शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

निकालानंतर होणार सरपंचपद आरक्षणाची सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST

ब्रह्मपुरी : ग्रामपंचायती चे निकाल लागल्यानंतर म्हणजे १५ जानेवारीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढावी असे आदेश ग्रामविकास विभागाने दिली आहे. ...

ब्रह्मपुरी : ग्रामपंचायती चे निकाल लागल्यानंतर म्हणजे १५ जानेवारीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढावी असे आदेश ग्रामविकास विभागाने दिली आहे. त्यामुळे गावाचा प्रमुख कारभारी होण्याची मनीषा बाळगून असलेल्या उमेदवारांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला आहे. त्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यामुळे राजकीय पक्षांनी गावपातळीवर आघाड्या व युतीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. तर इच्छुकांनी मोर्चेबांधणीचा श्री गणेशा केला. दरम्यान गावचे सरपंचपद हाती घेत नाड्या हाती ठेवण्यासाठी उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. मात्र आरक्षण सोडतीवर सर्व काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा सोडतीकडे लागली आहेत. ग्रामविकास विभागाने आदेश काढत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निकाल लागल्यानंतर काढण्याचे स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे ग्रामीण भागात नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. आदेशामुळे तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीमधील आरक्षण सोडतीची प्रक्रिया बारगळणार आहे. परिणामी गावाचा कारभार एकहाती ठेवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.