शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

मातीचे ढिगारे उठले प्रकल्पग्रस्त गावांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:22 IST

कोळसा खननानंतर वेकोलिने टाकलेल्या मातीच्या महाकाय ढिगाऱ्याला नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून वेकोलि खाण परिसरातील शेकडो हेक्टर शेती पावसाळ्यात पाण्याखाली येते.

ठळक मुद्देमहाकाय ढिगारे : वेकोलि परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळसा खननानंतर वेकोलिने टाकलेल्या मातीच्या महाकाय ढिगाऱ्याला नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून वेकोलि खाण परिसरातील शेकडो हेक्टर शेती पावसाळ्यात पाण्याखाली येते. मागील आठवड्यात एका दिवसाच्या पावसाच्या पाण्याने नाल्यात टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला पाणी अडल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या २५ वर्षापासून वेकोलि प्रशासन प्रकल्पग्रस्त गावांवर अन्याय करीत असताना जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ही बाब लक्षात का येत नाही, असा केविलवाणा प्रश्न आता प्रकल्पग्रस्त गावकरी विचारत आहे.राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाºया वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्खनानंतर वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या अगदी किनाºयावर टाकले आहे तर कुठे वेकोलिने माती टाकून नाल्याचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाहच बंद केला. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा गोवरी, सास्ती व परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसून क्षणार्धात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने अकेक संसार उघडयावर आल्याचे प्रकल्पग्रस्त गावकºयांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. मागील आठवड्यात आलेल्या एका दिवसाच्या पावसाने मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून पुरस्थिती निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्तही लोकमतने प्रकाशित करुन वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वेकोलिने नैसर्गिक जिवंत नाले अपाल्या सोईनुसार वळविल्याने पावसाळ्यात पाणी गोवरी, सास्ती, पोवनी गावाच्या दिशेने लवकर फेकले जाते. त्यामुळे या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती क्षणार्धात पाण्याखाली येते. शेतीचे असे प्रचंड नुकसान होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी वेकोलिला जाब का विचारत नाही, हा येथील शेतकºयांचा सवाल आहे.वेकोलिच्या कोळसा खाणी वर्धा नदी परिसरात वाटत चालल्याने गावकºयांना केव्हाही पुराचा मोठा होऊ शकतो. मात्र याकडे वेकोलिने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. वेकोलिने वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमवायचा व गावकºयांनी वेकोलिचे दूष्परीणाम वर्षानुवर्ष सहन करीत राहायचे, असा येथील अलिखित नियमच बनला आहे. गावकºयांनी जीवन-मरणाचा हा संघर्ष कुठपर्यंत सहन करायचा, याचे उत्तर अजूनही कुणालाच शोधता आले नाही. ही खरी शोकांतिका आहे. वेकोलिने केलेल्या कर्माचे भोग वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गावांना सहन करावे लागतात. गावकºयांची ही होरपळ आता सर्वांनाच सहन होत नाही. परंतु वेकोलिच्या मुजोर प्रशासनासमोर गावकरी हतबल आहे. गावकºयांनी अनेकदा निवेदन देऊन वेकोलिला उपाययोजना करण्यास सांगितले. मात्र वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले.नियमांना डावलून उभे केले मातीचे ढिगारेपर्यावरणाला धोका होऊ नये म्हणून मातीचे ढिगारे कुठे व किती उंचावर असावे, याचे काही नियम वेकोलिला आखून दिले आहे. मात्र वेकोलि प्रशासनाने सर्रास नियमांना तिजांजली देत नदी, नाल्याचा अगदी काठावर मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. यामुळे जलवाहिनी समजला जाणाºया वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने वेकोलिने टाकलेले मातीचे ढीगारे घातक आहेत.वेकोलिने टाकलेले मातीचे महाकाय ढिगारे वेकोलिच्या कुशित बसलेल्या प्रकल्पग्रस्त गावांसाठी अतिशय घातक आहे. पावसाळ्याच्या दिवसात बॅक वॉटरचा फटका बसून या गावांना पुराचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे. वेकोलि प्रशासनाने याची तातडीने उपाययोजना न केल्यास प्रकल्पग्रस्त गावातील नागरिक वेकोलिविरोधात रस्त्यावर उतरल्यिाशिवाय राहणार नाही.- भास्कर जुनघरी, नागरीक, गोवरी