ्या जमिनींना वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी लोकसभेत विधायक लढा देवून अनेक उद्योगात अल्प दरात अधिग्रहीत होणाऱ्या जमिनींना खासदार हंसराज अहीर यांनी न्याय मिळवून देत मोठ्या प्रमाणात वाढीव मोबदला मिळवून दिला आहे. त्यांचे हे कार्य लोकसभेत अगदी जवळू बघत आलो आहे. जिवतीसारख्या अतिदुर्गम भागाचा विकास साधायचा अहीर यांना पुन्हा संधी द्यावी, असेही दानवे म्हणाले.