शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मामला परिसरात तीन दिवसांपासून बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या मामला तसेच परिसरामध्ये मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकरी ...

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या मामला तसेच परिसरामध्ये मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान, सिंचन पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे भाजीपाला तसेच इतर पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

चंद्रपूरच्या अगदी शेजारी आणि जंगलव्याप्त गाव असलेल्या मामला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. काही जण दुग्ध व्यवसाय तसेच अन्य शेतकरी भाजीपाला तसेच अन्य पीक घेऊन उपजीविका करतात. त्यांचे पूर्ण अर्थचक्रच शेतीवर अवलंबून आहे. मात्र तीन ते चार दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शेतशिवारात वीज नसल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे शेतकरी कायम दहशतीत असतो. अशावेळी वीजपुरवठाही खंडित झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, खंडित वीजपुरवठ्यामुळे सिंचन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे भीजापावर्गीय पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन येथील गाव तसेच शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.