शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

Lok Sabha Election 2019; चंद्रपुरात अहिरांची लढत माजी शिवसैनिकाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:15 IST

पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.

ठळक मुद्देबंडखोरीमुळे वाढली रंगत वंचित बहुजन आघाडीमुळे मते विभाजनाची शक्यताप्रमुख उमेदवार: हंसराज अहीर, सुरेश धानोरकर, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे

राजेश भोजेकर 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने दोनदा उमेदवार बदलल्याने देशपातळीवर चर्चेत आला. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.विजयाची हॅट्ट्रीक साधणारे हंसराज अहीर यांच्यावर पुन्हा एकदा भाजपाने बाजी लावली आहे. त्यांच्यासह १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, बसपासह बसपातून बाहेर पडलेला एक गट बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी)च्या रुपाने रिंगणात आहे. या मतदार संघाचा गेल्या १९९९ पासूनचा इतिहास बघता ८० हजार ते २ लाखांपर्यंत मते घेणारा तिसरा दमदार चेहरा या निवडणुकीत दिसत नाही. या मतांवर युती आणि आघाडीसह अन्य पक्षांचा डोळा आहे.२०१४ मध्ये देशात मोदी लाट होती. त्यावेळी भाजप उमेदवाराने तब्बल ५ लाखांवर मते घेतली. ती लाट आता दिसत नाहीे. युतीपुढे ही मते टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. काँग्रेसने शिवसेनेच्या नेत्याला निवडणुकीत उतरविल्यामुळे पक्षातील एक गट कमालीचा नाराज आहे. या गटाच्या हालचाली काँग्रेसची डोकेदुखी दिसत असले तरीही रिंगणातील सर्व उमेदवारांवर लक्ष टाकल्यास युती व आघाडीत दुहेरी लढतीचे चित्र दिसत आहे. २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ च्या निवडणुकीत ही स्थिती होती.वंचित बहुजन आघाडी, बीआरएसपी व बसपा या पक्षांमुळे काहीअंशी मतांचे विभाजन होईल असे चित्र आहे. आप व शेतकरी संघटना बीआरएसपीसोबत असली तरी फार चमत्कार करेल असे वातावरण नाही. गेल्या चार निवडणुका लक्षात घेता या पक्षात चौथ्या क्रमांकासाठी लढाई होईल असे दिसते.उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच रणधुमाळीने वेग धरला आहे. उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. मात्र, धानोरकरांना उमेदवारी मिळाल्याने गटबाजी थांबली आहे. दुसरीकडे धानोरकर हे शिवसेनेचे माजी आमदार असल्याने असंख्य शिवसैनिक त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे एकाअर्थी ही निवडणूक अहीर विरुद्ध धानोरकर अशी नसून भाजप विरुद्ध शिवसेना अशीच आहे.

पाच वर्षांत मतदार संघाचा भक्कम विकास झाला. सात हजार लोकांना रोजगार मिळवून दिला. नितीन गडकरी यांनी दिलेल्या केंद्रीय रस्ते विकास निधीतून चार हजार कोटींची कामे सुरू आहे. अनेक रेल्वे थांबे झाले. पीट लाईन, तिसरी रेल्वे लाईनसह व राष्ट्रीय दर्जाचे सॅटेलाईट सेेंटर सुरू होईल. ही मोठी उपलब्धी आहे.- हंसराज अहीर, भाजपा

युतीच्या खासदाराने सापत्न वागणूक दिली. आपण अस्वस्थ होतो. युती सरकार असूनही आंदोलने करावी लागली. लोकसेवा करायची आहे. २० वर्षांपासून या भागाचा विकास नाही. निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. युतीतून हेशक्य नव्हते. जनभावना लक्षात घेऊन काँगेसने अखेरच्याक्षणी तिकीट दिली.- सुरेश धानोरकर, काँग्रेस

कळीचे मुद्देशेतमालाला योग्य बाजारभाव, जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के बंद पडलेले उद्योग, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न विरोधक उचलून धरतील.पीट लाईनसह रेल्वे प्रवाशांचे सोडविलेले प्रश्न, ग्रामीण व शहरी भागात झालेला विकास व केंद्राच्या योजना सत्ताधारी सांगतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक