शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाण्याने जीवनदायिनी काळवंडली

By admin | Updated: November 14, 2015 01:11 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीत मागील दोन दिवसांपासून बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने ही नदी काळवंडली आहे.

शेती धोक्यात : हजारो मासे मृत्युच्या छायेतनितीन मुसळे सास्तीचंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीत मागील दोन दिवसांपासून बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने ही नदी काळवंडली आहे. सोबतच या नदीतील हजारो माशांवरही मृत्युचे संकट घोंगावत आहे. याच नदीतील पाणी शेतकरी सिंचनासाठी वापरतात. त्यामुळे शेतातील पिकांनाही बाधा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पाण्यावर विविध उद्योग व पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे वर्धा नदी जीवनदायिनी ठरली आहे. मात्र जिल्ह्यातील काही कारखानदारांच्या बेबंदशाहीमुळे या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक कारखानदार उद्योगातील रसानयुक्त पाणी कारखान्यातील विषारी गाळ, कचरा या नदीत सोडत आहेत. राजुरा तालुक्यातील कुर्ली, मारडा, धिडशी, कढोली, कोलगाव, सास्ती, चुनाळा, सातरी, चनाखा, विहीरगाव, नलफडी, सिंधी, धानोरा अशा विविध गावांतून वर्धा नदी वाहते. त्यामुळे या गावांना विविध कारणांनी या नदीचा फायदा होतो. परिसरातील जनावरेदेखील याच नदीच्या पाण्यावर आपली तहान भागवितात. मात्र मागील दोन दिवसांपासून बल्लारपूर पेपर मिलद्वारा या नदीच्या पात्रात रसायनयुक्त पाणी सोडले जात आहे.परिणामी नदीतील पाणी काळवंडले असून ते पाणी पिण्यायोग्य नाही. तंबी देऊनही मुजोरी१९ मे २०१३ रोजीसुद्धा बल्लारपूर पेपर मिलचे पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. संबंधित कारखानदाराला धारेवर धरून तंबी दिली. परंतु या सर्व बाबींना न जुमानता कारखान्यातील रसायनयुक्त पाणी अजुनही नदीत सोडलेच जात आहे. वर्धा नदीच्या भरवशावर राजुरा तालुक्यातील शेकडो मच्छीमार बांधवांची उपजिविका चालते. परंतु ऐन दिवाळीच्या पर्वात कारखान्यातील रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कारखानदाराविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.-विजय कार्लेकर, अध्यक्ष मच्छींद्र मत्स्यपालनसहकारी संस्था राजुराकारखान्यातील ईटी प्लँट २४ तास सुरू राहत असल्यामुळे आमच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी नदीत जाणे शक्यच नाही. मी सध्या सुटीवर आहे. आल्यानंतर यासंदर्भात चौकशी केली जाईल.सी.एस.काशिकर, महाव्यवस्थापक (पर्यावरण) बल्लारपूर पेपर मिल