शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

सीमावर्ती गावात मलेरियाचे तांडव सुरूच

By admin | Updated: October 17, 2015 01:35 IST

गेल्या पंधरवड्यात सीमावर्ती गावांमध्ये मलेरियाने चार जणांचा बळी गेल्यानंतर पुन्हा गुरुवारी पहिल्या वर्गात विद्यार्थिनीसोबतच एका महिलेचा मलेरिया आजाराने मृत्यू झाला.

आणखी दोघांचा मृत्यू : आरोग्य यंत्रणेचा एकही कर्मचारी फिरकला नाहीसंघरक्षित तावाडे जिवतीगेल्या पंधरवड्यात सीमावर्ती गावांमध्ये मलेरियाने चार जणांचा बळी गेल्यानंतर पुन्हा गुरुवारी पहिल्या वर्गात विद्यार्थिनीसोबतच एका महिलेचा मलेरिया आजाराने मृत्यू झाला. एकीकडे या परिसरातील गावांमध्ये मलेरियाचे तांडव सुरू असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र या विषयात अद्याप गंभीर झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनी ज्ञानोबा तेलंगे (७) ही गेल्या आठवडाभरापासून हिवतापाने आजारी होती. तिला गुरुवारी १५ आॅक्टोबरला जिवती येथील दवाखान्यात आणत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला, तर सत्यभामा नारायण मोहाळे (५५) या महिलेचा दोन दिवसाअगोदर मृत्यू झाला. या दोघीही कोटा येथील रहिवासी आहेत. सीमेवरील कोटा, शंकरलोधी, परमडोली आणि मुकदमगुडा या चारही गावात मलेरियाने गेल्या एक महिन्यापासून मलेरियाचे थैमान सुरू आहे. शंकरलोधी येथील आशिद सुधाकर काटे, मुकदमगुडा येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा भिमज्योत प्रकाश खंदारे तर कोटा येथील मुद्रिकाबाई नारायण मोरे व दिगांबर नागनाथ गोपले या चौघांचा यापूर्वी ंहिवतापाने मृत्यू होता. त्यानंतरही आरोग्य विभागाने कुठल्याही ठोस उपाययोजना सुरू न केल्याने गावात मृत्युचे तांडव सुरू आहे.या भागातील प्रत्येक घरात दोनपेक्षा अधिक मलेरियाचे रुग्ण आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा अजुनही या गावात पोहचली नाही. २ आॅक्टोबरला यासंदर्भात लोकमतने ‘वादग्रस्त सीमावर्ती गावात मलेरियाचा कोप’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. मात्र तरीही आरोग्य यंत्रणेला जाग आली नाही. गंभीर बाब ही की, एकाही लोकप्रतिनिधीने या गावांमध्ये जाऊन साधी भेटही दिली नाही.महाराष्ट्र-तेलंगाणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावांतील आम्ही रहिवासी असल्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा संताप हे गावकरी व्यक्त करीत आहेत. येथील लोकांच्या डोळ्यातील अश्रू गेल्या महिन्याभरापासून कोणी पुसण्याचा साधा प्रयत्नही कुणी केला नाही. कोटा या गावात महिन्याभरात चार जीवांचा बळी गेल्याने संपूर्ण गाव तणावाखाली आहे. घरातील प्रत्येकाला आजाराने घेरले असून या लोकांची रक्त किंवा इतर कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही. एकूणच आरोग्य विभागाबाबत संताप व्यक्त होत आहे.प्रत्येक घरात रुग्णकोटा, शंकरलोधी, परमडोली आणि मुकदमगुडा गावांना प्रत्यक्ष भेट दिली असता, गावातील घराघरांत रुग्ण पाहायला मिळणार. तेलंगणाचे काही खाजगी डॉक्टर या गावात येऊन रुग्णांवर उपचार करतात, पण महाराष्ट्राचे डॉक्टर अजूनही फिरकले नाहीत. लहानापासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक गावात रुग्ण पाहायला मिळतील.अजून किती जणांच्या मृत्यूची प्रतीक्षा?सीमेवरील कोटा या गावात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने प्रशासन आणखी किती जणांचा बळी जाण्याची प्रतीक्षा करीत आहे, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मृत सोनीबाईची बहीणही मलेरियाग्रस्त१५ आॅक्टोबरला सोनीबाई ज्ञानोबा तेलंगे या पहिल्या वर्गातील मुलीचा वाटेतच मृत्यू झाला. तिची लहान बहीण शिल्पा ज्ञानोबा तेलंगे ही चार वर्षांची मुलगीसुद्धा मलेरियाने आजाराने ग्रस्त आहे. मोठ्या मुलीचा मृत्यू झाल्याने आईवडील भांबावले आहेत. अशावेळी आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.गावकऱ्यांनी मानले ‘लोकमत’चे आभारमहाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या कचाट्यात ही गावे सापडली असून याकडे दोन्ही राज्याचे नेहमी दुर्लक्ष राहिले आहे. आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, जमिनीचे पट्टे या सर्व समस्या भेडसावत असताना तसेच मलेरियाने रुग्ण दगावत असताना दोन्ही राज्य बघ्याची भूमिका घेतात अशावेळी ‘लोकमत’ने आमची बाजू, समस्या या नेहमी आपल्या वृत्तपत्रात छापून सरकारी यंत्रणेसमोर मांडल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. कर्मचारी पाठविल्याचा दावा सीमावर्ती गावात मलेरियाचे तांडव सुरू असले तरी येथील वैद्यकीय अधिकारी के.वाय. कोरडे यांचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने १५ दिवसांअगोदर येथील मलेरियाच्या आजाराविषयी त्यांना माहिती दिली, असता या गावात तेलंगणाचे आरोग्य पथक काम करत असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या बोलण्यातून ते किती कर्तव्यदक्ष आहेत, हे लक्षात येते. हिवतापाची बालकांमध्ये लागण अधिकमहिनाभरात मलेरियाचे सहा बळी गेले असून त्यात चार बालकांचा समावेश आहे. कोटा या गावात या आजाराची लागण घरोघरी असून यात विद्यार्थी जास्त आहेत. शिल्पा ज्ञानोबा तेलंगे (४), आस्ती बाबू मवाळे (१०), प्रियंका माधव तेलंगे (१२), प्रणय व्यंकटी कोटंबे (५), दिलीप माधव तेलंगे (१५) या बालकांचा समावेश आहे तर इथेच दिनानाथ गवाले (३०), कौशल्याबाई तेलंगे (५०), नागनाथ गायकवाड (४५) यांनाही लागण झाली आहे.