शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

अधिवेशनासाठी शिक्षकांचे शाळेला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:15 IST

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड रोड येथील सर्व शिक्षक शाळा कुलूप बंद करुन बुद्धगया येथील अधिवेशनाला गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर राहावे लागले. मात्र पंचायत समिती सदस्यांच्या समय सूचकतेने शाळेत दुसरा शिक्षक पाठवून शाळा पूर्ववत सुरु करण्यात आली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देवरूर रोड शाळेतील प्रकार : विद्यार्थी वर्गाबाहेर, पं. स. सदस्याच्या तक्रारीनंतर शाळा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड रोड येथील सर्व शिक्षक शाळा कुलूप बंद करुन बुद्धगया येथील अधिवेशनाला गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर राहावे लागले. मात्र पंचायत समिती सदस्यांच्या समय सूचकतेने शाळेत दुसरा शिक्षक पाठवून शाळा पूर्ववत सुरु करण्यात आली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे इयत्ता १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील सर्व शिक्षक सुट्टी घेवून बुद्धगया (बिहार) येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाकरिता गेले. या चार शिक्षकी शाळेत एकूण ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेतील सर्व शिक्षक अधिवेशनाला गेल्याने शाळेची वेळ होऊनही शाळा बंदच होती. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहात शाळेबाहेर ताटकळतच उभे होते. हा सर्व प्रकार पं. स. सदस्य रामदास पुसाम यांच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी चंद्रपूरच्या जि. प. शिक्षण विभागात संपर्क केला. त्यानंतर राजुरा येथील शिक्षणाधिकारी पुरुषोत्तम भिवगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून येथील शाळेवर दुसऱ्या शाळेतील शिक्षक पाठविण्याचे सांगितले. परंतु, सदर शिक्षक शाळेची वेळ होऊनही शाळेत हजर झाले नसल्याने विद्यार्थी शाळेबाहेर ताटकळत होते. त्यानंतर पं. स. सदस्याच्या तक्रारीनंतरच शिक्षक शाळेत हजर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले. पं. स. सदस्य रामदास पुसाम यांनी शिक्षण विभागासोबत संपर्क साधला नसता तर शाळा दिवसभर बंद राहिली असती.नोकारी (पालगाव) शाळा बंदबिहार राज्यातील बुद्धगया येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाकरिता कोरपना तालुक्यातील नोकारी (पालगाव ) येथील शिक्षक गेल्याने शाळा दिवसभर बंद होती. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले. मात्र शिक्षक आले नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे शिक्षण विभाग काय कार्यवाही करते, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.