शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

Lok Sabha Election 2019; चंद्रपुरात अहिरांची लढत माजी शिवसैनिकाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:15 IST

पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.

ठळक मुद्देबंडखोरीमुळे वाढली रंगत वंचित बहुजन आघाडीमुळे मते विभाजनाची शक्यताप्रमुख उमेदवार: हंसराज अहीर, सुरेश धानोरकर, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे

राजेश भोजेकर 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने दोनदा उमेदवार बदलल्याने देशपातळीवर चर्चेत आला. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.विजयाची हॅट्ट्रीक साधणारे हंसराज अहीर यांच्यावर पुन्हा एकदा भाजपाने बाजी लावली आहे. त्यांच्यासह १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, बसपासह बसपातून बाहेर पडलेला एक गट बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी)च्या रुपाने रिंगणात आहे. या मतदार संघाचा गेल्या १९९९ पासूनचा इतिहास बघता ८० हजार ते २ लाखांपर्यंत मते घेणारा तिसरा दमदार चेहरा या निवडणुकीत दिसत नाही. या मतांवर युती आणि आघाडीसह अन्य पक्षांचा डोळा आहे.२०१४ मध्ये देशात मोदी लाट होती. त्यावेळी भाजप उमेदवाराने तब्बल ५ लाखांवर मते घेतली. ती लाट आता दिसत नाहीे. युतीपुढे ही मते टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. काँग्रेसने शिवसेनेच्या नेत्याला निवडणुकीत उतरविल्यामुळे पक्षातील एक गट कमालीचा नाराज आहे. या गटाच्या हालचाली काँग्रेसची डोकेदुखी दिसत असले तरीही रिंगणातील सर्व उमेदवारांवर लक्ष टाकल्यास युती व आघाडीत दुहेरी लढतीचे चित्र दिसत आहे. २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ च्या निवडणुकीत ही स्थिती होती.वंचित बहुजन आघाडी, बीआरएसपी व बसपा या पक्षांमुळे काहीअंशी मतांचे विभाजन होईल असे चित्र आहे. आप व शेतकरी संघटना बीआरएसपीसोबत असली तरी फार चमत्कार करेल असे वातावरण नाही. गेल्या चार निवडणुका लक्षात घेता या पक्षात चौथ्या क्रमांकासाठी लढाई होईल असे दिसते.उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच रणधुमाळीने वेग धरला आहे. उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. मात्र, धानोरकरांना उमेदवारी मिळाल्याने गटबाजी थांबली आहे. दुसरीकडे धानोरकर हे शिवसेनेचे माजी आमदार असल्याने असंख्य शिवसैनिक त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे एकाअर्थी ही निवडणूक अहीर विरुद्ध धानोरकर अशी नसून भाजप विरुद्ध शिवसेना अशीच आहे.

पाच वर्षांत मतदार संघाचा भक्कम विकास झाला. सात हजार लोकांना रोजगार मिळवून दिला. नितीन गडकरी यांनी दिलेल्या केंद्रीय रस्ते विकास निधीतून चार हजार कोटींची कामे सुरू आहे. अनेक रेल्वे थांबे झाले. पीट लाईन, तिसरी रेल्वे लाईनसह व राष्ट्रीय दर्जाचे सॅटेलाईट सेेंटर सुरू होईल. ही मोठी उपलब्धी आहे.- हंसराज अहीर, भाजपा

युतीच्या खासदाराने सापत्न वागणूक दिली. आपण अस्वस्थ होतो. युती सरकार असूनही आंदोलने करावी लागली. लोकसेवा करायची आहे. २० वर्षांपासून या भागाचा विकास नाही. निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. युतीतून हेशक्य नव्हते. जनभावना लक्षात घेऊन काँगेसने अखेरच्याक्षणी तिकीट दिली.- सुरेश धानोरकर, काँग्रेस

कळीचे मुद्देशेतमालाला योग्य बाजारभाव, जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के बंद पडलेले उद्योग, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न विरोधक उचलून धरतील.पीट लाईनसह रेल्वे प्रवाशांचे सोडविलेले प्रश्न, ग्रामीण व शहरी भागात झालेला विकास व केंद्राच्या योजना सत्ताधारी सांगतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक