शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

मामला परिसरात तीन दिवसांपासून बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या मामला तसेच परिसरामध्ये मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकरी ...

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या मामला तसेच परिसरामध्ये मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान, सिंचन पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे भाजीपाला तसेच इतर पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

चंद्रपूरच्या अगदी शेजारी आणि जंगलव्याप्त गाव असलेल्या मामला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. काही जण दुग्ध व्यवसाय तसेच अन्य शेतकरी भाजीपाला तसेच अन्य पीक घेऊन उपजीविका करतात. त्यांचे पूर्ण अर्थचक्रच शेतीवर अवलंबून आहे. मात्र तीन ते चार दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शेतशिवारात वीज नसल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे शेतकरी कायम दहशतीत असतो. अशावेळी वीजपुरवठाही खंडित झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, खंडित वीजपुरवठ्यामुळे सिंचन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे भीजापावर्गीय पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन येथील गाव तसेच शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.