शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विजेचा लपंडावाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: June 1, 2017 01:36 IST

राजुरा तालुक्यातील देवाडासह परिसरातील ग्रामस्थ विजेच्या लंपडावाने कमालीचे हैराण झाले आहेत.

देवाडा परिसर : तक्रार करूनही दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडासह परिसरातील ग्रामस्थ विजेच्या लंपडावाने कमालीचे हैराण झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविषयी रोष व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे, भारनियमनच्या नावाखाली वीज पुवठा खंडीत करणे, यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या काही दिवसांपासुन कधी दिवसभर तर कधी रात्रभर वीज पुरवठा खंडीत असतो. चुकून एखादे वेळी वीज पुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडीत होईल याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणात विघाड होत आहे.पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने पीठ गिरणी बंद राहते, त्यामुळे महिला वर्गाला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. घरची कामे मजुरी व शेतीची कामे सोडून धान्य दळून आणण्यासाठी पीठ गिरणीवर चकरा माराव्या लागतात तसेच आजच्या काळात सर्व दाखले हे आॅनलाईन पद्धतीने मिळतात. मात्र वीज पुरवठा खंडीत राहत असल्याने प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागतात. ३३ के.व्ही सबस्टेशनची मागणी देवाडासह परिसरातील विद्युतधारकांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेता, येथे ३३ केव्ही सबस्टेशन देण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासनाची खैरात करणारेही निवडणूक झाल्याबरोबर आश्वासन विसरले. देवाडासारख्या मोठ्या गावात सहायक अभियंता कार्यालय सुरू करावे. जेनेकरून स्थानिक पातळीवर समस्या सोडविता येतील. वीज उपकरणे धोक्यात वेळी अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे याचा विपरीत परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्र ीज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, बोरवेलचे मीटर कॉम्युटर मध्ये विघाड येत आहे. महावितणच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.