शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

उद्योगांकडून स्थानिकांना बगल

By admin | Updated: June 13, 2017 00:33 IST

राजुरा विधानसभा क्षेत्राचे औद्योगिकरण झाले. मागील २० वर्षामध्ये राजकीय अनास्थेमुळे नक्षलग्रस्त भागातील युवकांना या उद्योगामध्ये साधी तृतीय श्रेणीची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही. ही शोकांतिका आहे.

राजकीय अनास्था : औद्योगिकरण होऊनही बेरोजगारी वाढलेलीचबी. यू. बोर्डेवार । लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्राचे औद्योगिकरण झाले. मागील २० वर्षामध्ये राजकीय अनास्थेमुळे नक्षलग्रस्त भागातील युवकांना या उद्योगामध्ये साधी तृतीय श्रेणीची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही. ही शोकांतिका आहे. आपल्याच क्षेत्रातील कच्चा माल, पाणी, वीज, सर्वच आपले असताना परप्रांतीय कामगार, ठेकेदार, उद्योजक मलाई खात आहे. गेल्या दोन दशकात स्थानिक बेरोजगार युवकांसाठी मोठे आंदोलन उभे राहू शकले नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी उद्योगांना दिले जात आहे. वाणिज्य कराचे लाखो रुपये थकित आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात उद्योगाच्या उभारणीच्या वेळी जवळपास २० कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना एक ते दीड लाख रुपये देऊन उद्योजक जबाबदारीतून मोकळे झाले. चुनाळा येथील एका मेटल्स कंपनीत कामगाराचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना अल्पसा मोबदला देऊन बोळवण करण्यात आली.राजुरा, चुनाळा, उपरवाही, गडचांदूर या परिसरातील उद्योगांमध्ये मागील २० वर्षामध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही. कोळसा उद्योगात प्रचंड भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. बल्लारपूर क्षेत्रातील खाणीमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. वेकोलिच्या नियोजनाअभावी कोळसा चोरी, डिझेल चोरी, भंगार चोरी सुरुच आहे. गेल्या २० वर्षांमध्ये वेकोलिची कोट्यवधीची संपत्ती भंगारात गेली आहे. याला जबाबदार वेकोलि अधिकारीच आहे. उद्योजकांच्या विरोधात कुठलेच आंदोलन न झाल्यामुळे उद्योजकांचे मनोबल वाढले आहे. उच्च प्रतिचा लाईमस्टोन पहाड पोखरुन काढल्या जात आहे. याची रॉयल्टी भरली की नाही, याची माहिती घेणे गरजेचे आहे. मागील दशकात रॉयल्टीची कोरी पुस्तके आढळली होती. या भागात कितीही उद्योग वाढले तरी या क्षेत्रातील गरीब कामगार गरीबच राहिला असून उद्योजक मात्र गब्बर झाले आहे. सिमेंट कंपन्याची दादागिरी न्यारीच आहे. कंपनीच्या गेटवरुन हाकलून दिले जाते. सौजन्यपूर्ण वागणुकीचा तर जणू सर्वांना विसरच पडला आहे. काही कंपन्या गाव दत्तक घेऊन लाखोची निकृष्ठ कामे करीत आहे. या भागाच्या मातीच्या भरोशावर गब्बर होत असलेल्या उद्योजकांकडून या भागातील नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे. कोळसा, सिमेंट, उद्योगासाठी रेल्वे लाईन टाकण्यात आली. आसिफाबाद मार्गावरील राजुरा येथील गेटवर हजारो विद्यार्थ्यांना दररोज उभे रहावे लागते. अनेकवेळा निवेदने दिली. परंतु काहीच झाले नाही. कोट्यवधी रुपयांचा नफा कमविणाऱ्या या कंपन्यांनी उड्डाणपूल बांधून दिला पाहिजे. या कंपन्यांचा हट्ट पुरविण्यासाठी दररोज हजारो नागरिकांना वेठीस धरले जात आहे. सास्ती ओपनकास्टमधील कोट्यवधीचे सीएचपी, त्याचे साहित्य भंगारात पडून आहे. या ठिकाणी कोल वॉशरी, सिमेंट कंपन्या आणि कोळसा खाणीमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. पिकांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वेकोलिच्या सीएसअर फंडाचीही चौकशी होणे गरजेचे आहे.