शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कार्यालयाला नागरिकांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:43 IST

मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही.

ठळक मुद्देग्राहक आक्रमक : मीटर रिंडींग चुकीचे होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील झोपडपट्टीवासींनी झोपडपट्टी विकास संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी कुलुप ठोकले होते. दरम्यान, तात्काळ समस्या दूर केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभियंता सचिन बदखल यांना निवेदनातून देण्यात आला आहे.मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दर महिन्याला युनीट तपासणी करण्यासाठी न येता घर बंद आहे, असे दाखवून अंदाजे युनिटवर बिल पाठवितात. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. वीज बिलाविषयी ग्राहक तक्रार करण्यास कार्यालयात गेल्यास समजावून न सांगता उद्दटपणाने वागतात, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे गरीब ग्राहक कार्यालयात जाण्यासाठी घाबरतात. हा अन्यास दूर करण्याच्या हेतुने सदोष मीटर तपासणीसाठी समिती नेमावी. नियमित वीज पुरवठा करताना ग्राहकांना चुकीचे बिल येऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक होते. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे. निवेदन देऊनही दखल घेतल्या जात नाही, असा आरोप करून कार्यालयाला कुलुप ठोकण्यात आला.आंदोलनाचे नेतृत्व झोपडट्टी संघटना अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी केले. आंदोलनात संघटनेचे रामेश्वर देवगडे, मनिष मोगरे, नजमुद्दीन सय्यद, लता इंदूरकर, शोभा अल्लीवार, मंगेश सोमूलकर, सचिन, नंदी वाघमारे आदींसह शेकडो वीज ग्राहक सहभागी झाले होते.प्रमुख मागण्या -शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाºया ग्राहकांचे मीटर दुरूस्त करावे.प्रामुख्याने याच परिसरातील ग्राहकांच्या मीटरचे रिंडींग योग्य पद्धतीने केल्या जात नाही. त्यामुळे वाजवीपेक्षा अधिक बिल येण्याचे प्रमाण वाढले. या परिसरात सर्वसामान्य ग्राहकांची संख्या अधिक आहे. चुकीचे बिल पाठविल्याने ते कदापि भरणे शक्य होत नाही.वीज मीटरमध्ये बिघाड झाल्यास तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी वीज कंपनीने या परिसरात कर्मचाऱ्यांना पाठवावे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण