शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरला रोजगारासाठी आदर्श शहर बनवू

By admin | Updated: October 11, 2016 00:51 IST

शहराच्या विकासासाठी १०० कोटी रूपयांची विकास कामे करण्याचा शब्द मी दिला होता.

सुधीर मुनगंटीवार : विकासासाठी ११४ कोटी उपलब्धबल्लारपूर : शहराच्या विकासासाठी १०० कोटी रूपयांची विकास कामे करण्याचा शब्द मी दिला होता. प्रत्यक्षात केवळ एका वर्षातच ११४ कोटी रुपए शहराच्या विकासासाठी देण्यात आले आहे. भविष्यात विकासाची अनेक कामे शहरात होणार आहे. ही कामे होत असतांनाच शहरातील युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. त्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काम सुरू आहे. लवकरच हे शहर रोजगाराच्याबाबतीत आदर्श बनवू, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.वैशिष्ट्यपूर्ण निधीतून शहरात २० कोटीची विकास कामे होत आहे. त्यातील वेगवेगळ्या सात कामांचे भूमिपूजन सोमवारी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर कामे केली जात आहे. पुढे अनेक कामे होणार आहे. विकास कामांसोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काम सुरू आहे. येत्या काळात बल्लारपूर शहर आदर्श शहर बनवू,असे पालकमंत्र्यांनी सांगितले.पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या नाली, रस्ता कामांमध्ये कादरिया मस्जिद ते काटागेट मुख्य रस्ता तसेच कादरीया चौक ते राज बहाद्दुर दुबे यांच्या घरापर्यंत १ कोटी ९० लाख, अब्दुल कलाम चौक ते केजीएन शाळा ९४ लक्ष, भारत चौक ते अब्दुल हमीद चौक तसेच अब्दुल हमीद चौक ते देविदास बोडे यांच्या घरापर्यंत १ कोटी ७ लाख, राऊत चक्की ते कळसकर यांच्या घरापर्यंत ४२ लाख, छोटा हनुमान मंदिर ते धम्मदीप चौक २५ लाख, उमिया हॉटेल ते खनके गुरूजी यांच्या घरापर्यंत ८८ लाख, स्वामी मिस्त्री यांच्या घरापासून राकेश पान सेंटरपर्यंत ६ लाख या कामांचा समावेश आहे.(तालुका प्रतिनिधी)चेहरामोहरा बदलणारटप्प्याटप्प्याने बल्लारपूर शहरातील प्रत्येक रस्त्याचे काम होणार आहे. येत्या तीन वर्षांत एकही रस्ता कच्चा राहणार नाही. या शहरात १० कोटी रुपए खर्चून अंत्याधुनिक बसस्थानक होत आहे. २६ कोटी रुपए खर्चाचे मैदान होणार आहे. शहराची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ४० कोटी रुपए खचार्ची पाणीपुरवठा योजना करतो आहे. या योजनेनंतर शहराला २४ तास पाणी उपलब्ध राहील. त्यानंतर महिलांना पाण्यासाठी रांगेत राहावे लागणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.बल्लारपूर शहरालगत १२२ एकर जागेवार देशातील २६ वी सैनिकी शाळा उभी राहत आहे. या शाळेचे कामही लवकरच सुरु होणार आहे. याशिवाय अत्याधुनिक विश्रामगृह, बॉटनिकल गार्डन होत आहे. शहरातील नागरिकांच्या रोजगार, आरोग्य आणि निवासासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले. शासनाने गरिबांच्या घरासाठी चांगली योजना आखली आहे. या घरांसाठी शासन २.५० लक्ष रुपए उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित रक्कम बँकांमार्फत अल्प व्याजदरात उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.