शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

जीवघेणी बेशिस्त

By admin | Updated: January 15, 2015 22:47 IST

चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात शेकडो नवी वाहनेही रस्त्यावर उतरत असून शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे. मुख्य चौकात सिग्नल आहेत,

मंगेश भांडेकर - चंद्रपूर चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात शेकडो नवी वाहनेही रस्त्यावर उतरत असून शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे. मुख्य चौकात सिग्नल आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष करुन नागरिकांकडून वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. यावर मात्र वाहतूक पोलीसही काहीच करु शकत नसल्याने बेशिस्त वाहतूक चंद्रपूरकरांसाठी जीवघेणी ठरत आहे. शहरातील अपघात व जखमींची संख्या बघता वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त आहे अन् वाहनचालक किती निर्ढावले आहेत, त्याचा प्रत्यय येतो. यामुळे चंद्रपूर शहर ‘हादसों का शहर’ म्हणून ओळख मिळवते की काय, अशी भीतीदायक स्थिती स्टिंग आॅपरेशन दरम्यान दिसून आली.शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी शहरातील १५ मुख्य चौकांमध्ये वाहतूक दिवे लावण्यात आले. मात्र ४ चौकातील वाहतूक दिवे सध्यास्थितीत बंद आहेत. तर ज्या ठिकाणी वाहतूक दिवे आहेत, त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिक सिग्नल तोडून वाहन पळवित असल्याचा प्रकार स्टिंग आॅपरेशन दरम्यान दिसून आला. वेळ दुपारी २ वाजताची, स्थळ गिरणार चौक, वाहतूक पोलीस कार्यरत, वाहतूक दिवाही सुरु. मात्र, कार्यरत पोलीस शिपाई स्वत:चा उन्हापासून बचाव करत रस्त्याच्या कडेला उभा असताना नागरिक शिपायाच्या डोळ्यादेखत वाहन पळवित होते. काही वाहनधारक लाल दिवा लागताच थांबत होते. मात्र, दिवा बंद होण्याआधीच वाहन पळविण्यात कोणीच मागे दिसले नाही. चौक क्रॉस करताना पायी चालणाऱ्यांसाठी किती धोकादायक असते, हे येथे दिसून आले. मात्र, याचे कोणलाच सोयरसूतक नसल्याचे यावेळी दिसून आले. वेळ दुपारी अडीच वाजताची. स्थळ गांधी चौक. चारही बाजुने वाहनांची वर्दळ. लगतच शहर पोलीस ठाणे. मात्र येथे कोणताच वाहतूक पोलीस शिपाई दिसून आला नाही. येथे गोल बाजार असल्याने मार्केटमध्ये येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे पायी चालणारे जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत असल्याचा प्रकार येथे दिसून आला. वेळ २.४५ वाजताची, स्थळ जयंत टॉकीज चौक. येथेही वाहतूक शिपायाचा पत्ता नव्हता तर वाहतूक दिवाही बंद होता. त्यामुळे तीनही बाजुने येणारे वाहने एकमेकांत भिडून वाहतूक खोळबंत असल्याचे दिसून आले. थोड्याच अंतरावर असलेल्या छोटा बाजार चौकातही हाच प्रकार दिसून आला. येथील वाहतूक दिवा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथेही वाहतूकीची कोंडी पाहायला मिळाली. तिनही बाजुने येणारे वाहने एकाच वेळी आल्यास येथे वाहतूक विस्कळीत होते. मात्र, वाहतूक दिवा बंद व शिपायी नसल्याने येथे वाहनधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.पाण्याच्या टाकीजवळ वरोरा नाका चौक, दुपारी ३.१५ वाजता. वाहतूक दिवा सुरु व वाहतूक पोलीसही कार्यरत. मात्र सिग्नल पडण्यापूर्वीच वाहनधारक वाहन हाकलत असल्याचे दिसून आले. तर अत्यंत वर्दळीचा ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरात क्षणाक्षणाला जीव गमावण्याचा धोका दिसून आला.बसस्थानकासमोर अ‍ॅटोरिक्क्षांची गर्दी, मूल मार्गावरुन आणि उडाणपूलावरुन येणारे भरधाव वाहने त्यातच बसस्थानकावरुन सुटलेली बस वळण घेत असताना पूर्णत: वाहतूक विस्कळीत होते. बसस्थानकावर उतरलेले अनेक प्रवासी येथे रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालत असतात. काही वेळा येथे किरकोळ अपघात घडले असून हा चौक अपघातस्थळ म्हणून ओळखल्या जाते. मात्र येथे वाहतूक पोलीस दिसून आला नाही. असाच प्रकार रामनगर चौक, वाहतूक चौकी तुकूम चौक, बंगाली कॅम्प चौक, जुना वरोरा नाका चौकातही दिसून आहे. वाहतूक पोलीस असले, नसले तरी मुजोर वाहनधारक आपल्या मर्जीने वाहन चालवित असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा वाहनधारकांवर कठोर कारवाईची गरज असून वाहतूक पोलिसांनाही दक्ष राहून कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. काही ठिकाणी शिपायी कार्यरत असतात, मात्र सावलीत उभे राहून मोबाईवर बोलणे, ओळखीच्या वाहनधारकांशी चर्चा करण्यात गुंग असतात. अशा शिपायांवरही वचक असायला हवे.