शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१२ गावांनी फिरविली निवडणुकीकडे पाठ

By admin | Updated: June 26, 2016 00:38 IST

तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. ९ जुलैला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

एकही नामांकन आले नाही : विकासासाठी उपसले बहिष्काराचे अस्त्र जिवती : तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. ९ जुलैला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिवती तालुक्यात एकूण २२ ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. पण यापैकी १२ गावे मिळून असलेली पुडियाल मोहदा व केकेझरी या दोन ग्रामपंचायतीतील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने ९ जुलैला केवळ २० ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उपरोक्त दोन ग्रामपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही.जिवती तालुक्यात पुडियाल मोहदा या ग्रामपंचायतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत पुडियाल मोहदा, कुंबेझरी, लेंडीगुडा, भोलापठार, पळसगुडा, पद्मावती, इंदिरानगर, अंतापूर, नारायणगुडा, येसापूर, वणी (बु.), व शंकर लोधी अशा एकूण १२ गावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या गावाचा कारभार त्यातच २०-२५ कि.मी अंतरावरुन ग्रामपंचायतस्थळी जनतेला ये- जा करणे कठीण झाल्याने या १२ गावातील जनतेनी ग्रामपंचायतीचे विभाजन करून सहा- सहा गावाची मिळून दोन ग्रामपंचायत तयार करण्यात याव्या, यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत मागणी रेटून धरली. मात्र प्रशासनाने याची साधी दखलही घेतली नाही. या मागणीकडे दुर्लक्ष करून परत १२ गावांना मिळून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावर येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त करुन निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.पुडियाल मोहदा ही ग्रामपंचायत तालुक्यात लोकसंख्येने व क्षेत्रफळाने सर्वात मोठी असून सदर ग्रामपंचायतचे विभाजन होणे विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे. शासन नियमाप्रमाणे सहा महिने अगोदर विभाजनाच्या प्रस्तावाची सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतीने पूर्ण केली. परंतु शासनाने हा प्रस्ताव परत केला. (तालुका प्रतिनिधी)पुडियाल मोहदा ग्रामपंंचायतीत १२ गावांचा समावेश असून याठिकाणी अनेक समस्या आहेत. नदीवर पूल नाही, डांबरीकरणाचे रस्ते नाहीत. एकंदरीत २०-२५ कि.मी. अंतरावरुन ग्रामपंचायतीत येणे नागरिकांना त्रासदायक असून जोपर्यंत ग्रा.पं.चे विभाजन होत नाही, तोपर्यंत बहिष्कार कायम राहणार.- दत्तात्रेय कांबळेउपसरपंच, पुडियाला मोहदा.गुरुवारला उपविभागीय अधिकारी व मी स्वत: गावात जाऊन लोकांना बहिष्कार मागे घ्या, यासंदर्भात समजूत काढली. पण जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नसून बहिष्कार कायम राहणार, असे सांगितले. नागरिकांच्या तशा मागणीसंदर्भात अहवाल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.- के. वाय. कुनारपवारतहसीलदार, जिवती