शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:28 IST

अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देज्ञानेश्वर वाकुडकर : राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय तिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून गडचांदूर नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, स्वागताध्यक्ष समाजसेवक गिरीधर काळे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पूर्वाध्यक्ष साहित्यिक मनोज बोबडे, ज्येष्ठ समीक्षक श्याम मोहोरकर, त. मु. अध्यक्ष शंकर अस्वले आदी उपस्थित होते. यावेळी अक्षर वाङमय पुरस्कार वितरण करण्यात आले. कवी गणेश भाकरे यांना अक्षरबाल वाङमय पुरस्कार, लातुर येथील कवी, लेखक डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांना अक्षर वाङमय समीक्षा पुरस्कार प्रा. नवनाथ गोरे यांना कादंबरी पुरस्कार, संघमित्रा खंडरे यांना कथा पुरस्कार, चंद्रकांत पोतदार यांना काव्य पुरस्कार, शंकुतला सोनार यांच्या चरित्र पुरस्कार तर रश्मी गुजराथी यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उमेश पारखे यांच्या ‘शुन्यात शोधतो मी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अक्षर साहित्य कला प्रतिष्ठाणच्या वतीने कवी उमेश पारखी यांना नवांकुर पुरस्कार, समाजसेवक रामचंद्र पावडे यांना राष्टÑसंत सेवा पुरस्कार, मनोज भोजेकर यांना अक्षर कार्यकर्ता पुरस्कार, सदानंद बोरकर यांना नाट्यकलावंत पुरस्कार तर मयुर ऐकरे यांना अक्षर कला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक कवि किशोर कवडे यांनी केले. संचालन कवी रत्नाकर चटप तर आभार कवी अविनाश पोईनकर यांनी मानले. यावेळी राज्यभरातील कवी, साहित्यिक, गझलकार तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामदिंडीने दुमदुलले बिबी गावतिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी बिबी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्यिकांसह जि.प. शाळेचे विद्यार्थी शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी सहभागी झाले. भजन आणि अभंगांनी गावकºयांची मने जिंकली.