शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

करवाढीसाठी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतींना पत्र

By admin | Updated: February 16, 2016 01:17 IST

नव्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींमार्फत वसूल केले जाणारे कर वाढविण्यात यावे, असे पत्र जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व

चंद्रपूर : नव्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींमार्फत वसूल केले जाणारे कर वाढविण्यात यावे, असे पत्र जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाठविले आहे. त्यामुळे या पत्राची दखल घेत ग्रामपंचायतींनी करवाढ केल्यास ग्रामीण नागरिकांवरही आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींची कर वसुली ५० टक्केही झालेली नाही. कर वसुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सुचना दिली जात आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून कर वसुलीसाठी ठोस पाऊले उचलली जात नसल्याने नागरिकही कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी अनेक ग्रामपंचायतींची करवसुली थकीत आहे. याचा परिणाम गावातील विकास कामांवर होत आहे. जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार ८ ते १० टक्के करवाढ करण्याचे म्हटले आहे. ही करवाढ लागू केल्यास ग्रामीण नागरिकांचाही आर्थिक बजेट कोलमडणार आहे. चंद्रपूर शहर मनपा प्रशासनाने कर वाढ केल्याच्या कारणावरून चंद्रपुरात नागरिकांचे आंदोलन झाले. अनेकांनी करवाढीवर आक्षेप घेत कर वाढ मागे घेण्याची विनंती केली. आता तर सर्व ग्रामपंचायतींना कर वाढ करण्याचे पत्र जिल्हा परिषदेने पाठविल्याने व ही कर वाढ लागू केल्यास नागरिकांचा असंतोष वाढण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)