शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:28 IST

अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देज्ञानेश्वर वाकुडकर : राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय तिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून गडचांदूर नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, स्वागताध्यक्ष समाजसेवक गिरीधर काळे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पूर्वाध्यक्ष साहित्यिक मनोज बोबडे, ज्येष्ठ समीक्षक श्याम मोहोरकर, त. मु. अध्यक्ष शंकर अस्वले आदी उपस्थित होते. यावेळी अक्षर वाङमय पुरस्कार वितरण करण्यात आले. कवी गणेश भाकरे यांना अक्षरबाल वाङमय पुरस्कार, लातुर येथील कवी, लेखक डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांना अक्षर वाङमय समीक्षा पुरस्कार प्रा. नवनाथ गोरे यांना कादंबरी पुरस्कार, संघमित्रा खंडरे यांना कथा पुरस्कार, चंद्रकांत पोतदार यांना काव्य पुरस्कार, शंकुतला सोनार यांच्या चरित्र पुरस्कार तर रश्मी गुजराथी यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उमेश पारखे यांच्या ‘शुन्यात शोधतो मी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अक्षर साहित्य कला प्रतिष्ठाणच्या वतीने कवी उमेश पारखी यांना नवांकुर पुरस्कार, समाजसेवक रामचंद्र पावडे यांना राष्टÑसंत सेवा पुरस्कार, मनोज भोजेकर यांना अक्षर कार्यकर्ता पुरस्कार, सदानंद बोरकर यांना नाट्यकलावंत पुरस्कार तर मयुर ऐकरे यांना अक्षर कला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक कवि किशोर कवडे यांनी केले. संचालन कवी रत्नाकर चटप तर आभार कवी अविनाश पोईनकर यांनी मानले. यावेळी राज्यभरातील कवी, साहित्यिक, गझलकार तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामदिंडीने दुमदुलले बिबी गावतिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी बिबी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्यिकांसह जि.प. शाळेचे विद्यार्थी शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी सहभागी झाले. भजन आणि अभंगांनी गावकºयांची मने जिंकली.