शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांमध्ये पट्टेदार वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:34 IST

मागील काही दिवसांपासून सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चार गावांमध्ये पट्टेदार वाघाचा संचार सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देनागरिकांना घराबाहेर पडणे कठीण : दोन महिन्यात सहा बैलांचा घेतला जीव; बंदोबस्त करण्याची मागणी

राकेश बोरकुंडवार।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : मागील काही दिवसांपासून सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चार गावांमध्ये पट्टेदार वाघाचा संचार सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.सिंदेवाही वन परिक्षेत्रात बारा गावे येतात. लोनवाही, सिंदेवाही, किन्ही, मुरमाडी या चार गावांत मागील एक महिन्यांपासून पट्टेदार वाघ व बिबटाचाच संचार सुरू आहे. एक महिन्यापूर्वी तयागोंदी जंगलात वाघाने कविता निकोडे या महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. दोन आठवड्यांपूर्वी लोनवाही येथील ठाकूरच्या घराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला होता. तर किन्ही, मुरमाडी, कच्चेपार या गावात दोन महिन्यात सहा बैल, शेळ्या मारल्या. त्यामुळे दिवसेंदिवस या परिसरात वाघ व बिबट्याची दहशत पसरत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी लोनवाही येथील रहिवासी पुंडलिक कावळे यांना घराजवळ दोन बिबट्यांची जोडी दिसली. लोनवाही भागात वाघांच्या पायाचे ठसे दिसले होते. परिणामी, परिसरातील नागरिकांनी वनविभागाला निवेदन देवून गावाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.सिंदेवाही देवयानी कॉन्व्हेंट, महालक्ष्मी मंदिर परिसर, इंदिरानगराील गावतलाव परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन नागरिकांना दररोज मिळत होत आहे. परिणामी, शेतकºयांना शेतावर काम करणे कठीण झाले आहे.किन्ही, मुरमाडी गावांतील जनावरे वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली होती. या परिसरातील शेतकरी दुपारीदेखील शेतात जाण्यास घाबरतात. या परिसरात शेतकºयांनीे वांगे, टमाटर, मिरची व अन्य भाजीपाला लावला आहे. परंतु, वाघाच्या भितीने शेतावर जाणे बंद केले.तयागोंदी जंगल परिसरात जेसीपीच्या माध्यमातुन तलाव खोलीकरणाचे काम सुरू असताना दोन पट्टेदार वाघांचे दर्शन झाले. सिंदेवाही वन परिक्षेत्रात वाघाचे दररोज दर्शन होत असल्याने जंगलात जाण्यासाठी नागरिक कचरत आहेत.तालुक्यातील नागरिकांनी वाघाच्या संचाराबाबत वनविभागाच्या अधिकाºयांना निवेदनातून माहिती दिली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने अनेक शेतकºयांनी रात्रीच्या सुमारास शेतीचे रक्षण करणे सोडून दिल्याचे दिसून येत आहे.वाघाची दहशत कायम आहे. वनविभागाने काही ठिकाणी सीसीटीव्ही तसेच पिंजरे लावले. अधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षेची कामे सुरू आहेत. नागरिकांनी जंगलात जाऊ नये. मदतीसाठी दोन तुकड्या तयार केल्या आहेत.- के.आर. गोंड,वनपरिक्षेत्रधिकारी, सिंदेवाही

टॅग्स :Tigerवाघ