शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांकडून स्थानिकांना बगल

By admin | Updated: June 13, 2017 00:33 IST

राजुरा विधानसभा क्षेत्राचे औद्योगिकरण झाले. मागील २० वर्षामध्ये राजकीय अनास्थेमुळे नक्षलग्रस्त भागातील युवकांना या उद्योगामध्ये साधी तृतीय श्रेणीची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही. ही शोकांतिका आहे.

राजकीय अनास्था : औद्योगिकरण होऊनही बेरोजगारी वाढलेलीचबी. यू. बोर्डेवार । लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्राचे औद्योगिकरण झाले. मागील २० वर्षामध्ये राजकीय अनास्थेमुळे नक्षलग्रस्त भागातील युवकांना या उद्योगामध्ये साधी तृतीय श्रेणीची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही. ही शोकांतिका आहे. आपल्याच क्षेत्रातील कच्चा माल, पाणी, वीज, सर्वच आपले असताना परप्रांतीय कामगार, ठेकेदार, उद्योजक मलाई खात आहे. गेल्या दोन दशकात स्थानिक बेरोजगार युवकांसाठी मोठे आंदोलन उभे राहू शकले नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी उद्योगांना दिले जात आहे. वाणिज्य कराचे लाखो रुपये थकित आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात उद्योगाच्या उभारणीच्या वेळी जवळपास २० कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना एक ते दीड लाख रुपये देऊन उद्योजक जबाबदारीतून मोकळे झाले. चुनाळा येथील एका मेटल्स कंपनीत कामगाराचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना अल्पसा मोबदला देऊन बोळवण करण्यात आली.राजुरा, चुनाळा, उपरवाही, गडचांदूर या परिसरातील उद्योगांमध्ये मागील २० वर्षामध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही. कोळसा उद्योगात प्रचंड भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. बल्लारपूर क्षेत्रातील खाणीमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. वेकोलिच्या नियोजनाअभावी कोळसा चोरी, डिझेल चोरी, भंगार चोरी सुरुच आहे. गेल्या २० वर्षांमध्ये वेकोलिची कोट्यवधीची संपत्ती भंगारात गेली आहे. याला जबाबदार वेकोलि अधिकारीच आहे. उद्योजकांच्या विरोधात कुठलेच आंदोलन न झाल्यामुळे उद्योजकांचे मनोबल वाढले आहे. उच्च प्रतिचा लाईमस्टोन पहाड पोखरुन काढल्या जात आहे. याची रॉयल्टी भरली की नाही, याची माहिती घेणे गरजेचे आहे. मागील दशकात रॉयल्टीची कोरी पुस्तके आढळली होती. या भागात कितीही उद्योग वाढले तरी या क्षेत्रातील गरीब कामगार गरीबच राहिला असून उद्योजक मात्र गब्बर झाले आहे. सिमेंट कंपन्याची दादागिरी न्यारीच आहे. कंपनीच्या गेटवरुन हाकलून दिले जाते. सौजन्यपूर्ण वागणुकीचा तर जणू सर्वांना विसरच पडला आहे. काही कंपन्या गाव दत्तक घेऊन लाखोची निकृष्ठ कामे करीत आहे. या भागाच्या मातीच्या भरोशावर गब्बर होत असलेल्या उद्योजकांकडून या भागातील नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे. कोळसा, सिमेंट, उद्योगासाठी रेल्वे लाईन टाकण्यात आली. आसिफाबाद मार्गावरील राजुरा येथील गेटवर हजारो विद्यार्थ्यांना दररोज उभे रहावे लागते. अनेकवेळा निवेदने दिली. परंतु काहीच झाले नाही. कोट्यवधी रुपयांचा नफा कमविणाऱ्या या कंपन्यांनी उड्डाणपूल बांधून दिला पाहिजे. या कंपन्यांचा हट्ट पुरविण्यासाठी दररोज हजारो नागरिकांना वेठीस धरले जात आहे. सास्ती ओपनकास्टमधील कोट्यवधीचे सीएचपी, त्याचे साहित्य भंगारात पडून आहे. या ठिकाणी कोल वॉशरी, सिमेंट कंपन्या आणि कोळसा खाणीमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. पिकांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वेकोलिच्या सीएसअर फंडाचीही चौकशी होणे गरजेचे आहे.