शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वीज वितरण कार्यालयाला नागरिकांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:43 IST

मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही.

ठळक मुद्देग्राहक आक्रमक : मीटर रिंडींग चुकीचे होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील झोपडपट्टीवासींनी झोपडपट्टी विकास संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी कुलुप ठोकले होते. दरम्यान, तात्काळ समस्या दूर केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभियंता सचिन बदखल यांना निवेदनातून देण्यात आला आहे.मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दर महिन्याला युनीट तपासणी करण्यासाठी न येता घर बंद आहे, असे दाखवून अंदाजे युनिटवर बिल पाठवितात. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. वीज बिलाविषयी ग्राहक तक्रार करण्यास कार्यालयात गेल्यास समजावून न सांगता उद्दटपणाने वागतात, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे गरीब ग्राहक कार्यालयात जाण्यासाठी घाबरतात. हा अन्यास दूर करण्याच्या हेतुने सदोष मीटर तपासणीसाठी समिती नेमावी. नियमित वीज पुरवठा करताना ग्राहकांना चुकीचे बिल येऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक होते. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे. निवेदन देऊनही दखल घेतल्या जात नाही, असा आरोप करून कार्यालयाला कुलुप ठोकण्यात आला.आंदोलनाचे नेतृत्व झोपडट्टी संघटना अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी केले. आंदोलनात संघटनेचे रामेश्वर देवगडे, मनिष मोगरे, नजमुद्दीन सय्यद, लता इंदूरकर, शोभा अल्लीवार, मंगेश सोमूलकर, सचिन, नंदी वाघमारे आदींसह शेकडो वीज ग्राहक सहभागी झाले होते.प्रमुख मागण्या -शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाºया ग्राहकांचे मीटर दुरूस्त करावे.प्रामुख्याने याच परिसरातील ग्राहकांच्या मीटरचे रिंडींग योग्य पद्धतीने केल्या जात नाही. त्यामुळे वाजवीपेक्षा अधिक बिल येण्याचे प्रमाण वाढले. या परिसरात सर्वसामान्य ग्राहकांची संख्या अधिक आहे. चुकीचे बिल पाठविल्याने ते कदापि भरणे शक्य होत नाही.वीज मीटरमध्ये बिघाड झाल्यास तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी वीज कंपनीने या परिसरात कर्मचाऱ्यांना पाठवावे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण