शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अखेर बरसल्या सरीवर सरी

By admin | Updated: June 27, 2017 00:40 IST

गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला वरूणराजाने दिलासा दिला आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : शेतकऱ्यांना आनंदलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला वरूणराजाने दिलासा दिला आहे. कालपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून सतत सरीवर सरी बरसत आहेत. या पावसाने शेतकऱ्यांत आनंद पसरला असला तरी पाऊस अद्याप थांबलेला नसल्याने पेरणीची कामे तुर्तास थांबलेली आहेत. हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवत अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला आणि पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. चार दिवसांपुर्वी चंद्रपुरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र उर्वरीत तालुक्यात पाऊस झाला नाही. त्यानंतर चार-पाच दिवस कडक उन्ह तापली आणि उकाडा वाढला होता. त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले. तर काही शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले.मात्र रविवारपासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरू असून सरीवर सरी बरसत आहेत. त्यामुळे जमिनीत बऱ्यापैकी ओलावा झाला आहे. सोमवारीही जिल्ह्यात दमदार पाऊस सुरूच होता. दोन दिवसांपासून कधी मोठा तर कधी रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करणे थांबविले आहे. आता पावसाने सवलत दिल्यास पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.