शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

शेततळे योजनकडे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 13, 2016 02:04 IST

जमिनीची भूजल पातळी वाढावी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय शेतात व्हावी, याकरीता शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ ही योजना...

टार्गेट अपूर्ण : अधिकारी व कर्मचारी वैतागले वरोरा : जमिनीची भूजल पातळी वाढावी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय शेतात व्हावी, याकरीता शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ ही योजना युद्ध स्तरावर राबविणे सुरू केले आहे. परंतु, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांनी तुर्तास या योजनेकडे पाठ फिरविली आहे. दिलेले शेतकऱ्यांचे टार्गेट पूर्ण होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी धस्ताविले असल्याचे दिसून येत आहे. शासनाने शेततळ्याकरिता आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून मागितल्याने प्रारंभी शेतकऱ्यांनी शेततळे करण्याकरिता मोठ्या प्रमाणात आॅनलाईन अर्ज कृषी खात्याकडे सादर केले. जेव्हा शेततळ्याचे लेआऊट व करारनामा करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याकडे पोहचले, त्यावेळी त्यातील अनेक त्रुटी समोर आल्या. त्यात ३० - ३० शेततळे खोदण्याकरिता शासनाकडून अनुदान ५० हजार रुपये देण्यात येणार आहे. प्रथम शेततळे खोदा, नंतर शेतकऱ्यांना बँक खात्यात अनुदान जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली. ३०- ३० मी शेततळे खोदण्याकरीता ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शेततळे खोदल्याबरोबर तात्काळ मजूर व मशीनधारकास रक्कम द्यावी लागणार. त्यामुळे आधीच नापिकीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शेततळ्यास नकार घंटा वाजविली आहे. यासोबत शेतात शेततळे खोदल्यास तेवढी जागा व्यर्थ जाणार शेततळ्यातील पाणी पिकांना कसे द्यावे, शेतकऱ्याची दुरुस्ती व देखभाल यावर होणार दरवर्षीचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार आहे. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांनी शेततळे शेतात खोदण्यास नकार दिल्याचे मानले जात आहे. शासनाने कृषी विभागास टार्गेट दिले आहे. परंतु सदर योजनेतील त्रुटी दूर करण्यास वरिष्ठ अधिकारी तयार नसल्याने येत्या काळात मागेल त्यांना शेततळे योजना भुईसपाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)