शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत करण्यात आला.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त : ऊर्जानगर, दुर्गापुरातही कडक अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असतानाही जिल्ह्यात गुरूवारपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या २२८ झाली. त्यातील ६२ रूग्ण चंद्रपूर शहरातील आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र तसेच ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारपासून रविवारी २६ जुलैपर्यंत १० दिवस कडक लॉकडाऊन लागू केले. परिणामी, गजबजणारे रस्ते पुन्हा निर्मनुष्य झाले आहेत. बाजारपेठा सुन्यासुन्या झाल्या. शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दहा दिवसांचा हा लॉकडाऊन दोन टप्प्यात विभागण्यात आला आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत करण्यात आला. जिल्ह्यात १० दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या अचानक २०० पर्यंत पोहोचली. आता तर दिवसागणिक १० ते १२ पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे १० दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्यात आले.सर्व दुकाने कडकडीत बंदजिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार १७ ते २१ जुलै या पहिल्या पाच दिवसात चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र, ऊर्जानगर व दुर्गापुरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद कडकडीत बंद ठेवण्यात आली. २१ ते २६ जुलै कालावधीत पुढील पाच दिवसांसाठी केवळ अत्यावश्यक व खाद्य वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने, थोक विके्रते, जसे खाद्य पदार्थ, किराणा, दूध दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस,मासे, बेकरी, पशुखाद्य, कृषीविषयक दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे फेरीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांसह सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याचे शुक्रवारी दिसून आले.शेतमालावर पुन्हा कुऱ्हाडशहरातील सर्व हॉटेल्स घरपोच सुविधा आज बंद होती. २१ ते २६ जुलै या कालावधीत केवळ घरपोच सेवा सुरू राहणार आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने दररोजविक्री करावीच लागते. मात्र, आजपासून पाच दिवस भाजीपाला विक्री बंद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहेनागरिकांनी घरीच राहणे केले पसंतगेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असताना आजपासून लॉकडाऊन सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरूवारी जीवनावश्यक वस्तुंची खरेदी केली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी झुंबळ उडाली होती. नागरिकांनी आज घरीच राहणे पसंत केले.मनपाकडून अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहीमकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन सुरू होताच महानगर पालिकेकडून आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली. या कालावधीत काळातील दहा दिवसांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहेत. कोरोना संसर्गाची तात्काळ माहिती देणाºया अ‍ॅन्टिजेन तपासणीचा यावेळी सर्वाधिक वापर केल्या जाणार आहे.फक्त मेडिकल स्टोअर्स सुरूजिल्हा प्रशासनाने सर्व मेडिकल स्टोअर्स सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज चंद्रपूर शहर व दुर्गापुरातील सर्व मेडिकल स्टोअर्स सुरू होते.ऊर्जानगर, दुर्गापुरात शुकशुकाटकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्याने ऊर्जानगर व दुर्गापुरात शुकशुकाट पसरला होता. जीवनाश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. ऊर्जानगर व दुर्गापूर चौकात दररोज अनुभवाला येणारी कामगारांची गर्दी व वाहतूककोंडी आढळून आली नाही.शासकीय कार्यालये, खासगी हॉस्पिटल सुरूआज सकाळी सहा ते दहा वाजतापर्यंत काही विक्रेते घरपोच दूध वितरण केल्याचे दिसून आले. सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, न्यायालय, राज्य व केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरू होती.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या