शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

जीवघेणी बेशिस्त

By admin | Updated: January 15, 2015 22:47 IST

चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात शेकडो नवी वाहनेही रस्त्यावर उतरत असून शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे. मुख्य चौकात सिग्नल आहेत,

मंगेश भांडेकर - चंद्रपूर चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात शेकडो नवी वाहनेही रस्त्यावर उतरत असून शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे. मुख्य चौकात सिग्नल आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष करुन नागरिकांकडून वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. यावर मात्र वाहतूक पोलीसही काहीच करु शकत नसल्याने बेशिस्त वाहतूक चंद्रपूरकरांसाठी जीवघेणी ठरत आहे. शहरातील अपघात व जखमींची संख्या बघता वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त आहे अन् वाहनचालक किती निर्ढावले आहेत, त्याचा प्रत्यय येतो. यामुळे चंद्रपूर शहर ‘हादसों का शहर’ म्हणून ओळख मिळवते की काय, अशी भीतीदायक स्थिती स्टिंग आॅपरेशन दरम्यान दिसून आली.शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी शहरातील १५ मुख्य चौकांमध्ये वाहतूक दिवे लावण्यात आले. मात्र ४ चौकातील वाहतूक दिवे सध्यास्थितीत बंद आहेत. तर ज्या ठिकाणी वाहतूक दिवे आहेत, त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिक सिग्नल तोडून वाहन पळवित असल्याचा प्रकार स्टिंग आॅपरेशन दरम्यान दिसून आला. वेळ दुपारी २ वाजताची, स्थळ गिरणार चौक, वाहतूक पोलीस कार्यरत, वाहतूक दिवाही सुरु. मात्र, कार्यरत पोलीस शिपाई स्वत:चा उन्हापासून बचाव करत रस्त्याच्या कडेला उभा असताना नागरिक शिपायाच्या डोळ्यादेखत वाहन पळवित होते. काही वाहनधारक लाल दिवा लागताच थांबत होते. मात्र, दिवा बंद होण्याआधीच वाहन पळविण्यात कोणीच मागे दिसले नाही. चौक क्रॉस करताना पायी चालणाऱ्यांसाठी किती धोकादायक असते, हे येथे दिसून आले. मात्र, याचे कोणलाच सोयरसूतक नसल्याचे यावेळी दिसून आले. वेळ दुपारी अडीच वाजताची. स्थळ गांधी चौक. चारही बाजुने वाहनांची वर्दळ. लगतच शहर पोलीस ठाणे. मात्र येथे कोणताच वाहतूक पोलीस शिपाई दिसून आला नाही. येथे गोल बाजार असल्याने मार्केटमध्ये येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे पायी चालणारे जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत असल्याचा प्रकार येथे दिसून आला. वेळ २.४५ वाजताची, स्थळ जयंत टॉकीज चौक. येथेही वाहतूक शिपायाचा पत्ता नव्हता तर वाहतूक दिवाही बंद होता. त्यामुळे तीनही बाजुने येणारे वाहने एकमेकांत भिडून वाहतूक खोळबंत असल्याचे दिसून आले. थोड्याच अंतरावर असलेल्या छोटा बाजार चौकातही हाच प्रकार दिसून आला. येथील वाहतूक दिवा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथेही वाहतूकीची कोंडी पाहायला मिळाली. तिनही बाजुने येणारे वाहने एकाच वेळी आल्यास येथे वाहतूक विस्कळीत होते. मात्र, वाहतूक दिवा बंद व शिपायी नसल्याने येथे वाहनधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.पाण्याच्या टाकीजवळ वरोरा नाका चौक, दुपारी ३.१५ वाजता. वाहतूक दिवा सुरु व वाहतूक पोलीसही कार्यरत. मात्र सिग्नल पडण्यापूर्वीच वाहनधारक वाहन हाकलत असल्याचे दिसून आले. तर अत्यंत वर्दळीचा ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरात क्षणाक्षणाला जीव गमावण्याचा धोका दिसून आला.बसस्थानकासमोर अ‍ॅटोरिक्क्षांची गर्दी, मूल मार्गावरुन आणि उडाणपूलावरुन येणारे भरधाव वाहने त्यातच बसस्थानकावरुन सुटलेली बस वळण घेत असताना पूर्णत: वाहतूक विस्कळीत होते. बसस्थानकावर उतरलेले अनेक प्रवासी येथे रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालत असतात. काही वेळा येथे किरकोळ अपघात घडले असून हा चौक अपघातस्थळ म्हणून ओळखल्या जाते. मात्र येथे वाहतूक पोलीस दिसून आला नाही. असाच प्रकार रामनगर चौक, वाहतूक चौकी तुकूम चौक, बंगाली कॅम्प चौक, जुना वरोरा नाका चौकातही दिसून आहे. वाहतूक पोलीस असले, नसले तरी मुजोर वाहनधारक आपल्या मर्जीने वाहन चालवित असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा वाहनधारकांवर कठोर कारवाईची गरज असून वाहतूक पोलिसांनाही दक्ष राहून कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. काही ठिकाणी शिपायी कार्यरत असतात, मात्र सावलीत उभे राहून मोबाईवर बोलणे, ओळखीच्या वाहनधारकांशी चर्चा करण्यात गुंग असतात. अशा शिपायांवरही वचक असायला हवे.