शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

अस्वल पीडितांना मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:03 IST

मागील वर्षी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले ‘ते’ तिघे अद्यापही मरणयातना भोगत असून वनविभागाचे त्यांच्याकडे पूर्णपणे डोळेझाक झाली आहे.

ठळक मुद्देदुर्लक्षित : वर्षभरापासून वनविभागाकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतनागभीड : मागील वर्षी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले ‘ते’ तिघे अद्यापही मरणयातना भोगत असून वनविभागाचे त्यांच्याकडे पूर्णपणे डोळेझाक झाली आहे. वनविभागाच्या या धोरणाबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.गतवर्षी १३ मे रोजी तळोधी वनपरिक्षेत्रातील किटाडी- खरकाडा जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात रंजना राऊत, बिसन कुळमेथे व फारूख शेख हे तिघे ठार तर सचिन कुळमेथे, मीना राऊत व कुणाल राऊत हे तिघे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर या जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर या जखमींना घरी पाठविण्यात आले.त्यांना घरी पाठविण्यात आले असले तरी त्यांचा दुर्दैवाने दशावतार सुरूच आहेत. त्यांच्या जखमा अद्यापही बºया झालेल्या नाहीत. उपचारासाठी त्यांना महिन्यातून तीन वेळा नागपूरला जावे लागत आहे. मीना व कुणालच्या डोळ्यांना गंभीर जखमा असल्याने त्यांच्या डोळ्याच्या जखमेतून अद्यापही द्रव वाहत असते. त्यामुळे त्यांना अंधत्व येण्याची भीती सतावत आहे. तर सचिनच्या पायाला जबर जखम आहे.हातावर आणून पानावर खाणारे हे लोक असून महिन्यातून तीन वेळा नागपूरला जाऊन उपचार करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पण जीवाच्या भीतीने कशी तरी काटकसर करून ते नागपूरला जाऊन उपचार करत आहेत. दुधराम राऊत यांनी पत्नी आणि मुलाच्या उपचारासाठी घरच्या २० ते २५ शेळ्या विकून उपचार सुरू ठेवला आहे. सचिनच्या कुटुंबियांचीही हिच अवस्था आहे. मात्र वनविभागाने त्यांच्याकडे पूर्णत: पाठ फिरविली असून उपचारासाठी वनविभागाने त्यांना आतापर्यंत कवडीचीही मदत केली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.उपचार करण्यासाठी महिन्यातून तीन वेळा पत्नी व मुलाला नागपूरला न्यावे लागते. आतापर्यंत घरच्या शेळ्या विकून उपचार केला. आता उपचार करणे आवाक्याबाहेर जात आहे. वनविभागाने आमची अडचण समजून घ्यावी व मदत करावी.- दुधराम राऊतपीडित.