शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पिढीने ज्येष्ठांना समजून घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:03 IST

नव्या पिढीने ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून ज्ञान मिळवावे आणि ज्येष्ठांना समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले. महायोगी श्री अरविंद सभागृहात योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देनामदेव उमाटे : विवेकानंद महाविद्यालयात पालक-मित्र मंडळाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : नव्या पिढीने ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून ज्ञान मिळवावे आणि ज्येष्ठांना समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले.महायोगी श्री अरविंद सभागृहात योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, सचिव कौरासे, कोषाध्यक्ष मांडवकर, डॉ. पी. प्रेमचंद, रमेश खातखेडे, गुलाबराव पाकमोडे, नामपल्लीवार, पंढरी गायकवाड, चंपतराव आस्वले, अण्णाजी कुटेमाटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. उमाटे म्हणाले, रात्रंदिवस काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करून मुलाबाळांना शिक्षण देवून मोठे केले जाते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना योग्य सन्मान मिळण्याऐवजी कुटुंबातच त्यांची उपेक्षा होते. उर्वरित आयुष्य ताणतणावात आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणाकरिताच घालवतात. मनस्ताप अनावर झालेले जेष्ठ नागरिक तर कधी आत्महत्याही करतात, हे दुर्देवी आहे. नवीपिढी अशा अनुभवी आधारस्तंभापासून वंचित होवून पोरकी होत आहे. ही चिंतेची बाब असून, ज्येष्ठ नागरिकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. सुसंवाद साधून कुटुंबात संतुलन निर्माण केल्यास सुखी जीवन जगता येते. त्यासाठीच सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही प्राचार्य डॉ. उमाटे यावेळी सांगितले. याप्रसंगी जेष्ठ नागरिकांकरिता संस्थेद्वारे दर महिन्यात विविध रोगांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाते. मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. औषधोपयोगी विविध वनस्पतीची निर्मिती, संवर्धन व वितरण, वाचन लेखन व निर्मित साहित्याचे प्रकाशन, सर्व जातीय वधूवर संशोधन व पुनर्विवाह व सुक्ष्म व्याख्यान, योग, ध्यान व सत्संग आदी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.