शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

करवाढीसाठी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतींना पत्र

By admin | Updated: February 16, 2016 01:17 IST

नव्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींमार्फत वसूल केले जाणारे कर वाढविण्यात यावे, असे पत्र जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व

चंद्रपूर : नव्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींमार्फत वसूल केले जाणारे कर वाढविण्यात यावे, असे पत्र जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाठविले आहे. त्यामुळे या पत्राची दखल घेत ग्रामपंचायतींनी करवाढ केल्यास ग्रामीण नागरिकांवरही आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींची कर वसुली ५० टक्केही झालेली नाही. कर वसुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सुचना दिली जात आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून कर वसुलीसाठी ठोस पाऊले उचलली जात नसल्याने नागरिकही कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी अनेक ग्रामपंचायतींची करवसुली थकीत आहे. याचा परिणाम गावातील विकास कामांवर होत आहे. जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार ८ ते १० टक्के करवाढ करण्याचे म्हटले आहे. ही करवाढ लागू केल्यास ग्रामीण नागरिकांचाही आर्थिक बजेट कोलमडणार आहे. चंद्रपूर शहर मनपा प्रशासनाने कर वाढ केल्याच्या कारणावरून चंद्रपुरात नागरिकांचे आंदोलन झाले. अनेकांनी करवाढीवर आक्षेप घेत कर वाढ मागे घेण्याची विनंती केली. आता तर सर्व ग्रामपंचायतींना कर वाढ करण्याचे पत्र जिल्हा परिषदेने पाठविल्याने व ही कर वाढ लागू केल्यास नागरिकांचा असंतोष वाढण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)