शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मूल येथील लोकवस्तीतील दारू दुकान शहराबाहेर न्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

मूल : शासनाने नुकतीच चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवली असल्याने येत्या काही दिवसात दारूची दुकाने सुरू होणार आहेत. तशी ...

मूल : शासनाने नुकतीच चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवली असल्याने येत्या काही दिवसात दारूची दुकाने सुरू होणार आहेत. तशी लगबग सुरू झाली आहे. मात्र मूल शहरात असलेल्या भरवस्तीतील दारू दुकानामुळे जनतेला त्रास सहन करावा लागणार आहे. दारू व्यवसायामुळे होणारा जनतेचा त्रास आणि महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन सुरू होणारी दारूची दुकाने शहराबाहेर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बजरंग सेनेनी केली आहे.

जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीमुळे अनेक गैरकृत्याला चालना मिळाली होती. त्यामुळे जनतेची मागणी आणि वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी हटविली. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात पुन्हा अधिकृतरित्या दारूची दुकाने सुरू होणार आहेत. याची संधी साधून काही दारू विक्रेते मूल शहरात वर्दळीच्या व भरगच्च लोकवस्ती असलेल्या महर्षी वाल्मीकी वाॅर्ड क्र. ६ व ७ येथे पूर्वीच्याच ठिकाणी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात दारूबंदी होण्यापूर्वी सदर वाॅर्डात रहदारीच्या मुख्य मार्गावर तीन दारूची दुकाने होती. या तिन्ही दारू दुकानांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होता. संध्याकाळच्या सुमारास या दुकानांसमोर दारू शौकिनांची प्रचंड गर्दी राहत असल्याने दारू दुकानासमोरच्या मार्गाने जाण्यास महिलांना असुरक्षित वाटत होते. मार्गावरील गर्दीमुळे वाहन चालकांनाही जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागायचे. गर्दीमुळे या दुकानांसमोर दोनदा जीवघेणे अपघातही झाल्याची वास्तविकता आहे. त्यामुळे येत्या काळात सुरू होणारे दारू दुकान लोकवस्तीपासून दूर अंतरावर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक बजरंग सेनेचे अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, निकेश सुखदेवे, पंकज शेन्डे, जगदीश टिंगुसले, आकाश शेंडे आदींनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.