शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

प्रकल्पग्रस्तांबाबत कळवळा दाखवणारी नेतेमंडळी गप्पच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना घेऊन त्यांच्यात मिसळणे. आपणच त्यांचा कैवारी आहे, असे भासविणे. मग प्रकल्पग्रस्त एकदा आगे बढोच्या घोषणा द्यायला लागले की आपणच यांचा नेता, अशा पद्धतीने कंपनी व्यवस्थापन, कधी शासन तर कधी अधिकाऱ्यांना इशारा देणे. त्यांच्याशी बैठका घेणे. आंदोलने करणे हे सारे आलेच. मग प्रकल्पग्रस्तही हेच आपले मायबाप समजून त्यांच्या म्हणण्यानुसार पुढची कसरत करतो.

ठळक मुद्देआशा घटे आत्महत्या प्रकरणाने प्रकल्पग्रस्तांना प्रत्यय

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सास्ती येथील वेकोली प्रकल्पग्रस्त आशा तुळशीराम घटे या युवतीने वेकोली अधिकाऱ्याने अपमानित केल्यामुळे आत्महत्या केल्याची बाब पुढे आली. तिचे वडिल आपल्या मुलीला वेकोली अधिकाऱ्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सांगत आहे. या प्रकरणी पोलीस चार दिवसांनी गुन्हा दाखल करतात. दरम्यानच्या काळात ऐरवी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा डरकाळ्या फोडणारी नेतेमंडळी मात्र गप्प कशी, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना घेऊन त्यांच्यात मिसळणे. आपणच त्यांचा कैवारी आहे, असे भासविणे. मग प्रकल्पग्रस्त एकदा आगे बढोच्या घोषणा द्यायला लागले की आपणच यांचा नेता, अशा पद्धतीने कंपनी व्यवस्थापन, कधी शासन तर कधी अधिकाऱ्यांना इशारा देणे. त्यांच्याशी बैठका घेणे. आंदोलने करणे हे सारे आलेच. मग प्रकल्पग्रस्तही हेच आपले मायबाप समजून त्यांच्या म्हणण्यानुसार पुढची कसरत करतो. अशाचप्रकारे कित्येक निवडणूका होऊन जातात. तरीही प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मात्र सुटता सुटत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या शासन-प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांकडे चकरा सुरूच असते. एक नेता काम करीत नाही म्हणून? नेतेही बदलले जाते. प्रश्न मात्र बदलत नाही. ही प्रकल्पग्रस्तांची शोकांतिका आहे. प्रकल्पग्रस्तांचे कोणीही ऐकत नाही म्हणून त्यांचा नाईलाज असताे. कुठेतरी न्याय मिळेल ही भाबडी अपेक्षा त्यांची असते. राबती शेती प्रकल्पात गेल्याने भूमीहीन झालेल्या शेतकऱ्यांना रोजगाराचे साधन नसल्यामुळे तो मोठ्या आशेने नेत्यांच्या मागे फिरतो. जेव्हा या नेत्याची गरज असते तेव्हाच तो साथ देत नाही, ही बाब आशा तुळशीराम घटे या प्रकल्पग्रस्त युवतीच्या आत्महत्येने पुढे आली आहे. आशाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबाची सांत्वना करण्यासाठीही या नेत्यांजवळ वेळ नसतो. न्याय मिळवून देणे ही दूरचीच गोष्ट. आशाने का आत्महत्या केली. तिचे वडिल न्यायाची मागणी करीत असतानाही ऐरवी प्रकल्पग्रस्तांचा कळवळा दाखवणारी ही नेतेमंडळी कुठेही आवाज उठविताना दिसली नाही. कारण वेकोलीचा एक महत्त्वाचा अधिकारी याप्रकरणात अडकतो आहे म्हणून? हिच प्रकल्पग्रस्तांविषयीची आस्था, असे सवाल या घटनेने उपस्थित केले जात आहे. केवळ राजकारणासाठीच आपला वापर होतोय. म्हणूनच आपले प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळलेले असतात, अशी चर्चा आता प्रकल्पग्रस्त करू लागले आहेत.

कोणता झेंडा घेऊ मी हाती? ही प्रकल्पग्रस्तांची अवस्था...चंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात या उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतीचे अधिग्रहण करण्यात आले. एकदा शेतकरी प्रकल्पग्रस्त झाल्यानंतर त्याच्यामागे संकटांची मालिकाच लागते. याच समस्या काहीही करता पिच्छा सोडत नाही. ज्या कंपनीत शेती गेली ते ऐकून घेत नाही. शासन, प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. यामुळे, भुमीहीन झालेला हा शेतकरी हवालदिल होऊन जातो, नाईलाज असतो तो. राजकीय नेत्यांच्या पाशात अडकतो. वर्षानुवर्षे त्यांच्यामागे फिरण्यातच वेळ निघून जातो. कधी त्याच्या हातात  कोणता झेंडा येईल हे, त्यालाच कळत नाही. मात्र समस्या सुटता सुटत नाही, ही प्रकल्पग्रस्तांची अवस्था झाली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी