शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

उद्योगांकडून स्थानिकांना बगल

By admin | Updated: June 13, 2017 00:33 IST

राजुरा विधानसभा क्षेत्राचे औद्योगिकरण झाले. मागील २० वर्षामध्ये राजकीय अनास्थेमुळे नक्षलग्रस्त भागातील युवकांना या उद्योगामध्ये साधी तृतीय श्रेणीची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही. ही शोकांतिका आहे.

राजकीय अनास्था : औद्योगिकरण होऊनही बेरोजगारी वाढलेलीचबी. यू. बोर्डेवार । लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्राचे औद्योगिकरण झाले. मागील २० वर्षामध्ये राजकीय अनास्थेमुळे नक्षलग्रस्त भागातील युवकांना या उद्योगामध्ये साधी तृतीय श्रेणीची नोकरीसुद्धा मिळू शकली नाही. ही शोकांतिका आहे. आपल्याच क्षेत्रातील कच्चा माल, पाणी, वीज, सर्वच आपले असताना परप्रांतीय कामगार, ठेकेदार, उद्योजक मलाई खात आहे. गेल्या दोन दशकात स्थानिक बेरोजगार युवकांसाठी मोठे आंदोलन उभे राहू शकले नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी उद्योगांना दिले जात आहे. वाणिज्य कराचे लाखो रुपये थकित आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात उद्योगाच्या उभारणीच्या वेळी जवळपास २० कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना एक ते दीड लाख रुपये देऊन उद्योजक जबाबदारीतून मोकळे झाले. चुनाळा येथील एका मेटल्स कंपनीत कामगाराचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना अल्पसा मोबदला देऊन बोळवण करण्यात आली.राजुरा, चुनाळा, उपरवाही, गडचांदूर या परिसरातील उद्योगांमध्ये मागील २० वर्षामध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही. कोळसा उद्योगात प्रचंड भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. बल्लारपूर क्षेत्रातील खाणीमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. वेकोलिच्या नियोजनाअभावी कोळसा चोरी, डिझेल चोरी, भंगार चोरी सुरुच आहे. गेल्या २० वर्षांमध्ये वेकोलिची कोट्यवधीची संपत्ती भंगारात गेली आहे. याला जबाबदार वेकोलि अधिकारीच आहे. उद्योजकांच्या विरोधात कुठलेच आंदोलन न झाल्यामुळे उद्योजकांचे मनोबल वाढले आहे. उच्च प्रतिचा लाईमस्टोन पहाड पोखरुन काढल्या जात आहे. याची रॉयल्टी भरली की नाही, याची माहिती घेणे गरजेचे आहे. मागील दशकात रॉयल्टीची कोरी पुस्तके आढळली होती. या भागात कितीही उद्योग वाढले तरी या क्षेत्रातील गरीब कामगार गरीबच राहिला असून उद्योजक मात्र गब्बर झाले आहे. सिमेंट कंपन्याची दादागिरी न्यारीच आहे. कंपनीच्या गेटवरुन हाकलून दिले जाते. सौजन्यपूर्ण वागणुकीचा तर जणू सर्वांना विसरच पडला आहे. काही कंपन्या गाव दत्तक घेऊन लाखोची निकृष्ठ कामे करीत आहे. या भागाच्या मातीच्या भरोशावर गब्बर होत असलेल्या उद्योजकांकडून या भागातील नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे. कोळसा, सिमेंट, उद्योगासाठी रेल्वे लाईन टाकण्यात आली. आसिफाबाद मार्गावरील राजुरा येथील गेटवर हजारो विद्यार्थ्यांना दररोज उभे रहावे लागते. अनेकवेळा निवेदने दिली. परंतु काहीच झाले नाही. कोट्यवधी रुपयांचा नफा कमविणाऱ्या या कंपन्यांनी उड्डाणपूल बांधून दिला पाहिजे. या कंपन्यांचा हट्ट पुरविण्यासाठी दररोज हजारो नागरिकांना वेठीस धरले जात आहे. सास्ती ओपनकास्टमधील कोट्यवधीचे सीएचपी, त्याचे साहित्य भंगारात पडून आहे. या ठिकाणी कोल वॉशरी, सिमेंट कंपन्या आणि कोळसा खाणीमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. पिकांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वेकोलिच्या सीएसअर फंडाचीही चौकशी होणे गरजेचे आहे.