शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अस्वल पीडितांना मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:03 IST

मागील वर्षी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले ‘ते’ तिघे अद्यापही मरणयातना भोगत असून वनविभागाचे त्यांच्याकडे पूर्णपणे डोळेझाक झाली आहे.

ठळक मुद्देदुर्लक्षित : वर्षभरापासून वनविभागाकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतनागभीड : मागील वर्षी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले ‘ते’ तिघे अद्यापही मरणयातना भोगत असून वनविभागाचे त्यांच्याकडे पूर्णपणे डोळेझाक झाली आहे. वनविभागाच्या या धोरणाबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.गतवर्षी १३ मे रोजी तळोधी वनपरिक्षेत्रातील किटाडी- खरकाडा जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात रंजना राऊत, बिसन कुळमेथे व फारूख शेख हे तिघे ठार तर सचिन कुळमेथे, मीना राऊत व कुणाल राऊत हे तिघे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर या जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर या जखमींना घरी पाठविण्यात आले.त्यांना घरी पाठविण्यात आले असले तरी त्यांचा दुर्दैवाने दशावतार सुरूच आहेत. त्यांच्या जखमा अद्यापही बºया झालेल्या नाहीत. उपचारासाठी त्यांना महिन्यातून तीन वेळा नागपूरला जावे लागत आहे. मीना व कुणालच्या डोळ्यांना गंभीर जखमा असल्याने त्यांच्या डोळ्याच्या जखमेतून अद्यापही द्रव वाहत असते. त्यामुळे त्यांना अंधत्व येण्याची भीती सतावत आहे. तर सचिनच्या पायाला जबर जखम आहे.हातावर आणून पानावर खाणारे हे लोक असून महिन्यातून तीन वेळा नागपूरला जाऊन उपचार करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पण जीवाच्या भीतीने कशी तरी काटकसर करून ते नागपूरला जाऊन उपचार करत आहेत. दुधराम राऊत यांनी पत्नी आणि मुलाच्या उपचारासाठी घरच्या २० ते २५ शेळ्या विकून उपचार सुरू ठेवला आहे. सचिनच्या कुटुंबियांचीही हिच अवस्था आहे. मात्र वनविभागाने त्यांच्याकडे पूर्णत: पाठ फिरविली असून उपचारासाठी वनविभागाने त्यांना आतापर्यंत कवडीचीही मदत केली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.उपचार करण्यासाठी महिन्यातून तीन वेळा पत्नी व मुलाला नागपूरला न्यावे लागते. आतापर्यंत घरच्या शेळ्या विकून उपचार केला. आता उपचार करणे आवाक्याबाहेर जात आहे. वनविभागाने आमची अडचण समजून घ्यावी व मदत करावी.- दुधराम राऊतपीडित.