शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

डीटीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: July 26, 2016 00:59 IST

मागील सात वर्षापासून शिक्षक भरती (सीईटी) परीक्षा झालेली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड पदवीधारक बेरोजगार आहेत.

केवळ दोन अर्ज : अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता परिमल डोहणे  चंद्रपूरमागील सात वर्षापासून शिक्षक भरती (सीईटी) परीक्षा झालेली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड पदवीधारक बेरोजगार आहेत. त्यामुळे २१ जुलैपासून सुरू झालेल्या डीटीएड आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे पाच दिवस उलटूनही जिल्ह्याभरात केवळ २ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहे. यावरुन डीटीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी ९ जुनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र डीटीएड झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शाश्वती नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. पण काही संस्था चालकांनी या प्रवेश प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे ही प्रक्रिया दोन महिने बंद होती. २१ जुलैपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झाली असून ही प्रक्रिया १ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचा डीटीएडकडे कल नसल्यामुळे पाच दिवसानंतर जिल्ह्यात फक्त दोनच आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. पुर्वी हमखास नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघीतले जायचे. डीएडला प्रवेश मिळवण्यासाठी चडाओढ असायची. तर बहुतेकजण प्रवेश मिळवण्यासाठी वारेमाप पैसे मोजायचे. त्यामुळे अनेक खाजगी कॉलेज वाढले. त्यातच मागील सात वर्षापासून सीईटीची परीक्षा झाली नाही. सन २०१० मध्ये केंद्रीय शिक्षक भरती झाली. त्यानंतर आजपर्यंत एकदाही शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे अनेक डीटीएड पदवीधारकांची बेरोजगार फौज तयार झाली. त्यामुळे आजच्या घडीला डीटीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. परिणामी यावर्षी अनेक विद्यालयातील जागा रिक्त राहण्याचे चिन्ह दिसून येत आहेत.प्रथमच आॅनलाईन प्रक्रियाडीटीएड प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया ही यावर्षी पहिल्यांदाच सुरु करण्यात आली आहे. पुर्वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रमाणात आॅनलाईन प्रक्रिया अधिक क्लिष्ट आहे. पुर्वी डायट कॉलेजमधून प्रवेश अर्ज घेऊन तो भरावा लागत होता. मात्र आता आॅनलाईन प्रवेश अर्ज भरायचा, त्यानंतर कागदपत्र पडताळणी करायची, मग प्रपत्र जमा करायचे, ही प्रक्रिया यावर्षीपासून पहिल्यांदाच सुरु करण्यात आली आहे. आयडीयल बॅचलाही विद्यार्थी मिळेनातजिल्हास्तरीय डायट कॉलेज म्हणजेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये ४५ विद्यार्थ्यांची एक बॅच असते. शासकीय महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क ३ हजार २०० व इतर महाविद्यालयाचे शुल्क १२ हजार रुपये आहे. त्यामुळे या शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ असायची. पुर्वी यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण लागायचे. त्यामुळे या बॅचला आयडीयल बॅच असे संबोधले जायचे. मात्र आता या बॅचलासुद्धा विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. शिक्षकांची भटकंतीजिल्ह्यात विनाअनुदानीत कॉलेजच्या संस्था भरमसाठ आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी विनाअनुदानीत कॉलेजचे शिक्षक भटकंती करीत आहेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळी आमीष दाखवून प्रवेश घेण्यासाठी सांगत आहेत. मात्र बेरोजगांराची वाढती संस्था पाहून अनेक विद्यार्थी डीटीएडला प्रवेश घेण्यासाठी नकार दर्शवित आहेत.