शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

सहा हजार शेतकऱ्यांचे मुख्य न्यायाधीशांना पत्र

By admin | Updated: May 14, 2016 00:53 IST

डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे व संपूर्ण कर्जमाफी करणे या मुख्य मागण्यासह शेतकरी व शेतकऱ्यांच्या इतर

निमकर यांच्या नेतृत्वात मोहीम : दाखल याचिकेला न्याय देण्याची केली मागणीराजुरा : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे व संपूर्ण कर्जमाफी करणे या मुख्य मागण्यासह शेतकरी व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासंदर्तात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेची नोंद घेऊन न्याय मिळावा याकरिता ्न्नराजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातून जवळपास सहा हजार शेतकऱ्यांनी मुख्य न्यायाधिशांना पत्र पाठविले आहेत. या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू झाली असून न्यायालयाने शासनास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासंबंधी तपासणी करण्याच्या सुचना केल्या आहेत.राज्यातील शेतकरी-शेतमजुरांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. शेती व्यवसायावर कुटुंबाची उपजीविका करणे कठीण होत आहे. शेती व्यवसायातील उत्पादन खर्चात अनेक पटीने वाढ झाली आहे. परंतु आर्थिक उत्पन्नात मात्र वाढ झाली नाही. नैसर्गिकदृष्ट्या बेभरोशाची तोट्याची व अनिश्चित बाजाराच्या स्थितीमुळे तसेच सरकारच्या दिशाहीन शेती धोरणामुळे कर्जाचे ओझे वाढत आहे. दररोजच्या जीवनावश्यक गरजा भागविणे सुद्धा अशक्य झाले आहे. अशा स्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येच्या भावना वाढत आहेत. भविष्यातील अशा स्थितीचे अनिष्ठ परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर होणार असल्याने स्वामिनाथन आयोग लागू करणे, कर्जातून मुक्तता करणे, शेती व्यवसायात संरक्षण देणे, बिनव्याजी पतपुरवठा करणे, शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन लागू करणे, शेतातील कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत घेणे अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महाराष्ट्र प्रदेश शेतकरी-शेतमजूर कृती समितीच्यावतीने समितीचे संयोजक माजी आमदार शंकरराव धोंगळे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला त्वरित न्याय मिळावा, याकरिता राज्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्य न्यायाधिशांना पत्र पाठविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत राजुरा येथे ९ एप्रिल रोजी पार पडलेल्या जनजागृती मेळाव्यात राजुरा विधानसभा क्षेत्रातील उपस्थित हजारो शेतकऱ्यांना अर्ज भरुन न्यायालयाकडे सादर करण्याचे आवाहन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत जवळपास सहा हजार शेतकऱ्यांनी ही पत्रे पाठविली असून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.या जनहित याचिकेसंदर्भात न्यायालयाकडे राज्यातील विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलेल्या विनंती अर्जाची दखल घेत न्यायालयाने शासनाकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासंदर्भातील माहिती मागितली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्य न्यायाधीशांकडे पाठविल्या जाणाऱ्या पत्राच्या प्रती राजुरा पोस्ट आॅफीसचे प्रभारी पोस्टमास्तर प्रकार कटकुलवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ही सर्व पत्रे गुरूवारी पाठविण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)