शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

Lok Sabha Election 2019; चंद्रपुरात अहिरांची लढत माजी शिवसैनिकाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:15 IST

पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.

ठळक मुद्देबंडखोरीमुळे वाढली रंगत वंचित बहुजन आघाडीमुळे मते विभाजनाची शक्यताप्रमुख उमेदवार: हंसराज अहीर, सुरेश धानोरकर, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे

राजेश भोजेकर 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने दोनदा उमेदवार बदलल्याने देशपातळीवर चर्चेत आला. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.विजयाची हॅट्ट्रीक साधणारे हंसराज अहीर यांच्यावर पुन्हा एकदा भाजपाने बाजी लावली आहे. त्यांच्यासह १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, बसपासह बसपातून बाहेर पडलेला एक गट बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी)च्या रुपाने रिंगणात आहे. या मतदार संघाचा गेल्या १९९९ पासूनचा इतिहास बघता ८० हजार ते २ लाखांपर्यंत मते घेणारा तिसरा दमदार चेहरा या निवडणुकीत दिसत नाही. या मतांवर युती आणि आघाडीसह अन्य पक्षांचा डोळा आहे.२०१४ मध्ये देशात मोदी लाट होती. त्यावेळी भाजप उमेदवाराने तब्बल ५ लाखांवर मते घेतली. ती लाट आता दिसत नाहीे. युतीपुढे ही मते टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. काँग्रेसने शिवसेनेच्या नेत्याला निवडणुकीत उतरविल्यामुळे पक्षातील एक गट कमालीचा नाराज आहे. या गटाच्या हालचाली काँग्रेसची डोकेदुखी दिसत असले तरीही रिंगणातील सर्व उमेदवारांवर लक्ष टाकल्यास युती व आघाडीत दुहेरी लढतीचे चित्र दिसत आहे. २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ च्या निवडणुकीत ही स्थिती होती.वंचित बहुजन आघाडी, बीआरएसपी व बसपा या पक्षांमुळे काहीअंशी मतांचे विभाजन होईल असे चित्र आहे. आप व शेतकरी संघटना बीआरएसपीसोबत असली तरी फार चमत्कार करेल असे वातावरण नाही. गेल्या चार निवडणुका लक्षात घेता या पक्षात चौथ्या क्रमांकासाठी लढाई होईल असे दिसते.उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच रणधुमाळीने वेग धरला आहे. उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. मात्र, धानोरकरांना उमेदवारी मिळाल्याने गटबाजी थांबली आहे. दुसरीकडे धानोरकर हे शिवसेनेचे माजी आमदार असल्याने असंख्य शिवसैनिक त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे एकाअर्थी ही निवडणूक अहीर विरुद्ध धानोरकर अशी नसून भाजप विरुद्ध शिवसेना अशीच आहे.

पाच वर्षांत मतदार संघाचा भक्कम विकास झाला. सात हजार लोकांना रोजगार मिळवून दिला. नितीन गडकरी यांनी दिलेल्या केंद्रीय रस्ते विकास निधीतून चार हजार कोटींची कामे सुरू आहे. अनेक रेल्वे थांबे झाले. पीट लाईन, तिसरी रेल्वे लाईनसह व राष्ट्रीय दर्जाचे सॅटेलाईट सेेंटर सुरू होईल. ही मोठी उपलब्धी आहे.- हंसराज अहीर, भाजपा

युतीच्या खासदाराने सापत्न वागणूक दिली. आपण अस्वस्थ होतो. युती सरकार असूनही आंदोलने करावी लागली. लोकसेवा करायची आहे. २० वर्षांपासून या भागाचा विकास नाही. निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. युतीतून हेशक्य नव्हते. जनभावना लक्षात घेऊन काँगेसने अखेरच्याक्षणी तिकीट दिली.- सुरेश धानोरकर, काँग्रेस

कळीचे मुद्देशेतमालाला योग्य बाजारभाव, जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के बंद पडलेले उद्योग, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न विरोधक उचलून धरतील.पीट लाईनसह रेल्वे प्रवाशांचे सोडविलेले प्रश्न, ग्रामीण व शहरी भागात झालेला विकास व केंद्राच्या योजना सत्ताधारी सांगतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक