शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:28 IST

अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देज्ञानेश्वर वाकुडकर : राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय तिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून गडचांदूर नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, स्वागताध्यक्ष समाजसेवक गिरीधर काळे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पूर्वाध्यक्ष साहित्यिक मनोज बोबडे, ज्येष्ठ समीक्षक श्याम मोहोरकर, त. मु. अध्यक्ष शंकर अस्वले आदी उपस्थित होते. यावेळी अक्षर वाङमय पुरस्कार वितरण करण्यात आले. कवी गणेश भाकरे यांना अक्षरबाल वाङमय पुरस्कार, लातुर येथील कवी, लेखक डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांना अक्षर वाङमय समीक्षा पुरस्कार प्रा. नवनाथ गोरे यांना कादंबरी पुरस्कार, संघमित्रा खंडरे यांना कथा पुरस्कार, चंद्रकांत पोतदार यांना काव्य पुरस्कार, शंकुतला सोनार यांच्या चरित्र पुरस्कार तर रश्मी गुजराथी यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उमेश पारखे यांच्या ‘शुन्यात शोधतो मी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अक्षर साहित्य कला प्रतिष्ठाणच्या वतीने कवी उमेश पारखी यांना नवांकुर पुरस्कार, समाजसेवक रामचंद्र पावडे यांना राष्टÑसंत सेवा पुरस्कार, मनोज भोजेकर यांना अक्षर कार्यकर्ता पुरस्कार, सदानंद बोरकर यांना नाट्यकलावंत पुरस्कार तर मयुर ऐकरे यांना अक्षर कला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक कवि किशोर कवडे यांनी केले. संचालन कवी रत्नाकर चटप तर आभार कवी अविनाश पोईनकर यांनी मानले. यावेळी राज्यभरातील कवी, साहित्यिक, गझलकार तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामदिंडीने दुमदुलले बिबी गावतिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी बिबी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्यिकांसह जि.प. शाळेचे विद्यार्थी शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी सहभागी झाले. भजन आणि अभंगांनी गावकºयांची मने जिंकली.