शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

वाद सामंजस्याने मिटविण्याचे लोक न्यायालय प्रभावी माध्यम

By admin | Updated: February 5, 2017 00:33 IST

आपसातील वाद सामंजस्याने मिटविण्याचे लोक न्यायालय हे प्रभावी माध्यम असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव पी.एस. इंगळे यांनी व्यक्त केले.

पी.एस. इंगळे : लोक न्यायालयामुळे वेळ व पैशाची होते बचतचंद्रपूर : आपसातील वाद सामंजस्याने मिटविण्याचे लोक न्यायालय हे प्रभावी माध्यम असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव पी.एस. इंगळे यांनी व्यक्त केले.लोक न्यायालयाच्या आयोजनासंबंधी माहिती देताना ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय यांच्या सुचनेनुसार संपूर्ण देशामध्ये त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्येसुद्धा ११ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयात एकाच दिवशी घेण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीयोग्य सर्व दिवाणी दावे, फौजदारी खटले, कौटुंबिक वादाची प्रकरणे, विमा कंपन्यांची व बँकांची प्रकरणे व भुसंपादन दावे इत्यादी प्रकारची तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटीगेशन) बँकांची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, पाणी आणि विद्युत देयकांची प्रकरणे ठेवण्यात येणार आहे.आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून २७ लाखांपेक्षा जास्त प्रकरणे महालोक अदालतीच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्येही लोक न्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारांनी अनेक आपआपले वाद कायमचे संपुष्टात आणलेले आहेत. लोक न्यायालयामध्ये वाद मिटविल्यास संबंधित पक्षकारांच्या पैशाची व वेळेची बचत होवून दोन्ही पक्षकारांचे संबंध चांगले राहू शकतात. त्यामुळे ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा ज्या पक्षकाराची दावापूर्व (प्रिलिटीगेशन) प्रकरणे आहेत अशा सर्वांनी त्यांची प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये समाजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर. बोरकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूरचे सचिव पी.एस. इंगळे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)