शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अधिवेशनासाठी शिक्षकांचे शाळेला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:15 IST

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड रोड येथील सर्व शिक्षक शाळा कुलूप बंद करुन बुद्धगया येथील अधिवेशनाला गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर राहावे लागले. मात्र पंचायत समिती सदस्यांच्या समय सूचकतेने शाळेत दुसरा शिक्षक पाठवून शाळा पूर्ववत सुरु करण्यात आली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देवरूर रोड शाळेतील प्रकार : विद्यार्थी वर्गाबाहेर, पं. स. सदस्याच्या तक्रारीनंतर शाळा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड रोड येथील सर्व शिक्षक शाळा कुलूप बंद करुन बुद्धगया येथील अधिवेशनाला गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर राहावे लागले. मात्र पंचायत समिती सदस्यांच्या समय सूचकतेने शाळेत दुसरा शिक्षक पाठवून शाळा पूर्ववत सुरु करण्यात आली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे इयत्ता १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील सर्व शिक्षक सुट्टी घेवून बुद्धगया (बिहार) येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाकरिता गेले. या चार शिक्षकी शाळेत एकूण ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेतील सर्व शिक्षक अधिवेशनाला गेल्याने शाळेची वेळ होऊनही शाळा बंदच होती. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहात शाळेबाहेर ताटकळतच उभे होते. हा सर्व प्रकार पं. स. सदस्य रामदास पुसाम यांच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी चंद्रपूरच्या जि. प. शिक्षण विभागात संपर्क केला. त्यानंतर राजुरा येथील शिक्षणाधिकारी पुरुषोत्तम भिवगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून येथील शाळेवर दुसऱ्या शाळेतील शिक्षक पाठविण्याचे सांगितले. परंतु, सदर शिक्षक शाळेची वेळ होऊनही शाळेत हजर झाले नसल्याने विद्यार्थी शाळेबाहेर ताटकळत होते. त्यानंतर पं. स. सदस्याच्या तक्रारीनंतरच शिक्षक शाळेत हजर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले. पं. स. सदस्य रामदास पुसाम यांनी शिक्षण विभागासोबत संपर्क साधला नसता तर शाळा दिवसभर बंद राहिली असती.नोकारी (पालगाव) शाळा बंदबिहार राज्यातील बुद्धगया येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाकरिता कोरपना तालुक्यातील नोकारी (पालगाव ) येथील शिक्षक गेल्याने शाळा दिवसभर बंद होती. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले. मात्र शिक्षक आले नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे शिक्षण विभाग काय कार्यवाही करते, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.