शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मातीचे ढिगारे उठले प्रकल्पग्रस्त गावांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:22 IST

कोळसा खननानंतर वेकोलिने टाकलेल्या मातीच्या महाकाय ढिगाऱ्याला नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून वेकोलि खाण परिसरातील शेकडो हेक्टर शेती पावसाळ्यात पाण्याखाली येते.

ठळक मुद्देमहाकाय ढिगारे : वेकोलि परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळसा खननानंतर वेकोलिने टाकलेल्या मातीच्या महाकाय ढिगाऱ्याला नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून वेकोलि खाण परिसरातील शेकडो हेक्टर शेती पावसाळ्यात पाण्याखाली येते. मागील आठवड्यात एका दिवसाच्या पावसाच्या पाण्याने नाल्यात टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला पाणी अडल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या २५ वर्षापासून वेकोलि प्रशासन प्रकल्पग्रस्त गावांवर अन्याय करीत असताना जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ही बाब लक्षात का येत नाही, असा केविलवाणा प्रश्न आता प्रकल्पग्रस्त गावकरी विचारत आहे.राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाºया वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्खनानंतर वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या अगदी किनाºयावर टाकले आहे तर कुठे वेकोलिने माती टाकून नाल्याचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाहच बंद केला. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा गोवरी, सास्ती व परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसून क्षणार्धात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने अकेक संसार उघडयावर आल्याचे प्रकल्पग्रस्त गावकºयांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. मागील आठवड्यात आलेल्या एका दिवसाच्या पावसाने मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून पुरस्थिती निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्तही लोकमतने प्रकाशित करुन वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वेकोलिने नैसर्गिक जिवंत नाले अपाल्या सोईनुसार वळविल्याने पावसाळ्यात पाणी गोवरी, सास्ती, पोवनी गावाच्या दिशेने लवकर फेकले जाते. त्यामुळे या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती क्षणार्धात पाण्याखाली येते. शेतीचे असे प्रचंड नुकसान होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी वेकोलिला जाब का विचारत नाही, हा येथील शेतकºयांचा सवाल आहे.वेकोलिच्या कोळसा खाणी वर्धा नदी परिसरात वाटत चालल्याने गावकºयांना केव्हाही पुराचा मोठा होऊ शकतो. मात्र याकडे वेकोलिने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. वेकोलिने वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमवायचा व गावकºयांनी वेकोलिचे दूष्परीणाम वर्षानुवर्ष सहन करीत राहायचे, असा येथील अलिखित नियमच बनला आहे. गावकºयांनी जीवन-मरणाचा हा संघर्ष कुठपर्यंत सहन करायचा, याचे उत्तर अजूनही कुणालाच शोधता आले नाही. ही खरी शोकांतिका आहे. वेकोलिने केलेल्या कर्माचे भोग वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गावांना सहन करावे लागतात. गावकºयांची ही होरपळ आता सर्वांनाच सहन होत नाही. परंतु वेकोलिच्या मुजोर प्रशासनासमोर गावकरी हतबल आहे. गावकºयांनी अनेकदा निवेदन देऊन वेकोलिला उपाययोजना करण्यास सांगितले. मात्र वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले.नियमांना डावलून उभे केले मातीचे ढिगारेपर्यावरणाला धोका होऊ नये म्हणून मातीचे ढिगारे कुठे व किती उंचावर असावे, याचे काही नियम वेकोलिला आखून दिले आहे. मात्र वेकोलि प्रशासनाने सर्रास नियमांना तिजांजली देत नदी, नाल्याचा अगदी काठावर मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. यामुळे जलवाहिनी समजला जाणाºया वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने वेकोलिने टाकलेले मातीचे ढीगारे घातक आहेत.वेकोलिने टाकलेले मातीचे महाकाय ढिगारे वेकोलिच्या कुशित बसलेल्या प्रकल्पग्रस्त गावांसाठी अतिशय घातक आहे. पावसाळ्याच्या दिवसात बॅक वॉटरचा फटका बसून या गावांना पुराचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे. वेकोलि प्रशासनाने याची तातडीने उपाययोजना न केल्यास प्रकल्पग्रस्त गावातील नागरिक वेकोलिविरोधात रस्त्यावर उतरल्यिाशिवाय राहणार नाही.- भास्कर जुनघरी, नागरीक, गोवरी