शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेततळे योजनकडे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 13, 2016 02:04 IST

जमिनीची भूजल पातळी वाढावी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय शेतात व्हावी, याकरीता शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ ही योजना...

टार्गेट अपूर्ण : अधिकारी व कर्मचारी वैतागले वरोरा : जमिनीची भूजल पातळी वाढावी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय शेतात व्हावी, याकरीता शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ ही योजना युद्ध स्तरावर राबविणे सुरू केले आहे. परंतु, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांनी तुर्तास या योजनेकडे पाठ फिरविली आहे. दिलेले शेतकऱ्यांचे टार्गेट पूर्ण होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी धस्ताविले असल्याचे दिसून येत आहे. शासनाने शेततळ्याकरिता आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून मागितल्याने प्रारंभी शेतकऱ्यांनी शेततळे करण्याकरिता मोठ्या प्रमाणात आॅनलाईन अर्ज कृषी खात्याकडे सादर केले. जेव्हा शेततळ्याचे लेआऊट व करारनामा करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याकडे पोहचले, त्यावेळी त्यातील अनेक त्रुटी समोर आल्या. त्यात ३० - ३० शेततळे खोदण्याकरिता शासनाकडून अनुदान ५० हजार रुपये देण्यात येणार आहे. प्रथम शेततळे खोदा, नंतर शेतकऱ्यांना बँक खात्यात अनुदान जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली. ३०- ३० मी शेततळे खोदण्याकरीता ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शेततळे खोदल्याबरोबर तात्काळ मजूर व मशीनधारकास रक्कम द्यावी लागणार. त्यामुळे आधीच नापिकीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शेततळ्यास नकार घंटा वाजविली आहे. यासोबत शेतात शेततळे खोदल्यास तेवढी जागा व्यर्थ जाणार शेततळ्यातील पाणी पिकांना कसे द्यावे, शेतकऱ्याची दुरुस्ती व देखभाल यावर होणार दरवर्षीचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार आहे. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांनी शेततळे शेतात खोदण्यास नकार दिल्याचे मानले जात आहे. शासनाने कृषी विभागास टार्गेट दिले आहे. परंतु सदर योजनेतील त्रुटी दूर करण्यास वरिष्ठ अधिकारी तयार नसल्याने येत्या काळात मागेल त्यांना शेततळे योजना भुईसपाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)