शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

सहा प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, उद्योगांना पाणी मिळावे, पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. दहा प्रकल्पापैकी तब्बल सात प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी जलसाठा शिल्लक आहे. मे अखेर या प्रकल्पांची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वेळेवर पाऊस आला नाही तर ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाचा अभाव भासणार आहे.

ठळक मुद्देखरिपात सिंचनाचा प्रश्न : मे अखेर आणखी स्थिती बिकट होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, उद्योगांना पाणी मिळावे, पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. दहा प्रकल्पापैकी तब्बल सात प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी जलसाठा शिल्लक आहे. मे अखेर या प्रकल्पांची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वेळेवर पाऊस आला नाही तर ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाचा अभाव भासणार आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकºयांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकºयांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. गतवर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा मिळाला. मात्र तोही क्षणिक ठरला.आता शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. अनेक भागात हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही.याशिवाय जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव व इरई या धरणाचा समावेश आहे. यातील सहा प्रकल्पात ५० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. मे अखेर या धरणातील पाणी आणखी झपाट्याने कमी होईल.चंद्रपूरकरांना तुर्तास अडचण नाहीचंद्रपूर शहराला चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या इरई धरणातून पाणी पुरवठा होतो. एप्रिल महिन्यात या धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. इरई धरणाची क्षमता १५९.९९० दलघमी एवढी आहे. सध्या या धरणात १३६.७४५ दलघमी एवढे पाणी आहे. म्हणजे धरणात अद्याप ८५.४७ टक्के पाणी आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना संपूर्ण उन्हाळाभर पाणी पुरवठा होऊ शकतो. तुर्तास चंद्रपूरकरांना पाण्याची टंचाई नाही. मात्र मनपाच्या नियोयजशून्यतेमुळे चंद्रपुरातील काही भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.जिल्ह्यात ९७ मामा तलावचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ३४.०१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३७.२८ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ ९.४१ टक्के पाणी शिल्लक आहे.असा आहे प्रकल्पातील जलसाठाआसोलामेंढा प्रकल्पात ३४.०१ टक्के पाणी आहे. घोडाझरी प्रकल्पात ९.१७ टक्के, नलेश्वर-शून्य टक्के, चंदई-२७.७१ टक्के, चारगाव-४६.४२ टक्के, अमलनाला-८२.८२ टक्के, लभानसराड-५९.६५ टक्के, पकडीगुड्डम-५६.६९ टक्के, डोंगरगाव-४३.७३ टक्के व इरई धरणात ८५.४७ टक्के जलसाठा आहे.