शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: May 14, 2016 00:50 IST

नात्यातील घराशेजारच्या दोन लहान मुलांचा क्रूरपणे खून करून नंतर पाण्याच्या टाक्यात बुडविण्याच्या आरोपाखाली बल्लारपुरातील सला नामक युवतीला

दोन मुलांचा केला होता खून : बल्लारपूर शहरातील घटनाचंद्रपूर : नात्यातील घराशेजारच्या दोन लहान मुलांचा क्रूरपणे खून करून नंतर पाण्याच्या टाक्यात बुडविण्याच्या आरोपाखाली बल्लारपुरातील सला नामक युवतीला शुक्रवारी चंद्रपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची सजा सुनावली. तब्बल पावणेतीन वर्षानंतर या घटनेचा निकाल न्यायालयाने दिला. त्यावेळी मृत मुलांच्या नातेवाईकांचे डोळे आठवणीने डबडबले.बल्लारपुरातील बालाजी वॉर्डात राहणाऱ्या सला आमनखाँ पठाण या १९ वर्षीय युवतीने आपल्या घराशेजारच्या नेहा खान (८) आणि शफाख खान (१०) या भावंडांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना १३ सप्टेंबर २०१३ ला सकाळी उघकडीस आली होती. या तरूणीच्या घराशेजारी राहणारे इस्त्राईल खान अब्दूल मुस्तझा खान यांनी सलाच्या वडिलांजवळ सलाच्या वर्तणुकीबद्दल चर्चा करून तिचे लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे ती ईस्त्राईल खान यांच्यावर चिडून होती. हा राग मनात ठेवून सूड उगविण्यासाठी तिने १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास या दोन्ही मुलांना एकापाठोपाठ एक आपल्या घरी बोलावून आधी त्यांना गळफास लावून ठार मारले. त्यानंतर पाण्याच्या टाक्यामध्ये दोघांनाही बुडविले. दोन्ही मुले बराच वेळ होऊनही घरी न आल्याने सलाच्या घरी जावून बघीतले असता हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी सलाला ताब्यात घेवून अटक केली होती. बल्लारपूरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक पंजाबराव मडावी यांनी या घटनेचा तपास करून साक्षीपुरावे न्यायालयापुढे सादर केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. आर. अग्रवाल यांनी या प्रकरणी सर्व साक्षीपुरावे तपासून शुक्रवारी सलाला जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील म्हणून संजय मुनघाटे यांनी काम सांभाळले. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी झाली होती. (जिल्हा प्रतिनिधी)