शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

प्रमुख अधिकाऱ्यांचाच मुख्यालयाला खो

By admin | Updated: December 18, 2014 22:52 IST

आदिवासीबहुल, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत

चंद्रपूर : आदिवासीबहुल, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कामांचा खोळंबा होत आहे. वरिष्ठांनी अनेकदा बजावूनही हे कर्मचारी व अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे चित्र कोरपना तालुक्यात आहे. कोरपना तालुक्यात ११३ गावे, ५३ ग्रामपंचायती व एक नगर परिषद आहे. तहसिलदार, ठाणेदार हे दोनच अधिकारी वगळता संपूर्ण कार्यालयाचे प्रमुख ‘अपडाऊन’च करणे पसंद करीत आहेत. सद्य:स्थितीत उपकोषागार, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी कार्यालयांचे प्रमुख अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासोबतच येथे असलेल्या तहसिल भूमी अभिलेख, पंचायत समिती, उपकोषागार कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुय्यम निबंधक, एकात्मिक बालविकास प्रकल्प, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय व निमशासकीय शाळांतील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने येथील कार्यालयीन वेळ १२ वाजता पासूनच सुरू होते. कोरपना तालुक्याचे स्थळ असले तरी प्राथमिक सुविधांच्या दृष्टीने अद्यापही परिपूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी येथे राहायला तयार नाही. शासकीय सदनिकांमध्ये कोणत्याही सुविधा नसल्याने कर्मचारी, अधिकारी या सदनिकांमध्ये राहणे टाळत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या सदनिका ओस पडल्या आहेत. या तालुक्याच्या ठिकाणावरुन दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. पाल्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या या तालुक्यात पोषक वातावरण नाही. त्यामुळे कोरपनाबद्दल नकारार्थी भाव कर्मचाऱ्यांत आहे. उदरनिर्वाहासाठी नोकरी गरजेची असल्याने कर्मचाऱ्यांपुढे या खेरीज पर्याय नाही. येथील कर्मचारी चंद्रपूर, राजुरा, वरोरा, वणी, भद्रावती, बल्लारपूर, गडचांदूर आदी सोयींच्या ठिकाणांवरुन नियमित ‘अपडाऊन’ करताना दिसतात. दूरगावावरून कामासाठी आलेले नागरिक यात भरडले जात आहेत. एका दिवसांत होणारी कामे १५-१५ दिवस लोटूनही होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढते. कामाची गतीही संथ असल्याने गरजवंतांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तालुक्याचे स्थळ विकसित नसल्याने अनेक कार्यालये येथे नाहीत. त्यामुळे इतर ठिकाणी जाऊन कामे नागरिकांना करावी लागते. यात वेळेचा अपव्यय होतो. सोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. हाती असलेले काम टाकून विनाकारण गैरसोयीच्या सामना करावा लागतो. (प्रतिनिधी)